शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

घाट रस्त्याची सुरक्षा अर्धवट

By admin | Updated: July 16, 2016 01:38 IST

अनेकदा मागणी करुन सार्वनिक बांधकाम विभागाने विक्रमगड जव्हार या महामार्गावर संरक्षण कठडे आणि दरीच्या ठिकाणी साईड पत्रे लावले असले तरी

विक्रमगड : अनेकदा मागणी करुन सार्वनिक बांधकाम विभागाने विक्रमगड जव्हार या महामार्गावर संरक्षण कठडे आणि दरीच्या ठिकाणी साईड पत्रे लावले असले तरी अशा वळणांवर किंवा दरीच्या जागी सुरक्षेकडे दुर्लक्ष केले आहे. या कारभारामुळे पावसाळ्यात मोठे अपघात घडू शकतात. जांभाजा पळूच्या वळणावर दरी असून या ठिकाणी संरक्षक कठडा नसल्याने वाहनांसाठी ते धोकादायक बनले आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एक कार कोसळली आहे. या शिवाय साखरे गावाच्या वळणावर सुद्धा संरक्षक पत्र्याची आवश्यकता होती. उंबरवांगच्या मागे मोरी असून या ठिकाणी संरक्षक कठडा आवश्यक होता. काशिवली गावाच्या पुढे वळणावर संरक्षक कठडा किंवा पत्र्यांची आवश्यकता होती. विक्रमगड-जव्हार या दोन्ही शहरामध्ये २५ कि.मी. चा घाट असून वळण्याच्या ठिकाणी किंवा खोल दरीसारख्या भागावर संरक्षक कठडा किंवा खोल खांब लावण्याची मागणी अनेक दिवसापासून होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली असून घाट वळणात व खोल दरीच्या ठिकणी साईड पत्रा संरक्षणसाठी लावण्यात आला आहे. परंतु हे संरक्षण खांब व पत्रा अनेक ठिकाणी लावण्यात आलेले नसून या मार्गावर अद्यापही अनेक ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र आहे.याबाबत सार्वजनिक बांधकाम उपअभियंता एस.ससाणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. विक्रमगड-जव्हार मुख्य रस्ता असून या घाटात अनेक अपघात झाले आहेत . शिवाय जव्हार हे पर्यटन क्षेत्र असल्याने वाहनाची संख्याही जास्त आहे. पावसाळ्यात हौशी प्रवासी तर हिवाळ्यात शैक्षणिक सहली याच मार्गावरुन प्रवास करतात. तरी याबाबत विभागातील कार्यकारी अभियंता यांनी लक्ष देवून अजूनही ज्या भागात आवश्यकता आहे त्या भागात सरंक्षक खांब लावण्याची मागणी वाहन चालकानी केली आहे. (वार्ताहर)