शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

वसईत किवाच्या मासेमारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 01:13 IST

वसई तालुक्यात किव, भोक्षी, पाग यांच्या माध्यमातून मासेमारीला वेग आला आहे.

पारोळ : वसई तालुक्यात किव, भोक्षी, पाग यांच्या माध्यमातून मासेमारीला वेग आला आहे. गणेशोत्सवानंतर या गावठी माशांना बाजारात मागणी वाढली असून त्यातून चांगला दर मिळत असल्याने हे रोजगाराचे एक नवे साधन निर्माण झाले आहे.जून महिन्यात प्रजननक्षम वल्गन चढलेल्या माशांनी सोडलेल्या बिजाचे आता मोठ्या स्वरुपातील माशांमध्ये रूपांतर झाले असून सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने माशांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. हे मासे शेतात, ओहोळात, नाल्यात आणि नदीत सापडत असून त्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर भात शेती लागवडीनंतर सध्या कमी असलेल्या शेतीच्या कामांमुळे पांग टाकून, झोळणीने, भुसा वापरून, गळ सोडून तसेच किव मांडून मासेमारी करताना दिसतात. यातून ते चांगल्या प्रकारे रोजगार कमवत आहेत. अशा प्रकारे पकडलेले मासे हे ताजे व चविष्ट असल्याने ते खरेदी करण्यासाठी खवय्येही लागलीच मिळत आहेत. त्यामुळे एका दिवसाला एकाला पाचशे ते हजार रुपयांची कमाई होत असल्याचे मासेमार सांगत आहेत.यंदा वसईत चांगला पाऊस झाल्याने शेतात, डबक्यात, नदी-नाल्यात, ओहोळात माशांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर झाली. ते पकडून त्यांच्या विक्रीतून रोजगार निर्मिती होत आहे. त्यामुळे शेतकरी तसेच शेतमजूर मासेमारी करत असून त्यांच्या हाताला काम मिळत असून खर्चायला चार पैसेही मिळत आहेत.