शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शिव मंदिर तलावाशेजारी स्वतंत्र विसर्जन घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 22:54 IST

प्रदूषण रोखण्यासाठी उपक्रम : लोकसहभागातून काढला होता गाळ, दोन वर्षे सुरू होते काम

अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या मध्यभागी असलेल्या वडवली येथील शिव मंदिर तलावाची स्वच्छता करण्यासाठी आणि त्यातील गाळ काढण्यासाठी दोन वर्षे काम सुरू होते. लोकसहभागातून या तलावातील गाळ काढण्यात आल्यावर आता या तलावात पुन्हा प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. सोबत, या तलावाशेजारी असलेल्या ओढ्यामध्ये स्वतंत्र गणेश विसर्जनघाट तयार करून तलाव वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

वडवली गावाजवळील शिव मंदिर तलावातील गाळ काढण्यासाठी दोन वर्षे काम सुरू होते. या तलावातील गाळ काढण्यासाठी लोकसहभागातून ८० लाखांपेक्षा जास्तीचा निधी गोळा करण्यात आला. त्यातूनच या तलावातील गाळही निघाला. प्रत्येकाने आपापल्या परीने मदत करून या कामात हातभार लावला होता. काम मोठे असल्याने ते करण्यासाठी दोन वर्षे उलटली. जून २०१९ मध्ये हे काम पूर्ण करून तलाव भरण्यास सुरुवात झाली. पावसामुळे यंदा हा तलाव जुलै महिन्यातच भरून वाहू लागला. या तलावाच्या खाली आता १५ फूट जागा झाली असून त्याचे संवर्धन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पूर्वी या तलावात निर्माल्य उघड्यावर टाकण्यात येत होते. सोबत, गणपती आणि देवीच्या मूर्तीचे विसर्जन याच तलावात करण्यात येत होते. त्यामुळे तलावात प्लास्टर आॅफ पॅरिसचा मोठा थर तयार झाला. विसर्जनामुळे तलावात प्रदूषण वाढत असल्याने यंदा तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे आणि नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांच्या पुढाकाराने आता तलावाशेजारी वाहणाऱ्या ओढ्यामध्ये विसर्जनकुंड तयार करण्यात आले आहे. या ओढ्यातील स्वच्छ पाणी अडवण्यात आले असून या पाण्याची खोली सात फूट करण्यात आली आहे. त्यामुळे येथे लहानमोठे अशा दोन्ही प्रकारच्या गणेशमूर्तींचे विसर्जन सहजपणे केले जाते. तलावाचा एक भाग अंबरनाथ पालिकेत असून उर्वरित भाग बदलापूर पालिकेचा आहे. बदलापूर पालिका हद्दीतील तलावाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच विसर्जन घाट तयार करून तलावाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला आहे.स्वच्छतेसाठी तरुणांनी घेतला पुढाकारतलावाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे. सोबत विजेची व्यवस्था, बाकडे, पेव्हरब्लॉक लागून या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. शेजारी असलेल्या तलावाच्या मध्यभागी महादेवाची मूर्ती बसवण्यात आली असून त्याला रोषणाई करण्यात आली आहे. आज या तलावाच्या सौंदर्यात भर पडली असून हा तलाव स्वच्छ ठेवण्यासाठी याच भागातील तरुण मंडळी एकत्र आली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार