शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

कोळंबी संवर्धक मच्छिमार करणार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 01:08 IST

समुद्रातील ओएनजीसी.च्या वाढत्या तेलविहिरी, महिनोंमहिने चालणारे सर्वेक्षण, पर्ससीन नेटची विनाशकारी मासेमारी, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, डहाणू औष्णीक प्रकल्प इत्यादींचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मत्स्य व्यवसायावर परिणाम होत असल्याने दिवसेंदिवस मत्स्यसंपदा नष्ट होत चालली

शौकत शेख डहाणू : समुद्रातील ओएनजीसी.च्या वाढत्या तेलविहिरी, महिनोंमहिने चालणारे सर्वेक्षण, पर्ससीन नेटची विनाशकारी मासेमारी, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, डहाणू औष्णीक प्रकल्प इत्यादींचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मत्स्य व्यवसायावर परिणाम होत असल्याने दिवसेंदिवस मत्स्यसंपदा नष्ट होत चालली असून मच्छिमारांनी समुद्रात सोडलेल्या जाळयात मासळीच येत नसल्याने गेल्या महिनाभरापासून पारंपरिक पध्दतीने मासेमारी करणाºया मच्छिमार हवालदील झाला आहे.त्यातच पडित खांजण जागेत कोळंबी संवर्धन करणे हा व्यवसाय स्थानिक भुमीपूत्र मच्छिमारांसाठी पर्यायी व्यवसाय म्हणून उपयुक्त ठरत असतांनाच कोळंबी शेतीसाठी शासनाचा निर्णयाप्रमाणे मंजूर केलेली शेकडो एकर खांजण जागा महसूल विभागाने कायद्यावर बोट ठेवून खालसा केल्याने मच्छिमारांत कमालीचा असंतोष निर्माण झाला असून शेतकºयांप्रमाणे मच्छिमारांनी देखिल आत्महत्या करायची काय अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून व्यक्त होत असून डहाणूतील पारंपारिक मच्छीमार तसेच कोळंबी शेती व्यवसाय करणाºया हजारो सुशिक्षित तरूण शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावपातळीवर बैठका घेऊन आंदोलन करण्याची तयारीत आहे.सागराशी झुंज देवून रात्रंदिवस परिश्रम करणाºया मच्छिमारांना गेल्या महिन्यापासून समुद्रात जाणाºया बोटी रिकाम्या हाताने परत येत असल्याने येथील मच्छिमार कर्जबाजारी झाला आहे. डहाणू हे नावाजलेले बंदर असून चिंचणी ते झाई पर्यंतच्या असंख्या गावातील हजारो कुटुंबे पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत असतात.बोंबील, शिवण, पापलेट, दाढे साठी प्रसिध्द असलेल्या परिसरात गेल्या सहा, सात वर्षापासून मासळीचा दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण झाल्याने त्यातच शासना याकडे सहानुभूतीपूर्वक पाहत नसल्याने पारंपरिक मासेमारी करणाºया मच्छिमारांवर बोरोजगार होण्याची वेळ आली आहे. शिवाय पारंपरिक मासेमारी कमी होऊन सध्या डहाणू परिसरातील सुशिक्षित तरूण मच्छिमारांनी पर्याय म्हणून कोळंब शेतीमध्ये आपले नशीब आजमाविले. त्यासाठी लाखोचा खर्च करून डहाणू तसेच वानगाव, वडकून, मानफोडपाडा, चिंचणी, वरोर, आगवन, लोणीपाडा, बाडापोखण, चिखला चंडिगाव, असनगाव इत्यादी ठिकाणी शासनाची खांजण जागा भाडेपट्ट्यावर घेवून शासनाकडे प्रिमियम पोटी रक्कम जमा केली. त्यामुळे शासनाला देखील लाखोंचे उत्पन्न मिळाले. मात्र, तरुण मच्छीमार रितेच राहिले आहेत.खांजण पट्टे खालसा आंदोलन हाच पर्याय-केंद्रातील मोदी सरकार राज्यातील फडणवीस सरकार यांनी मच्छिमारांचा विकास व मत्स्य व्यवसाय विकास हे धोरण समोर ठेवून मच्छिमारांना प्रोत्साहन देत असतांनाच महसूल विभागाने नुकतेच डहाणूती चाळीसपेक्षा अधिका खांजण पट्टे अटी, शर्तीचा भंग झाल्याचे सांगून खालसा केल्याने मच्छिमारांमध्ये संताप आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, पालकमंत्री व संबंधीत खात्याचे मंत्री उदासिन ठरले आहे. त्यामुळे स्थानिक मच्छिमार तसेच त्यांच्यावर अवलंबुन असलेले आदिवासी मजुरात (खलाशी) बेकारी वाढून नैराश्य पसरले आहे. विशेष म्हणजे शासनाने दिलेले खांजणपट्टे विकसीत करण्यासाठी भेडसावणाºया समस्या म्हणजेच काही विघ्नसंतोषी लोकांचा विरोध, आर्थिक, तांत्रिक व प्रशासकीय समस्या सोडविण्यासाठी शासनाने व पोलीसांनी सहानुभूतीपूर्वक सहकार्य केले नसल्याने डहाणूतील खांजण जागेत कोळंबीप्रकल्प उभारू शकले नसल्याची खंत हरेश मर्दे तसेच शशिकांत बारी यांनी व्यक्त केली. डहाणू व परिसरातील उच्चशिक्षित मच्छिमार तरूणांनी जोडधंदा म्हणून कोळंबी शेतीचा व्यवसाय स्विकारतांनाच महसुल विभगाने खांजण पट्टे खालसा केल्याने मच्छिमार जिल्हाभरात आंदोलनाच्या पवित्र्यात असलयाचे प्रकाश मर्दे यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :fishermanमच्छीमार