शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
4
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
6
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
7
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
8
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
9
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
10
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
11
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
12
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
13
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
14
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
16
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
17
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
18
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
19
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
20
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर

वाडा पंचायत समितीत भात बियाणांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 01:28 IST

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतांना वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे भातबियाणांचा तुटवडा आहे. शेकडो शेतकरी कृषी विभागाच्या कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत.

वाडा : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतांना वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे भातबियाणांचा तुटवडा आहे. शेकडो शेतकरी कृषी विभागाच्या कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत. मात्र बियाणांचा तुटवडा असल्याने शेतकरी नाराज असून या गलथान कारभारावर तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथील वाडा कोलम हा भाताचा वाण देशभर प्रसिद्ध आहे. वाडा कोलम या भाताच्या वाणाला मुंबईच्या बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. तालुक्यात १४ हजार हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड केली जाते. झिनी, गुजरात ४ , गुजरात ११, रूपाली, दप्तरी, कर्जत ५, कर्जत ७, सुवर्णा, पूनम आदी भाताच्या वाणाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. भात हे येथील मुख्य पिक आहे. असे असताना वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे आताच्या घडीला कोणतेच बियाणे शिल्लक नसल्याने तालुक्यातील शेकडो शेतकरी या विभागाकडे हेलपाटे मारत आहेत. हजारो हेक्टर भातशेती येथे केली जात असतांना बियाणांचा येथे पत्ताच नसल्याने शेतकरी कृषी प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत आहेत. कृषी विभागाकडे बियाणे हे पन्नास टक्के सवलतीच्या दरात मिळते.शेतकऱ्याची होते लूटशेतकरी पंचायत समितीमार्फत दिल्या जाणाºया बियाणांना पसंती देतात. मात्र यावर्षी पंचायत समितीच्या कृषी विभागाने शासनाकडे काही टन बियाणांची मागणी करूनही फक्त १५० क्विंटल कर्जत हेच बियाणे येऊन ते संपलेही त्यामुळे बियाणांसाठी शेतकरी कृषी विभागाकडे हेलपाटे मारत आहेत. वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाची उदासीनता यावरून दिसून येते. त्यामुळे शेतकºयांना व्यापाºयांकडून महागडे बियाणे खरेदी करावे लागते आहे.१०९ वाणाचे १५ क्विंटल भात बियाणे आले होते.त्याचे वाटप शेतकºयांना करून झाले आहे. आता बियाणे शिल्लक नाही. - आर. आर. जाधव,कृषी अधिकारी, पंचायत समिती, वाडापावसाळ्याला आता काही दिवस उरले असताना पंचायत समिती सांगते आहे, की कृषी विभागाकडे बियाणांचा तुटवडा आहे. यावरून ती किती उदासीन आहे, हे दिसून येते.प्रशासन व कृषी सेवा केंद्रे यांचे साटेलोटे असल्याने कृषी विभाग जास्त बियाणे मागवत नाही.याची चौकशी होणे गरजेचे आहे. -प्रफुल्ल पाटील, युवा शेतकरी नेते

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार