शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

स्थलांतरितांच्या पाल्यांचा ‘आसरा’; डहाणूत अभिनव प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 23:51 IST

विद्यार्थ्यांना घडविण्याचा उपक्रम

- अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी : तालुक्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर असल्याने पोटापाण्यासाठी गावोगावी भटकणाऱ्या आदिवासी समाजातील नागरिकांना घरदार सोडून वर्षातील आठ महिने स्थलांतर करावे लागते. त्यामुळे त्यांच्या पाल्यांचे शिक्षण अर्धवट सुटून बालमजुरी, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, बालविवाह आदी समस्यांच्या गर्तेत भावी पिढी ओढली जाते. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी डहाणू तालुक्यात पेन्स सहयोग फाऊंडेशनतर्फे‘आसरा’ हा उपक्र म राबविण्यात येत आहे.तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये वर्षभर रोजगाराचा प्रश्न भेडसावत असल्याने पावसाळ्यातील चार महिने वगळता ही कुटुंबे वीटभट्टी, बांधकाम व्यवसाय, मासेमारी तसेच शेती बागायतीत मजुरीसाठी स्थलांतरित होतात. त्यामुळे त्या कुटुंबातील मुलांना शिक्षण अर्ध्यावर सोडून जावे लागते. ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी जशा शाळा चालविल्या जातात, तसा प्रकार इथे दिसत नाही. किंवा शासनाने त्यासाठी राबविलेले उपक्रम तितके प्रभावी ठरत नाहीत. एकदा पालकांसोबत रोजगार मिळवण्यासाठी फिरण्याची सवय लागली की, त्या विद्यार्थ्यांचे मत शाळेच्या चार भिंतीत रमत नसल्याने शाळाबाह्य विद्यार्थी, गळती आदी प्रश्न निर्माण होऊन त्यांचे शिक्षण अर्ध्यावर संपते. त्यामुळे बालमजुरी, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, बालविवाह आदी समस्यांच्या गर्तेत भावी पिढी ओढली जाते. तालुक्यातील अशा स्थलांतरित पालकांच्या मुलांनी शाळा सोडून जाऊ नये यासाठी पेन्स सहयोग फाऊंडेशनतर्फे ‘आसरा’ हा उपक्र म हाती घेण्यात आला आहे. या कालावधीत अशा विद्यर्थ्यांना त्याच गावात अन्न आणि निवाºयाची सुविधा आसरा केंद्रात उपलब्ध होणार आहे. यासाठी गावातील विधवा तसेच वृद्धांच्या मदतीने हे केंद्र चालविले जाणार असून त्यांना फाउंडेशनतर्फे आर्थिक मोबदला दिला जाणार आहे, असे फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सावे यांनी सांगितले.पहिल्या टप्प्यात या तालुक्यातील दाभोण गावच्या पिलेनापाडा, सखदेवपाडा आणि पाटीलपाडा या तीन जिल्हा परिषद शाळा निवडण्यात आल्या आहेत. संस्थेचे स्वयंसेवक आणि शिक्षकांनी सर्व्हे केला असून आतापर्यंत ४५ विद्यार्थ्यांचे अर्ज योजनेसाठी प्राप्त झाले आहेत. तर आसरा सेंटर सुरू करण्यास २० इच्छुकांनी सहमती दर्शविली आहे.शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे भवितव्य शिक्षणाअभावी अंधारमय असते. त्यांना योग्यवेळी मदत आणि मार्गदर्शन करण्याचा हा उपक्र म आहे.- योगेश सावे, अध्यक्ष, पेन्स सहयोग फाउंडेशन