शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शिव मंदिर तलावाशेजारी स्वतंत्र विसर्जन घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 22:54 IST

प्रदूषण रोखण्यासाठी उपक्रम : लोकसहभागातून काढला होता गाळ, दोन वर्षे सुरू होते काम

अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या मध्यभागी असलेल्या वडवली येथील शिव मंदिर तलावाची स्वच्छता करण्यासाठी आणि त्यातील गाळ काढण्यासाठी दोन वर्षे काम सुरू होते. लोकसहभागातून या तलावातील गाळ काढण्यात आल्यावर आता या तलावात पुन्हा प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. सोबत, या तलावाशेजारी असलेल्या ओढ्यामध्ये स्वतंत्र गणेश विसर्जनघाट तयार करून तलाव वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

वडवली गावाजवळील शिव मंदिर तलावातील गाळ काढण्यासाठी दोन वर्षे काम सुरू होते. या तलावातील गाळ काढण्यासाठी लोकसहभागातून ८० लाखांपेक्षा जास्तीचा निधी गोळा करण्यात आला. त्यातूनच या तलावातील गाळही निघाला. प्रत्येकाने आपापल्या परीने मदत करून या कामात हातभार लावला होता. काम मोठे असल्याने ते करण्यासाठी दोन वर्षे उलटली. जून २०१९ मध्ये हे काम पूर्ण करून तलाव भरण्यास सुरुवात झाली. पावसामुळे यंदा हा तलाव जुलै महिन्यातच भरून वाहू लागला. या तलावाच्या खाली आता १५ फूट जागा झाली असून त्याचे संवर्धन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पूर्वी या तलावात निर्माल्य उघड्यावर टाकण्यात येत होते. सोबत, गणपती आणि देवीच्या मूर्तीचे विसर्जन याच तलावात करण्यात येत होते. त्यामुळे तलावात प्लास्टर आॅफ पॅरिसचा मोठा थर तयार झाला. विसर्जनामुळे तलावात प्रदूषण वाढत असल्याने यंदा तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे आणि नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांच्या पुढाकाराने आता तलावाशेजारी वाहणाऱ्या ओढ्यामध्ये विसर्जनकुंड तयार करण्यात आले आहे. या ओढ्यातील स्वच्छ पाणी अडवण्यात आले असून या पाण्याची खोली सात फूट करण्यात आली आहे. त्यामुळे येथे लहानमोठे अशा दोन्ही प्रकारच्या गणेशमूर्तींचे विसर्जन सहजपणे केले जाते. तलावाचा एक भाग अंबरनाथ पालिकेत असून उर्वरित भाग बदलापूर पालिकेचा आहे. बदलापूर पालिका हद्दीतील तलावाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच विसर्जन घाट तयार करून तलावाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला आहे.स्वच्छतेसाठी तरुणांनी घेतला पुढाकारतलावाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे. सोबत विजेची व्यवस्था, बाकडे, पेव्हरब्लॉक लागून या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. शेजारी असलेल्या तलावाच्या मध्यभागी महादेवाची मूर्ती बसवण्यात आली असून त्याला रोषणाई करण्यात आली आहे. आज या तलावाच्या सौंदर्यात भर पडली असून हा तलाव स्वच्छ ठेवण्यासाठी याच भागातील तरुण मंडळी एकत्र आली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार