शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट

By admin | Updated: November 15, 2016 04:10 IST

येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल हे खाते सोडले तर अन्य कोणतेच खाते नसल्याने येथे सदैव शुकशुकाटच असतो

जव्हार : येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल हे खाते सोडले तर अन्य कोणतेच खाते नसल्याने येथे सदैव शुकशुकाटच असतो. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होवून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यावर येथील अनेक खाती पालघर येथे हलविण्यात आली आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून येथील नागरिकांच्या समस्या सुटत नाहीत.आदिवासींच्या सर्वागीण विकासासाठी नवीन पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी जव्हार, मोखाडा, विक्रमगड या तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सुटाव्यात यासाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील एकही खाते स्थलांतरीत केले जाणार नाही असे शासनाने आश्वासन दिले होते. परंतु, तसे न झाल्याने जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे. पालघर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात हलविण्यात आलेल्या खात्यांचा कार्यभार जव्हारच्या कार्यालयातूनच चालवा अशी मागणी येथील आदिवासी नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभाग आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अशा दोन विभागांचा कार्यभार कायम ठेवावा अशी मागणी येथील आदिवासींनकडून केली जात आहे. १९९२-९३ साली जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथे शेकडो बालके कुपोषणाच्या विळख्यात सापडली होती. तर अनेक कुपोषित बालके मृत्युमुखी पडली होती. त्यावेळी तात्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी वावर वांगणी या गावाला तात्काळ भेट देवून येथील समस्या जाणून घेवून जव्हार येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू केले होते. पुरवठा व रोहोयो या दोन खात्यांचा कार्यभार जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यातून चालत असल्याने, येथील नागरिकांना रोजगाराची संधी निर्माण झाली होती. आणि आदिवासी ग्रामीण भागातील आदिवासींच्या समस्या काही प्रमाणात सुटत होत्या. मात्र ही खाती पालघरला स्थलांतरीत करण्यात आल्याने आता समस्या जैसे थे रहात आहेत. त्यामुळे किमान पुरवठा विभाग व रोजगार हमी योजना असा दोन खात्यांचा कार्यभार तरी जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातून चालावा अशी मागणी आदिवासींकडून केली जात आहे. याबाबत पालकमंत्र्यांनाही त्यांच्या समाजबाधंवांनी साकडे घातले आहे.(वार्ताहर)