शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

डहाणूतील मिरची उत्पादकांना भेडसावते मजुरांची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:19 IST

शेतकऱ्यांची चिंता वाढली : अन्य व्यवसायामुळे मजुरांची विभागणी

अनिरुद्ध पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू/बोर्डी : रब्बी हंगामातील मिरची उत्पादनासाठी डहाणू तालुका प्रसिद्ध आहे. पहिल्या टप्प्यातल्या उत्पादनाला प्रारंभ झाला असून मे अखेरपर्यंत हा हंगाम राहतो. मात्र, याच काळात अन्य व्यवसायासाठी मजुरांची मागणी कमालीची वाढत असल्याने मिरची तोड मजुरांचा तुटवडा भासून शेतकऱ्यांसमोरील अडचण वाढते आहे.

डहाणू तालुका कृषी विभागाअंतर्गत डहाणू, वाणगाव आणि कासा या तीन मंडळांचा समावेश आहे. प्रत्येक मंडळात बारा सजा असून ८५ ग्रामपंचायती मिळून १७४ गावे आहेत. गेल्या दशकापासून तालुक्यात मिरची लागवडीच्या क्षेत्रात वाढ होऊन ते ९५०.५० हेक्टर झाले आहे. त्यापैकी ठिबक सिंचनाखाली ८५०.२० हेक्टर आहे. वाणगाव मंडळात या पिकाची शेती अत्याधुनिक पद्धतीने केली जाते. येथील प्रगतीशील शेतकºयांनी यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असून त्यांना मिळणारा आर्थिक नफा लाखोंच्या घरात आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन डहाणूसह जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही मिरची लागवडीचे प्रमाण वाढत आहे. या जिल्ह्यात चिकू बागायती आणि मासेमारी व्यवसायाप्रमाणेच मिरची उत्पादनानेही कोट्यवधी रुपयांची अर्थव्यवस्था निर्माण केली आहे. ही सुखावह बाब असली तरी मजुरांची मागणी आणि पुरवठ्याचे प्रमाण व्यस्त असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.

जानेवारीपासून स्थानिक आणि परजिल्ह्यात बांधकाम व्यवसाय तेजीत सुरू होऊन पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत मजुरांना वाढती मागणी असते. त्यांना तिपटीने मजुरी मिळत असल्याने शेतीसाठी मजुरांचा तुटवडा भासतो. मिरची पिकास लागवडीपासून औषध फवारणी, खत व्यवस्थापन, तण काढणीपेक्षा उत्पादनाला प्रारंभ झाल्यापासून प्रत्येक तोडणीला मजुरांची गरज मोठ्या संख्येने भासते. वातावरणात उष्णतेच्या वाढत्या प्रमाणामुळे योग्यवेळी तोडणी न केल्यास फळ लालसर होऊन दर कमी मिळतो. त्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे मध्ये उत्पादकांच्या अडचणीत अधिकच वाढ होते.

मजुरांचा तुटवडा का भासतो?जादा पैशांकरिता मिरची तोड मजूर अन्य व्यवसायकडे. महिला वर्गाची शेतीपेक्षा औद्योगिक वसाहतीत काम करण्यास पसंती. आदिवासी मजूर मिरची उत्पादक बनले तर काही गट शेती करू लागले. वाढत्या लग्न सराईसह विविध कार्यक्र मामुळे मजुरांची गैरहजेरी.