शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिव मंदिर तलावाशेजारी स्वतंत्र विसर्जन घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 22:54 IST

प्रदूषण रोखण्यासाठी उपक्रम : लोकसहभागातून काढला होता गाळ, दोन वर्षे सुरू होते काम

अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या मध्यभागी असलेल्या वडवली येथील शिव मंदिर तलावाची स्वच्छता करण्यासाठी आणि त्यातील गाळ काढण्यासाठी दोन वर्षे काम सुरू होते. लोकसहभागातून या तलावातील गाळ काढण्यात आल्यावर आता या तलावात पुन्हा प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. सोबत, या तलावाशेजारी असलेल्या ओढ्यामध्ये स्वतंत्र गणेश विसर्जनघाट तयार करून तलाव वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

वडवली गावाजवळील शिव मंदिर तलावातील गाळ काढण्यासाठी दोन वर्षे काम सुरू होते. या तलावातील गाळ काढण्यासाठी लोकसहभागातून ८० लाखांपेक्षा जास्तीचा निधी गोळा करण्यात आला. त्यातूनच या तलावातील गाळही निघाला. प्रत्येकाने आपापल्या परीने मदत करून या कामात हातभार लावला होता. काम मोठे असल्याने ते करण्यासाठी दोन वर्षे उलटली. जून २०१९ मध्ये हे काम पूर्ण करून तलाव भरण्यास सुरुवात झाली. पावसामुळे यंदा हा तलाव जुलै महिन्यातच भरून वाहू लागला. या तलावाच्या खाली आता १५ फूट जागा झाली असून त्याचे संवर्धन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पूर्वी या तलावात निर्माल्य उघड्यावर टाकण्यात येत होते. सोबत, गणपती आणि देवीच्या मूर्तीचे विसर्जन याच तलावात करण्यात येत होते. त्यामुळे तलावात प्लास्टर आॅफ पॅरिसचा मोठा थर तयार झाला. विसर्जनामुळे तलावात प्रदूषण वाढत असल्याने यंदा तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे आणि नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांच्या पुढाकाराने आता तलावाशेजारी वाहणाऱ्या ओढ्यामध्ये विसर्जनकुंड तयार करण्यात आले आहे. या ओढ्यातील स्वच्छ पाणी अडवण्यात आले असून या पाण्याची खोली सात फूट करण्यात आली आहे. त्यामुळे येथे लहानमोठे अशा दोन्ही प्रकारच्या गणेशमूर्तींचे विसर्जन सहजपणे केले जाते. तलावाचा एक भाग अंबरनाथ पालिकेत असून उर्वरित भाग बदलापूर पालिकेचा आहे. बदलापूर पालिका हद्दीतील तलावाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच विसर्जन घाट तयार करून तलावाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला आहे.स्वच्छतेसाठी तरुणांनी घेतला पुढाकारतलावाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे. सोबत विजेची व्यवस्था, बाकडे, पेव्हरब्लॉक लागून या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. शेजारी असलेल्या तलावाच्या मध्यभागी महादेवाची मूर्ती बसवण्यात आली असून त्याला रोषणाई करण्यात आली आहे. आज या तलावाच्या सौंदर्यात भर पडली असून हा तलाव स्वच्छ ठेवण्यासाठी याच भागातील तरुण मंडळी एकत्र आली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार