शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
3
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
4
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
5
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
6
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
7
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
8
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
9
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
10
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
11
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
12
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
13
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
16
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
17
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
18
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
19
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
20
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा

बाजारपेठेत शुकशुकाट

By admin | Updated: November 10, 2016 02:53 IST

केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करून आर्थिक आणीबाणी लादल्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

डहाणू/बोर्डी : केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करून आर्थिक आणीबाणी लादल्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या निर्णयानंतर सुरू झालेले सोशलमीडियावरचे मेसेज वॉर दिवसभर सुरू होते. प्रत्यक्षात पर्यटन, बाजार, वाहतूक तसेच रोजंदारी या मध्ये कमालीची अस्वस्थता दिसून आली. पेट्रोल पंप वगळता सर्वच बाजारावर मंदीचे सावट पसरले होते.केंद्र सरकारने देशहितासाठी पाचशे आणि हजार रु पयांच्या चलनी नोटा बंद केल्याचे सांगून देशबांधवांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मात्र या निर्णयामुळे आर्थिक आणीबाणी निर्माण झाल्याचे चित्र डहाणू तालुक्यात पाहावयास मिळाले. रात्री उशिरापर्यन्त नोटा बंद केल्याचा निर्णय अफवा नसल्याची खात्री केल्यानंतर बुधवारी पहाटेपासून अनेकांनी किराणामालाचे दुकान, भाजी मार्केट, दूधवाला, रिक्षाचालक आदि. ठिकाणी बंदी आलेल्या नोटा वटवून पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसारमाध्यमामुळे सजगता आल्याने अशा नोटा घेण्यास नकार देण्यात आला. दिवसभर बँक, एटीएम मशीन बंद असतांनाही नागरिक संपर्क साधत असल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले. डहाणू आणि बोर्डी या पर्यटन स्थळी आलेल्या पर्यटकांचे हाल झाले. प्लास्टीक करन्सीचा फायदा ग्रामीण भागात न झाल्याने परगावतील पर्यटकांनी घराची वाट धरली. त्याचा परिणाम हॉटेल तसेच ग्रामीण आणि कृषी पर्यटन केंद्रावर दिसून आला. ग्राहकांकडे सुट्टे पैसे असल्याची खात्री करूनच सेवा देण्याची हमी रिक्षाचालक, दुकानदार आणि घाऊक बाजारातील व्यापारी घेत होते. त्यामुळे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. ग्रामीण भागात शेतीच्या कामाला वेग आला असून मजूरवर्गाला रोजंदारीचे पैसे देण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. मजुरी न मिळाल्याने शेतमजुरांनी कामावर येणे थांबवल्यास नाशवंत कृषी मालाचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व बागायतदारांनी व्यक्त केली आहे.दरम्यान तालुक्यातील विविध पेट्रोल पंपावर पाचशे आणि हजार रूपयाच्या नोटा स्वीकारण्यात येत होत्या. मात्र नोटांच्या बदल्यात तेवढ्याच किमतीचे पेट्रोल घेण्याचे बंधन असल्याने फक्त या व्यवसायावर तेजीची झळाळी दिसून आली. मात्र नोटा स्वीकारण्यासह संबंधितांचे ओळखपत्र, संपर्क क्र मांक नोंदवताना पेट्रोल पंपचालकांची दमछाक झाली. दहा, पन्नास आणि शंभर रु पयांच्या नोटा असणाऱ्यांकडे कुतुहलाने पाहण्यात येत होते. संधीसाधूंन्भ् पाचशे तसेच हजारच्या नोटैमागे शंभर रुपये कमी देत सुट्या पैशांचा व्यवहार करून आर्थिक फायदा उठवला. एकंदरीत आर्थिक उलाढालीवर मंदीचे सावट दिसून आले. (वार्ताहर)