शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

पोलीस ठाण्याबाहेर मूक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:05 IST

‘मी वसईकर अभियान’ : पालघर पोलिसांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्याचे प्रकरण

वसई : ‘मी वसईकर अभियाना’च्या आंदोलकांनी भर पावसात माणिकपूर पोलीस ठाण्याबाहेर दिवसभर उभे राहून हातात महात्मा गांधीजीची प्रतिमा घेत शुक्रवारी एक मूक आंदोलन केले.बहुचर्चित ११ कोटी रुपयांच्या दफनभूमीच्या कामातील कथित घोटाळ्याप्रकरणी वसई-विरार महापालिका अधिकारी आणि पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाºयावर गुन्हे दाखल करण्यासाठी टाळाटाळ करणाºया पोलिसांविरोधात वसईतील रस्त्यावर पालघर पोलिसांच्या प्रतिमेची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती.या प्रकरणी ‘मी वसईकर अभियाना’च्या ३५ ते ४० पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर माणिकपूर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग झाल्याप्रकरणी विविध कलमाच्या आधारे गुन्हेही दाखल करण्यात आले. दरम्यान, याच दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी ‘मी वसईकर अभियाना’च्या काही निवडक पदाधिकाºयांना माणिकपूर पोलीस निरीक्षक आणि त्यांचे तपास अधिकारी यांनी १ आॅगस्ट रोजी सकाळी माणिकपूर पोलीस ठाण्यात बोलावले होते. पोलिसांनी मिरवणुकीत वापरलेली पालखीही घेऊन येण्यास सांगितले. आंदोलकांनी ती पालखी पोलीस ठाण्यात आणली असता, पोलिसांनी त्या पालखीला आणि आपल्याला इथे बसता येणार नाही, असे बजावले. त्याचवेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी मिलिंद खानोलकरसहीत आंदोलकांना अतिशय गैर व अपमानास्पद वागणूक देत तिथून हाकलून लावले. त्याचाच निषेध म्हणून हे मूक आंदोलन केले.वसईमध्ये जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही अनेक आंदोलने केली. पण कोणत्याही पोलीस निरीक्षकाने आम्हास अशी अपमानास्पद वागणूक दिली नाही, जोपर्यंत दोषींवर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच राहणार. - मिलिंद खानोलकर, अध्यक्ष, मी वसईकर अभियानया पोलीस विरोधी आंदोलनाची मी माहिती घेतो. मात्र कोट्यवधीचा आर्थिक घोटाळा असेल किंवा सदर प्रकरण महापालिका संबंधित असेल तर त्यासाठी तक्रारदार आंदोलकांनी नगरविकास खाते, त्यांचे उच्चस्तरीय अधिकारी यांच्याकडे दाद मागितली पाहिजे, सरकारला कोण दोषी आहे ते चौकशीत आढळून आले की आपोआप दोषींवर नियमानुसार कारवाई होईल, तरीही या आंदोलनाची जातीने लक्ष टाकीत माहिती घेतो.- दीपक केसरकर,गृहराज्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य