शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

साहेब मेहरबानी करा, अन सभा टाळा उमेदवारांचे नेत्यांना साकडे

By admin | Updated: June 8, 2015 04:29 IST

वसई-विरार महापालिकेच्या निवडणूकीत मात्र मोठ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र आपल्या नेत्यांना साहेब मेहबानी करा, पण जाहीरसभा ठेऊ नका’ असे साकडे घालत आहेत.

वसई : निवडणूक म्हटली की सगळ्याच कार्यकर्त्यांची मागणी असते ती स्टार कॅम्पेनरच्या जाहीरसभा आयोजित करण्याची परंतु वसई-विरार महापालिकेच्या निवडणूकीत मात्र मोठ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र आपल्या नेत्यांना साहेब मेहबानी करा, पण जाहीरसभा ठेऊ नका’ असे साकडे घालत आहेत.आधीच प्रचारासाठी वेळ अत्यंत कमी मिळालेला, वॉर्डांची फेररचना आणि त्यात घोषीत झालेले आरक्षण यामुळे उमेदवार शोधता-शोधता आलेले नाकीनऊ त्यामुळे सभा घेण्यापेक्षा उमेदवारांच्या घरोघरी जाऊन थेट संपर्क प्रस्थापित करणे कार्यकर्त्यांना व उमेदवारांना अधिक महत्वाचे वाटते आहे. एक सभा घेण्यासाठी किमान अर्धा दिवस तरी जातो. शिवाय गर्दी जमवायची कुठून? हा प्रश्न आहे. त्यात एवढा कुटाणा करून जर सभा ठेवलीच तरी कोणत्या क्षणी वादळ आणि पाऊस येईल याची कोणतीही शाश्वती नाही. शिवाय सभेचा खर्च करायचा कुणी? असाही प्रश्न आहे. त्यामुळे सभेमध्ये ताकद आणि पैसा खर्ची घालण्यापेक्षा पदयात्रा, थेटभेटी यावर अधिक भर देण्यास उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते हे अधिक पसंती देत आहेत. यामुळे वेळेचा चांगला वापर करता येईल, अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य पक्षांनी जाहीरसभांवर भर दिलेला नाही. सेना, भाजप युतीच्या सभा जरी सुरु असल्यातरी त्याबाबतही कार्यकर्ते आणि उमेदवार काहीसे कुर-कुर करीत आहेत. आम्ही सभा यशस्वी करायच्या की, प्रचार सांभाळायचा असा त्यांचा प्रश्न आहे. एखाद्या घटनेमुळे सभेवर कसे पाणी फिरते याचे उदाहरण युतीला पहायला मिळाले आहे. सवरा यांची सभा वसईमध्ये आयोजीत केली होती. परंतु हायवेवर झालेल्या अपघातात एका बालिकेचा बळी गेला आणि सगळे वातावरणच शोकाकुल झाले. अशा स्थितीत सभा घ्यायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला. सध्या वातावरणही क्षणात वादळ, क्षणात पाऊस मध्येच वीज जाणे असे बेभरवशी झाले आहे. त्यालाही कार्यकर्ते पार वैतागून गेले आहेत. (विशेष प्रतिनिधी)