शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

एका वराशी दोन वधूंचे एकाच मंडपात शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:29 IST

व्हायरल लग्नपत्रिकेची जोरदार चर्चा : २२ एप्रिल रोजी तलासरीतील मु. वसा येथे पार पडणार

सुरेश काटे।लोकमत न्यूज नेटवर्कतलासरी : एकाच मंडपात दोन वधूशी एका वराचे लग्न असे, ऐकल्यावर कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. परंतु पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात वसा सुतारपाडा येथे राहणाऱ्या संजय धाडगा यांचे एकाच मंडपात दोन वधूशी २२ एप्रिल रोजी लग्न पार पडणार आहे. पेशाने रिक्षाचालक असलेले संजय आपल्या दोन बेबी व रिना यांच्या समवेत विवाह बंधनात बद्ध होणार आहेत. हा लग्नसोहळा एकाच मंडपात पार पडणार असून त्यासाठी घरासमोरील आवरात लग्न मंडपची तयारी सुरू झाली आहे.

त्याचे असे झाले की, संजय धाडगा आणि बेबी व रीना या दोन वधूची नावे असलेली लग्न पत्रिका सोशल मिडीयावर व्हायरल झाली. त्यानंतर एकाच मंडपात एका वराच्या दोन वध्ांूशी होणाऱ्या या अनोख्या लग्नाची चर्चा शहरी भागामध्ये गत चार दिवसांपासून रंगली असली तरी आदिवासी समाजात मात्र अशी परंपराच आहे. आई वडिलांचे छत्र हरपलेल्या संजय ने रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह सुरू केला आणि १० वर्षांपूर्वी बेबी नावाच्या मुली सोबत त्याने आदिवासी प्रथे प्रमाणे संसार सुरु केला. ८ वर्षांपूर्वी रिना नावाच्या तरुणीशी त्याचे प्रेम जुळले. अन् बेबीच्या संमतीने रीना घरी आली. पुढे बेबी व रीना या दोघी संजय बरोबर एकाच घरात राजीखुशीने संसार करु लागल्या. सध्या बेबीला एक मुलगा एक मुलगी तर रिनाला एक मुलगी असून ते शिक्षण घेत आहेत.

संजय याची पहिली पत्नी बेबी किराणा दुकान चालवते तर रीना गुजरात मधील कंपनीमध्ये नोकरी करते तर संजय रिक्षा चालवून या सुखी संसाराचा गाडा हाकतो आहे. या दोघी सवती असल्या तरी संजयचा संसार सुखाने करतात. याबाबत बेबी व रिना कडून त्यांची प्रतिक्रि या जाणून घेतली असता, आम्ही दोघी ही एकत्र एकाच घरात राहत असून सुखाने संसार करीत असल्याचे सांगतात. जेव्हा इच्छा होती तेव्हा लग्न करण्यासाठी लागणारे पैसे नसल्याने राहुन गेलेला विवाह सोहळा आता होणार असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.ही तर आदिवासींची पारंपरिक प्रथासोयीचा भाग म्हणून व सामाजिकता टिकविण्यासाठी आधी विवाह निश्चित करुन संसार सुरु करा व जेव्हा जवळ पुरेसे पैसे असतील तेव्हा त्या विवाहाचा सोहळा करा अशी परंपरा आदिवासी समाजात आहे. त्यामुळे आई-वडिलांच्या लग्नात त्यांची मुले नाचतात असे दृष्य पहावयास मिळते. विवाह सोहळ्यात गावाला अथवा पाड्याला मांसाहारी जेवण ओल्या पार्टीसह द्यावे लागते. तो खर्च खूप मोठा असतो.तो परवडणे शक्य नसल्याने ही परंपरा सुरु झाली आहे. काही जण एवढे आर्थिक बळ जवळ नसेल तर एखाद्या धनिकाकडून तेवढे कर्ज घेऊन त्याचा लगिनगडी होणे पसंत करतात. लगिनगडी होेणे म्हणजे लग्नासाठी घेतलेले कर्च फेडण्याकरत कर्ज देणाºयाचा वेठ बिगार नवºयाने अथवा नवरा-बायकोने होणे असा असतो. म्हणून त्याला लगीनगडी असे म्हटले जाते. अजूनही ही प्रथा आदीवासींमध्ये सुरु आहे.