शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

शिवसेना-राष्ट्रवादीचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:22 IST

पंचायत समिती निवडणूक । पाच ठिकाणी महाआघाडी, दोन पं.स.मध्ये सेना-भाजप एकत्र

पालघर : जिल्ह्यातील आठही पंचायत समितीमध्ये सभापती-उपसभापती निवड करताना राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अवलंबला गेल्याने शिवसेना-राष्ट्रवादीने एकूण पाच पंचायत समितीवर आपले वर्चस्व सिद्ध केले. तर दोन ठिकाणी शिवसेना-भाजपला तडजोड करीत सत्ता स्थापन करावी लागली तर अन्य तलासरीमध्ये माकपने आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले.

जिल्ह्यातील पालघर, मोखाडा, विक्रमगड, वाडा, डहाणू, जव्हार, तलासरी व वसई अशा आठ पंचायत समितीच्या निवडणुका ७ जानेवारी रोजी पार पडल्या होत्या. ८ जानेवारीला मतमोजणी झाल्यानंतर एकंदरीत सर्व चित्र स्पष्ट झाले होते. मोखाडा पंचायत समितीच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला पाच तर राष्ट्रवादी पक्षाचा एक उमेदवार निवडून आला होता.वाडा पंचायत समितीच्या १२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना ४, राष्ट्रवादी ४, भाजप २, मनसे एक आणि अपक्ष एक असे सदस्य निवडून आले होते. त्यामुळे सेना-राष्ट्रवादी पक्षाला बहुमत प्राप्त झाले होते.

वसई पंचायत समितीच्या एकूण आठ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना ३, बविआ ३ तर भाजप दोन असे बलाबल झाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. या वेळी राज्यातील सत्तेच्या बिघडलेल्या संबंधाचा विचार न करता शिवसेना-भाजपने युती करून बहुजन विकास आघाडीला बाजूला सारण्यात यश मिळवले. विक्रमगड पंचायत समितीच्या १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी चार, भाजपा दोन, शिवसेना एक एक, माकड एक तर दोन अपक्ष असे बलाबल होते. डहाणू पंचायत समितीच्या २६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी ९, शिवसेना ८, भाजप ७, माकपा २ असे बलाबल होते. जव्हार पंचायत समितीच्या ८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप ४, शिवसेना ३ तर माकपा एक असे बलाबल होते.तलासरी पंचायत समितीच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आठ जागा जिंकल्या तर भाजपने दोन जागा जिंकल्याने माकप तलासरी पंचायत समितीवर एक हाती सत्ता प्रस्थापित केली. त्यामुळे सभापती आणि उपसभापतीपदी माकपच्याच उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.पालघरचे उपसभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसलापालघर तालुक्यात ३४ गणांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला २३, राष्ट्रवादीला २, बविआ ४, भाजप २, मनसे १ व अपक्ष एक असे सदस्य निवडून येत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली होती.सभापती-उपसभापती या दोन्ही जागांवर शिवसेनेचे सदस्य विराजमान होतील, अशी शक्यता होती. मात्र शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार उपसभापती राष्ट्रवादीला सोडण्यात आल्याचे समजते.सभापतीपदासाठी सेनेच्या रंजना म्हसकर यांचा एकमेव अर्ज आला होता तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे चेतन पाटील व सेनेचे मुकेश पाटील यांचे अर्ज होते. परंतु मुकेश पाटील यांनी अर्ज मागे घेतला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार