शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

हंगामी वसतिगृह योजना बंद ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 02:49 IST

पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा या अतिदुर्गम तालुक्यातील व रोजगारासाठी स्थलांतरीत होणाºया आदिवासींच्या मुलामुलींसाठी चालविली जाणारी हंगामी वसतीगृहे बंद होण्याची शक्यता आहे.

- हुसेन मेमन

जव्हार : पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा या अतिदुर्गम तालुक्यातील व रोजगारासाठी स्थलांतरीत होणा-या आदिवासींच्या मुलामुलींसाठी चालविली जाणारी हंगामी वसतीगृहे बंद होण्याची शक्यता आहे.या कुटुंबांना पावसाळ्यातील शेतीची कामे आटोपल्यावर रोजगराचे कुठलेच साधन राहत नाही. त्यामुळे त्यांना रोजगारासाठी भिवंडी, ठाणे, पालघर येथे स्थलांतरीत व्हावे लागत असून त्यांची मुलेही त्यांच्याबरोबर शिक्षण सोडून स्थलांतर करतात. त्यामुळे या मुलांनी शिक्षण घ्यायचे कसे? असा प्रश्न निर्माण होतो.आदिवासी कुटुंबातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाकडून हंगामी निवासी वसतीगृह योजना सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे पालक स्थलांतरीत झाले तरी त्यांची मुले वसतिगृहात राहून शिक्षण घेतात. तिथेच त्यांना नाश्ता, सकाळ, संध्याकाळचे जेवण तसेच शालोपयोगी साहित्य आणि दररोज लागणारे पेस्ट, साबण, तेल असे साहित्यही पुरविले जायचे. या योजनेमुळे रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या पालकांना मोठा दिलासा मिळायचा. मात्र हल्ली प्रशासनाच्या अनेक जाचक अटींमुळे बरेच मुख्याध्यापक हंगामी वस्तीगृहाचे प्रस्ताव तयारच करीत नाहीत. काही अघटित प्रकार घडल्यास मुख्याध्यापकास जबाबदार धरले जात असल्याने बहुतांश मुख्याध्यापक आणि शिक्षक या भानगडीत पडत नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. जि.प. परिषद शाळा मुख्याध्यापक स्थलांतरीत हंगामी मुलांच्या वसतिगृहाचा प्रस्ताव पाठवायला यामुळेच धजावत नसल्याचेही शिक्षकांनी सांगितले. त्याने ही योजना आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे.दोन महिने झाले तरी प्रस्तावांना मंजुरी नाहीजव्हार तालुक्यातून २ महिन्यापूर्वी कायरी आणि रोजपाडा या दोन शाळांनी हंगामी वस्तीगृहांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले होते. परंतु दोन महिने उलटून गेल्यानंतरही त्यांना शिक्षण विभागाने मंजुरी दिलेली नाही. या योजनेचा थेट फायदा स्थलांतरीत आदिवासींच्या मुलांनाच होत असून,यांत अधिकाºयांना कोणताच फायदा मिळत नसल्याने जाणीवपूर्वक या प्रस्तावांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी व मुलांच्या पालकांनी केला आहे. या प्रस्तावास दोन महिने लोटल्यानंतरही मंजुरी न मिळल्याच्या या पार्श्वभूमीवर स्थानिकांच्या या आरोपास पुष्टी मिळत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार