शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

मोखाडा तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; सहा गावपाडे तहानले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 23:43 IST

टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची प्रशासनाकडे मागणी

- रवींद्र साळवेमोखाडा : कुपोषण आणि पाणीटंचाईविषयी संवेदनशील असलेल्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात फेब्रुवारीच्या अखेरीसच पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील तीव्र पाणीटंचाईने होरपळणाऱ्या आसे ग्रामपंचायतीमधील सहा गावपाड्यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी पंचायत समिती प्रशासनाकडे केल्याने मोखाड्यात पाणीटंचाईची पहिली ठिणगी पडली आहे. दरम्यान, गतसाली मोखाड्यातील टंचाईग्रस्त गाव पाड्यांनी शंभरी ओलांडली होती.‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे मोखाड्यात प्रतिवर्षी जानेवारी अथवा फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईला सुरुवात होते. गतसाली जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पाणीटंचाईला सुरुवात झाली होती. तर ९ जानेवारीला पहिला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र, यंदा पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात झाल्याने समाधान व्यक्त केले जात होते, परंतु यंदा फेब्रुवारीच्या अखेरीस टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी झाली आहे. गतसाली पाणीटंचाईने मोखाडा तालुका होरपळून निघाला होता. ११६ गावपाड्यांना २७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदाही ऊन्हाची तीव्रता वाढू लागताच टंचाईला सुरुवात झाली आहे.टंचाईग्रस्त गावपाड्यांची टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी येताच, त्यांची तातडीने तहसीलदार विजय शेट्ट्ये, गटविकास अधिकारी संगीता भांगरे व पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. गावपाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आला आहे. शासनाच्या धोरणानुसार टंचाईग्रस्त गावपाड्यांची पाहणी केल्यानंतर त्यांना ४८ तासाच्या आत टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अनिवार्य आहे. मात्र येथील आदिवासींना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.१ कोटी ८६ लाखाच्या टंचाई आराखड्याला मंजुरीया वर्षी २९ गावे आणि ७७ पाडे अशा एकूण १०६ टंचाईग्रस्त गावपाड्यांचा १ कोटी ८६ लाख रुपयांचा टंचाई आराखडा मोखाडा पंचायत समितीने जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला होता. या आराखड्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी दिली आहे. यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा, हातपंप, विहिरी अधिग्रहण करणे, विहिरीतील गाळ काढणे, विहिरी खोलीकरण करणे आदी कामांना मंजुरी देण्यात आली आहे.टंचाईग्रस्त गावपाड्यांची टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी येताच, संबंधित गावपाड्यांची पाहणी केली आहे. तसेच या गावड्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला आहे. - विजय शेट्ट्ये,तहसीलदार, मोखाडा.मोखाड्यात पाणीसाठ्याचे प्रकल्प तसेच बंधारे आहेत. त्यामध्ये पाणीसाठा देखील आहे. मात्र, प्रशासनाच्या नियोजनाअभावी तालुक्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात ठेकेदार अथवा अधिकाºयांनी कसुराई केली आणि टंचाईग्रस्त भागातील नागरिकांनी तक्र ार केल्यास त्यांची गय केली जाणार नाही.- सारिका निकम, सभापती, पंचायत समिती मोखाडा.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई