शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

आगाशी बाजारात सागरी सुकामेवा तेजीत

By admin | Updated: May 23, 2017 01:26 IST

समुद्रातील सुका मेवा अर्थात सुकविलेल्या मच्छीे विक्रीच्या गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळापासून आगाशी येथील टेंभीपाडा येथे

शशी करपे लोकमत न्यूज नेटवर्कवसई : समुद्रातील सुका मेवा अर्थात सुकविलेल्या मच्छीे विक्रीच्या गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळापासून आगाशी येथील टेंभीपाडा येथे भरत असलेल्या दर सोमवारच्या आठवडा बाजारात खरेदीसाठी प्रचंड झुंबड उडू लागली आहे. सोमवारी तर खरेदीदारांच्या गर्दीने विक्रमच केला.आगारी, कोळी, आदिवासी, वाडवळ, कातकरी यांच्यासह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील स्थानिक समाजात पावसाळंयात सुकी मासळी साठवण करण्याची परंपरा आहे. त्यासाठी दोन्ही जिल्ह्यात अनेक ़भागात सुकी मासळीच्या बाजारपेठा आहेत. पण, विरारजवळील आगाशीतील टेंभीपाडा गावात दर सोमवारी भरणाऱ्या सुकी मासळीच्या बाजाराला वेगळेच महत्व आहे. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळापासून हा बाजार नियमिते भरत असतो. पावसाळ््याचे चार महिने वगळता या बाजारात सुकी मासळीची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. बाजाराचे आणखी एक वैशिष्ट़य म्हणजे बाजारात फक्त आणि फक्त महिलाच सुकी मासळी विकण्याचा व्यवसाय करतात. सुकी मांदेली, बोंबील, करदी, सोडे, जवला आणि खारे याचा समावेश आहे. उत्तनसह वसई, पालघर आणि डहाणू तालुक्यातील समुद्रकिनारी सुकी मासळीेच मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. पावसाळ््यात मासेमारीला बंदी असल्याने मासळी मिळत नसल्याने स्थानिक भूमिपूत्रांसह शहरातील लोक मोठ्या प्रमाणावर सुकी मासळी साठवून ठेवतात. दर सोमवारी पहाटे सहा वाजल्यापासून दुपारपर्यंत बाजार भरतो. त्यासाठी वसई तालुक्यातील मासे विक्रेत्या महिलांसह पालघर आणि डहाणू तालुक्यातील तसेच उत्तन परिसरातील महिलाही याठिकाणी भल्या पहाटे येत असतात. खरेदीदारांमध्ये फक्त वसई तालुक्यातील खवैय्यच येतात असे नाही तर ठाणे, भिवंडी, कल्याण, पालघर, डहाणू इतकेच नव्हे तर गुजरातमधील वापीपासूनच्या ग्राहकांचा समावेश आहे. दर सोमवारी किमान वीस लाखांहून अधिकची उलाढाल होत असल्याची माहिती टेंभीपाड्याचे पोलीस पाटील शैलेश वैती यांनी दिली. या बाजाराने टेंभीपाड्यासह वसई तालुक्यातील हजारो मासेमारी कुटुंबांना मोठ्या रोजगार मिळवून दिला आहे, असेही वैती यांनी सांगितले. पावसाळ््याला आता काहीच दिवस शिल्लक असल्याने गेल्या दोन सोमवारपासून बाजारात खरेदीदारांची झुंबड उडाली आहे. आजच्या बाजारात अल्लोट गर्दी पहावयास मिळाली. यंदाचे वैशिष्टय म्हणजे सुकी मासळीच्या दरात कोणतीच वाढ झालेली नाही. पहाटेपासून दुपारपर्यंत रस्त्यावर उभे राहून किमान हजारभर महिला व्यवसाय करतात. तर खरेदीदारांची संख्या दुप्पट असते. बाजार कर वसूल केला जात असतांना याठिकाणी साधी प्रसाधन गृह नाही. त्यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो.