शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट

By admin | Updated: November 15, 2016 04:10 IST

येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल हे खाते सोडले तर अन्य कोणतेच खाते नसल्याने येथे सदैव शुकशुकाटच असतो

जव्हार : येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल हे खाते सोडले तर अन्य कोणतेच खाते नसल्याने येथे सदैव शुकशुकाटच असतो. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होवून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यावर येथील अनेक खाती पालघर येथे हलविण्यात आली आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून येथील नागरिकांच्या समस्या सुटत नाहीत.आदिवासींच्या सर्वागीण विकासासाठी नवीन पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी जव्हार, मोखाडा, विक्रमगड या तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सुटाव्यात यासाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील एकही खाते स्थलांतरीत केले जाणार नाही असे शासनाने आश्वासन दिले होते. परंतु, तसे न झाल्याने जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे. पालघर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात हलविण्यात आलेल्या खात्यांचा कार्यभार जव्हारच्या कार्यालयातूनच चालवा अशी मागणी येथील आदिवासी नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभाग आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अशा दोन विभागांचा कार्यभार कायम ठेवावा अशी मागणी येथील आदिवासींनकडून केली जात आहे. १९९२-९३ साली जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथे शेकडो बालके कुपोषणाच्या विळख्यात सापडली होती. तर अनेक कुपोषित बालके मृत्युमुखी पडली होती. त्यावेळी तात्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी वावर वांगणी या गावाला तात्काळ भेट देवून येथील समस्या जाणून घेवून जव्हार येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू केले होते. पुरवठा व रोहोयो या दोन खात्यांचा कार्यभार जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यातून चालत असल्याने, येथील नागरिकांना रोजगाराची संधी निर्माण झाली होती. आणि आदिवासी ग्रामीण भागातील आदिवासींच्या समस्या काही प्रमाणात सुटत होत्या. मात्र ही खाती पालघरला स्थलांतरीत करण्यात आल्याने आता समस्या जैसे थे रहात आहेत. त्यामुळे किमान पुरवठा विभाग व रोजगार हमी योजना असा दोन खात्यांचा कार्यभार तरी जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातून चालावा अशी मागणी आदिवासींकडून केली जात आहे. याबाबत पालकमंत्र्यांनाही त्यांच्या समाजबाधंवांनी साकडे घातले आहे.(वार्ताहर)