शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

पिंजाळमधून राजरोस रेतीउपसा

By admin | Updated: August 28, 2016 03:57 IST

पाण्यासाठी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या योजना राबवून पाण्याचे स्त्रोत टिकविण्यासाठी शासन प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र वाडा तालुक्यात महसूल विभागाच्या डोळेझाक

- वसंत भोईर, वाडा

पाण्यासाठी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या योजना राबवून पाण्याचे स्त्रोत टिकविण्यासाठी शासन प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र वाडा तालुक्यात महसूल विभागाच्या डोळेझाक पणामुळे वैतरणा, तानसा व पिंजाळ नदीवर वाळूमाफियांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. पावसाने उघडीप देताच तालुक्यातील पीक, मलवाडा या भागात वाळूमाफियांनी आपला अनिधकृत व्यवसाय पुन्हा सुरु केला आहे. या संपूर्ण प्रकाराकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.तालुक्याला तब्बल चार नद्यांची निसर्गसंपदा लाभली असताना पिंजाळ, वैतरणा, तानसा व देहर्जे या चारही बारमाही नद्या सध्या वाळू तस्करीमुळे संकटात आहेत. तालुक्यातील पिंजाळ नदीवर पीक व मलवाडा या गावांजवळ काही वर्षांपूर्वी असणारा ७० ते ८० फुटांचा किनारा अवघ्या ३० ते ४० फुटांवर आला आहे. नदीतील नैसर्गिक झरे वाळूउपशाने बंद झाले असून पाणी वाहणे बंद झाल्यावर नदी एखाद्या फिशटँकप्रमाणे होऊन उन्हाळ्यात पाणी खराब व दुर्गंधीयुक्त होते. तसेच पाण्याची पातळीदेखील खालावते. या नदीवर पीक व मलवाडा येथे वर्षभर बेसुमार वाळूतस्करी केली जात असून पाऊस ओसरताच आता हे वाळूतस्कर पुन्हा सक्रि य झाले आहेत. असे राजरासपणे सुरु असताना वाडा महसूल विभाग मात्र आहे तरी कुठे? असा प्रश्न लोकांना पडला असून गेल्या अनेक वर्षांत महसूल विभाग कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने वाड्यात दिवसरात्र रेतीउपसा व वाहतूक राजरोसपणे सुरु असते. पीक व मलवाडा हे वेगवेगळ्या तालुक्यात येत असल्याने विक्रमगड व वाडा तालुक्यातील महसूल विभाग एकमेकांवर बोटं दाखवून आपली जबाबदारी झटकतात असा ग्रामस्थांचा आरोप आहे. मात्र काहीही असले तरी पिंजाळ नदीपात्रात सुरु असणाऱ्या वाळूउपशावर तत्काळ बंदी आणून नदीला या तस्करांचा तावडीतून मुक्त करावे, अन्यथा येणाऱ्या काळात याबाबत ग्रामस्थ आंदोलन करतील, असा इशारा पीक गावातील ग्रामस्थांनी दिला आहे.सातत्याने सुरु असणाऱ्या उत्खननामुळे आमच्या नदीचे अस्तित्व संपुष्टात येणार असल्याने हा व्यवसाय आता पूर्णत: बंद व्हावा, अशी आम्हा ग्रामस्थांची मागणी असून थातूरमातूर कारवाई करून दिशाभूल करण्याचा उद्योग महसूल विभागाने बंद करावा. अन्यथा, याविरोधात आम्ही आमरण उपोषण करू.- मच्छिंद्र आगिवले, ग्रामस्थ, पीकआमच्या तलाठ्यांनी या भागातील रेती व्यवसायावर कारवाई करून काही माल ताब्यात घेतला असून या पुढेही कारवाई सुरूच राहील.- विठ्ठल गोसावी, नायब तहसीलदार,वाडा