शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शिवसेना-राष्ट्रवादीचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:22 IST

पंचायत समिती निवडणूक । पाच ठिकाणी महाआघाडी, दोन पं.स.मध्ये सेना-भाजप एकत्र

पालघर : जिल्ह्यातील आठही पंचायत समितीमध्ये सभापती-उपसभापती निवड करताना राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अवलंबला गेल्याने शिवसेना-राष्ट्रवादीने एकूण पाच पंचायत समितीवर आपले वर्चस्व सिद्ध केले. तर दोन ठिकाणी शिवसेना-भाजपला तडजोड करीत सत्ता स्थापन करावी लागली तर अन्य तलासरीमध्ये माकपने आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले.

जिल्ह्यातील पालघर, मोखाडा, विक्रमगड, वाडा, डहाणू, जव्हार, तलासरी व वसई अशा आठ पंचायत समितीच्या निवडणुका ७ जानेवारी रोजी पार पडल्या होत्या. ८ जानेवारीला मतमोजणी झाल्यानंतर एकंदरीत सर्व चित्र स्पष्ट झाले होते. मोखाडा पंचायत समितीच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला पाच तर राष्ट्रवादी पक्षाचा एक उमेदवार निवडून आला होता.वाडा पंचायत समितीच्या १२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना ४, राष्ट्रवादी ४, भाजप २, मनसे एक आणि अपक्ष एक असे सदस्य निवडून आले होते. त्यामुळे सेना-राष्ट्रवादी पक्षाला बहुमत प्राप्त झाले होते.

वसई पंचायत समितीच्या एकूण आठ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना ३, बविआ ३ तर भाजप दोन असे बलाबल झाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. या वेळी राज्यातील सत्तेच्या बिघडलेल्या संबंधाचा विचार न करता शिवसेना-भाजपने युती करून बहुजन विकास आघाडीला बाजूला सारण्यात यश मिळवले. विक्रमगड पंचायत समितीच्या १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी चार, भाजपा दोन, शिवसेना एक एक, माकड एक तर दोन अपक्ष असे बलाबल होते. डहाणू पंचायत समितीच्या २६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी ९, शिवसेना ८, भाजप ७, माकपा २ असे बलाबल होते. जव्हार पंचायत समितीच्या ८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप ४, शिवसेना ३ तर माकपा एक असे बलाबल होते.तलासरी पंचायत समितीच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आठ जागा जिंकल्या तर भाजपने दोन जागा जिंकल्याने माकप तलासरी पंचायत समितीवर एक हाती सत्ता प्रस्थापित केली. त्यामुळे सभापती आणि उपसभापतीपदी माकपच्याच उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.पालघरचे उपसभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसलापालघर तालुक्यात ३४ गणांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला २३, राष्ट्रवादीला २, बविआ ४, भाजप २, मनसे १ व अपक्ष एक असे सदस्य निवडून येत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली होती.सभापती-उपसभापती या दोन्ही जागांवर शिवसेनेचे सदस्य विराजमान होतील, अशी शक्यता होती. मात्र शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार उपसभापती राष्ट्रवादीला सोडण्यात आल्याचे समजते.सभापतीपदासाठी सेनेच्या रंजना म्हसकर यांचा एकमेव अर्ज आला होता तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे चेतन पाटील व सेनेचे मुकेश पाटील यांचे अर्ज होते. परंतु मुकेश पाटील यांनी अर्ज मागे घेतला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार