शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

वानगावच्या किनारपट्टीवर सागरी सुरक्षाकवच

By admin | Updated: April 29, 2017 01:19 IST

डहाणूच्या वानगाव ठाण्याच्या हद्दीतील किनारपट्टीवरील सागरी सुरेक्षेचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी सुरु झालेले सागरी सुरक्षा कवच

डहाणू : डहाणूच्या वानगाव ठाण्याच्या हद्दीतील किनारपट्टीवरील सागरी सुरेक्षेचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी सुरु झालेले सागरी सुरक्षा कवच अभियान शुक्रवारी संध्याकाळी पूर्ण झाले. या अंतर्गत चिंचणी, सरकारी, आंबा येथील सागरी चौकात असलेल्या पोलिसांनी २०० वाहनांची तपासणी केली. शिवाय चिंचणीपासून डहाणूपर्यतच्यागावातील बोटी उतरण्याच्या ठिकाणांवर नाकाबंदी करुन बोटी तपासण्यात आल्या.दहशतवादी हल्ला सागरी मार्गाने होण्याची शक्यता गृहीत धरुन सागरी किनारपट्टीवर पोलीस अधीक्षक शारदा राऊत यांच्या आदेशाने सागरी सुरक्षाकवच अभियान घेण्यात आले होते. वानगावचे पोलीस निरीखक अरुण फोंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेले हे सागरी कवच गुरुवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस घेण्यात आले. या अभियानात किनारपट्टीवरील चिंचणी, दांडेपाडा, गुंगवाडा डहाणू येथील सागरी तटरक्षक दलाची ही तपासणी घेण्यात आली. याशिवाय चिंचणीपासून डहाणू परिसराच्या किनारपट्टी वर गस्त घालताना संशयास्पद बोटींची तपासणी करण्यात आली. तसेच टेहळणी मनोऱ्यावरुन आढावा घेण्यात आला. त्याबरोबरच वानगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हॉटेल्स, लॉजेस तसेच महत्त्वाच्या ठिकाणी तपासणी करण्यात आली. (वार्ताहर)