शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारकरांना ‘विजेचा शॉक’; पुढील चार-पाच दिवस आळीपाळीने वीजपुुरवठा राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 23:31 IST

नालासोपारा उपकेंद्रातील रोहित्रात बिघाड

नालासोपारा : महापारेषण कंपनीच्या नालासोपारा पूर्व येथील धानीवबाग २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील १०० एमव्हीए क्षमतेच्या रोहित्रामध्ये सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. यामुळे या रोहित्रावरील वीज ग्राहकांचा वीजभार इतर दोन रोहित्रांवर फिरविण्यात आला असून वसई, विरार व नालासोपारा शहरांतील नागरिकांना पुढील चार-पाच दिवस ‘विजेचा शॉक’ बसणार आहे. या तीनही शहरांतील काही भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवस वीजपुरवठा गरजेनुसार आळीपाळीने बंद ठेवण्यात येणार आहे.

नालासोपारा उपकेंद्रातील रोहित्रात झालेल्या बिघाडामुळे तुळिंज, विजयनगर, रहमतनगर, निगनदास, बिलालपाडा भागात सकाळी साडेदहा ते साडेबारा या वेळात जवळपास ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. संतोष भुवन, वलईपाडा, बावशेत, तांडोपा, गौराईपाडा भागातील सुमारे ४५ हजार ग्राहकांची वीज सकाळी आठ ते साडेदहा दरम्यान बंद असेल.

नालासोपारा पश्चिम परिसरातील प्रगतीनगर, महेश पार्क भागातील अंदाजे १७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी नऊ ते साडेअकरापर्यंत बंद राहील. नारिंगी उपकेंद्रांतर्गत विरार पूर्वमधील साईनाथनगर, जीवदानी रोड, आशा तसेच विहार इंडस्ट्रीज, गोपचार भागातील जवळपास ३४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी साडेबारा ते दुपारी दोन वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नाईकपाडा उपकेंद्रांतर्गत तुंगारेश्वर रोड, नाईकपाडा, रेमी परिसरातील नऊ हजार ग्राहकांची वीज सायंकाळी साडेसहा ते साडेसातपर्यंत बंद असेल.

शिवभीम नगर, सातिवली नाका, बजरंग ढाबा ते सातिवली हायवे भागातील सुमारे ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा सायंकाळी साडेसात ते रात्री आठ वाजेपर्यंत बंद असेल. पोमण उपकेंद्रांतर्गत कामणगाव, पोमनगाव, देवतळ, केआयडीसी, डोंगरीपाडा, मोरी, नागले, शिलात्तर भागात सुमारे सव्वाचार हजार ग्राहकांचा वीजपुरवठा रात्री साडेआठ ते साडेनऊ दरम्यान बंद राहील. शिरगाव उपकेंद्रांतर्गत वैतरणा, डोलीव, कोशिंबे, खर्डी भागात अंदाजे साडेसहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद राहील. दरम्यान, पुढील चार-पाच दिवस आवश्यकतेनुसारच वीज बंद ठेवण्यात येणार असून सोमवारी रात्री बहुतांश ठिकाणी वीज बंद ठेवण्याची गरज भासली नव्हती.

सहकार्याचे आवाहन

च्विरार पश्चिममधील तारांगण, फुलपाडा रोड, सहकार नगर परिसरातील सुमारे ३३ हजार ग्राहकांची वीज दुपारी दोन ते चार दरम्यान बंद राहील. तर पारोळ उपकेंद्रांतर्गत खानिवडे, सकवार, चांदीप, पारोळ, वज्रेश्वरी, गणेशपुरी भागातील अंदाजे साडेदहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सायंकाळी चार ते साडेसहा दरम्यान बंद असेल.च्येत्या चार-पाच दिवसात दुरुस्ती होऊन परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून संबंधित परिसरातील वीज ग्राहकांना करण्यात आले आहे.

टॅग्स :electricityवीजVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र