शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

भाईंदरमधील स्टेडियम व रस्ते आरक्षणाच्या जागा मीठ विभागाकडून पालिकेला हस्तांतरित होणार - पियुष गोयल 

By धीरज परब | Updated: December 9, 2023 17:12 IST

मीठ विभागाची जागा पालिकेस हस्तांतरण करण्या बद्दल सकारात्मक भूमिका दाखवून सदर विकास कामे मार्गी लागतील असे आश्वासन दिल्याचे आ. जैन यांनी सांगितले.

मीरारोड - मीरा भाईंदर शहराच्या विकास आराखड्यातील स्टेडियम, रस्ते आदी आरक्षणांच्या मीठ विभागाच्या मालकीच्या जागा ह्या महापालिकेस हस्तांतरण करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी दिल्याची माहिती आमदार गीता जैन यांनी दिली आहे. मंत्री पियुष गोयल हे मीरा भाईंदर शहरात शनिवार ९ डिसेम्बर रोजी आले होते. उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मध्ये आमदार गीता जैन यांनी मंत्री गोयल यांची भेट घेतली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मनीषा जायभये, महापालिका आयुक्त संजय काटकर, शहर अभियंता दीपक खांबित आदी उपस्थित होते. 

आ. जैन यांनी भाईंदर पश्चिम येथील सुभाषचंद्र बोस मैदान येथे स्टेडियमचे आरक्षण क्र.९१ असून सदर जागा मीठ विभागाच्या मालकीची असल्याने स्टेडियम विकसित होण्यात अडचण येत असल्याचे गोयल यांच्या निदर्शनास आणून दिले. भाईंदर पश्चिम ते मीरारोड रेल्वे स्थानक पश्चिम जोडणारा विकास आराखड्यातील महत्वाचा रस्ता असून यामुळे भाईंदर पश्चिम भागातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या शिवाय सुभाषचंद्र बोस मैदान ते मोर्वा या रस्त्यामधील २७ हजार १८० चौ.मी जागा; भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानक जवळची मंजूर विकास आराखड्यातील रस्ता आदी आरक्षणातील ५९३५.३९ चौ.मी. ची जागा देखील मीठ विभागाच्या मालकीची असल्याने महापालिकेस विकसित करण्यात अडथळा येऊन नागरिकांना सोयी सुविधा देता येत नसल्याचे आ. जैन यांनी मंत्री गोयल यांना सांगितले. 

सदर स्टेडियम, रस्ते आदी आरक्षणातील जागा ह्या मीठ विभाग कडून महापालिकेस हस्तांतरित करण्या बाबतची विनंती आ . जैन यांनी लेखी पत्रा द्वारे गोयल यांना केली. यावेळी गोयल यांनी सदर विकास कामां बद्दल चर्चा केली. मीठ विभागाची जागा पालिकेस हस्तांतरण करण्या बद्दल सकारात्मक भूमिका दाखवून सदर विकास कामे मार्गी लागतील असे आश्वासन दिल्याचे आ. जैन यांनी सांगितले. नगरपालिका काळा पासून हे रस्ते व आरक्षणे मीठ विभागाच्या मालकी व कायदेशीर अडचणी मुळे अजूनही रखडलेले आहेत. त्यामुळे मंत्री गोयल यांच्या आश्वासना नंतर हि आरक्षणे विकसित होण्याचा मार्ग मोकळा होईल अशी खात्री असल्याचे आ. गीता जैन यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोडpiyush goyalपीयुष गोयल