शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वाडा पंचायत समितीत भात बियाणांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 01:28 IST

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतांना वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे भातबियाणांचा तुटवडा आहे. शेकडो शेतकरी कृषी विभागाच्या कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत.

वाडा : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतांना वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे भातबियाणांचा तुटवडा आहे. शेकडो शेतकरी कृषी विभागाच्या कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत. मात्र बियाणांचा तुटवडा असल्याने शेतकरी नाराज असून या गलथान कारभारावर तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथील वाडा कोलम हा भाताचा वाण देशभर प्रसिद्ध आहे. वाडा कोलम या भाताच्या वाणाला मुंबईच्या बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. तालुक्यात १४ हजार हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड केली जाते. झिनी, गुजरात ४ , गुजरात ११, रूपाली, दप्तरी, कर्जत ५, कर्जत ७, सुवर्णा, पूनम आदी भाताच्या वाणाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. भात हे येथील मुख्य पिक आहे. असे असताना वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे आताच्या घडीला कोणतेच बियाणे शिल्लक नसल्याने तालुक्यातील शेकडो शेतकरी या विभागाकडे हेलपाटे मारत आहेत. हजारो हेक्टर भातशेती येथे केली जात असतांना बियाणांचा येथे पत्ताच नसल्याने शेतकरी कृषी प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत आहेत. कृषी विभागाकडे बियाणे हे पन्नास टक्के सवलतीच्या दरात मिळते.शेतकऱ्याची होते लूटशेतकरी पंचायत समितीमार्फत दिल्या जाणाºया बियाणांना पसंती देतात. मात्र यावर्षी पंचायत समितीच्या कृषी विभागाने शासनाकडे काही टन बियाणांची मागणी करूनही फक्त १५० क्विंटल कर्जत हेच बियाणे येऊन ते संपलेही त्यामुळे बियाणांसाठी शेतकरी कृषी विभागाकडे हेलपाटे मारत आहेत. वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाची उदासीनता यावरून दिसून येते. त्यामुळे शेतकºयांना व्यापाºयांकडून महागडे बियाणे खरेदी करावे लागते आहे.१०९ वाणाचे १५ क्विंटल भात बियाणे आले होते.त्याचे वाटप शेतकºयांना करून झाले आहे. आता बियाणे शिल्लक नाही. - आर. आर. जाधव,कृषी अधिकारी, पंचायत समिती, वाडापावसाळ्याला आता काही दिवस उरले असताना पंचायत समिती सांगते आहे, की कृषी विभागाकडे बियाणांचा तुटवडा आहे. यावरून ती किती उदासीन आहे, हे दिसून येते.प्रशासन व कृषी सेवा केंद्रे यांचे साटेलोटे असल्याने कृषी विभाग जास्त बियाणे मागवत नाही.याची चौकशी होणे गरजेचे आहे. -प्रफुल्ल पाटील, युवा शेतकरी नेते

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार