शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

मोखाडा तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; सहा गावपाडे तहानले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 23:43 IST

टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची प्रशासनाकडे मागणी

- रवींद्र साळवेमोखाडा : कुपोषण आणि पाणीटंचाईविषयी संवेदनशील असलेल्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात फेब्रुवारीच्या अखेरीसच पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील तीव्र पाणीटंचाईने होरपळणाऱ्या आसे ग्रामपंचायतीमधील सहा गावपाड्यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी पंचायत समिती प्रशासनाकडे केल्याने मोखाड्यात पाणीटंचाईची पहिली ठिणगी पडली आहे. दरम्यान, गतसाली मोखाड्यातील टंचाईग्रस्त गाव पाड्यांनी शंभरी ओलांडली होती.‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे मोखाड्यात प्रतिवर्षी जानेवारी अथवा फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईला सुरुवात होते. गतसाली जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पाणीटंचाईला सुरुवात झाली होती. तर ९ जानेवारीला पहिला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र, यंदा पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात झाल्याने समाधान व्यक्त केले जात होते, परंतु यंदा फेब्रुवारीच्या अखेरीस टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी झाली आहे. गतसाली पाणीटंचाईने मोखाडा तालुका होरपळून निघाला होता. ११६ गावपाड्यांना २७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदाही ऊन्हाची तीव्रता वाढू लागताच टंचाईला सुरुवात झाली आहे.टंचाईग्रस्त गावपाड्यांची टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी येताच, त्यांची तातडीने तहसीलदार विजय शेट्ट्ये, गटविकास अधिकारी संगीता भांगरे व पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. गावपाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आला आहे. शासनाच्या धोरणानुसार टंचाईग्रस्त गावपाड्यांची पाहणी केल्यानंतर त्यांना ४८ तासाच्या आत टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अनिवार्य आहे. मात्र येथील आदिवासींना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.१ कोटी ८६ लाखाच्या टंचाई आराखड्याला मंजुरीया वर्षी २९ गावे आणि ७७ पाडे अशा एकूण १०६ टंचाईग्रस्त गावपाड्यांचा १ कोटी ८६ लाख रुपयांचा टंचाई आराखडा मोखाडा पंचायत समितीने जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला होता. या आराखड्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी दिली आहे. यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा, हातपंप, विहिरी अधिग्रहण करणे, विहिरीतील गाळ काढणे, विहिरी खोलीकरण करणे आदी कामांना मंजुरी देण्यात आली आहे.टंचाईग्रस्त गावपाड्यांची टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी येताच, संबंधित गावपाड्यांची पाहणी केली आहे. तसेच या गावड्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला आहे. - विजय शेट्ट्ये,तहसीलदार, मोखाडा.मोखाड्यात पाणीसाठ्याचे प्रकल्प तसेच बंधारे आहेत. त्यामध्ये पाणीसाठा देखील आहे. मात्र, प्रशासनाच्या नियोजनाअभावी तालुक्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात ठेकेदार अथवा अधिकाºयांनी कसुराई केली आणि टंचाईग्रस्त भागातील नागरिकांनी तक्र ार केल्यास त्यांची गय केली जाणार नाही.- सारिका निकम, सभापती, पंचायत समिती मोखाडा.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई