शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट

By admin | Updated: November 15, 2016 04:10 IST

येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल हे खाते सोडले तर अन्य कोणतेच खाते नसल्याने येथे सदैव शुकशुकाटच असतो

जव्हार : येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल हे खाते सोडले तर अन्य कोणतेच खाते नसल्याने येथे सदैव शुकशुकाटच असतो. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होवून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यावर येथील अनेक खाती पालघर येथे हलविण्यात आली आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून येथील नागरिकांच्या समस्या सुटत नाहीत.आदिवासींच्या सर्वागीण विकासासाठी नवीन पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी जव्हार, मोखाडा, विक्रमगड या तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सुटाव्यात यासाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील एकही खाते स्थलांतरीत केले जाणार नाही असे शासनाने आश्वासन दिले होते. परंतु, तसे न झाल्याने जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे. पालघर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात हलविण्यात आलेल्या खात्यांचा कार्यभार जव्हारच्या कार्यालयातूनच चालवा अशी मागणी येथील आदिवासी नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभाग आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अशा दोन विभागांचा कार्यभार कायम ठेवावा अशी मागणी येथील आदिवासींनकडून केली जात आहे. १९९२-९३ साली जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथे शेकडो बालके कुपोषणाच्या विळख्यात सापडली होती. तर अनेक कुपोषित बालके मृत्युमुखी पडली होती. त्यावेळी तात्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी वावर वांगणी या गावाला तात्काळ भेट देवून येथील समस्या जाणून घेवून जव्हार येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू केले होते. पुरवठा व रोहोयो या दोन खात्यांचा कार्यभार जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यातून चालत असल्याने, येथील नागरिकांना रोजगाराची संधी निर्माण झाली होती. आणि आदिवासी ग्रामीण भागातील आदिवासींच्या समस्या काही प्रमाणात सुटत होत्या. मात्र ही खाती पालघरला स्थलांतरीत करण्यात आल्याने आता समस्या जैसे थे रहात आहेत. त्यामुळे किमान पुरवठा विभाग व रोजगार हमी योजना असा दोन खात्यांचा कार्यभार तरी जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातून चालावा अशी मागणी आदिवासींकडून केली जात आहे. याबाबत पालकमंत्र्यांनाही त्यांच्या समाजबाधंवांनी साकडे घातले आहे.(वार्ताहर)