शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

सोसायट्यांच्या सावकारीतून शेतकऱ्यांना वाचवा - घोलप

By admin | Updated: June 12, 2016 00:40 IST

या तालुक्यातील शेतकरी खूप गरीब आहे. त्याला आर्थिक सवलतींच्या आधाराची गरज आहे असे असतांनाही त्याच्यावर सोसयट्यांच्या माध्यमातून कर्ज घेण्याची सक्ती केली जाते.

जव्हार : या तालुक्यातील शेतकरी खूप गरीब आहे. त्याला आर्थिक सवलतींच्या आधाराची गरज आहे असे असतांनाही त्याच्यावर सोसयट्यांच्या माध्यमातून कर्ज घेण्याची सक्ती केली जाते. या सोसायट्या जिल्हा अथवा राज्य बँकेकडून ९ टक्क्याने कर्ज घेतात आणि शेतकऱ्यांना ते १४ टक्क्याने देतात. सोसायट्यांची ही पठाणी सावकारी असून त्यातून शेतकऱ्यांना मुक्त करा अशी व्यथा येथे शनिवारी झालेल्या लोकमत आपल्यादारी या उपक्रमात शिवसेना शहरप्रमुख चित्रांगण घोलप यांनी मांडली.हा उपक्रम प्रगती कॉम्प्युटर्स, नेहरूचौक जव्हार येथे शनिवारी सकाळी संपन्न झाला. या यावेळी लोकमतच्या ठाणे व पालघर आवृत्तीचे निवासी संपादक नंदकुमार टेणी आणि वितरण विभागाचे सहायक महाव्यवस्थापक हारून शेख तसेच सुन्नि मुस्लिम ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष सैय्यद खलील कोतवाल, नगरसेवक गणेश रजपूत, संजय वांगड, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन सटानेकर, पत्रकार तुषार नगरकर, तुळशीराम चौधरी, श्याम राऊत, अल्ताफ मेमन, अभिनव व्होकेशनल, जव्हारचे संचालक आसीफ मुजावर, मोमीन कोतवाल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन लोकमतच्या वसई कार्यालयाचे असिस्टंट मॅनेजर उत्तम लोखंडे, यांनी केले तर कार्यक्रमासाठी संदीप सावळे, वितरण प्रतिनिधी लोकमत, पत्रकार हुसेन मेमन, योगेश रजपूत, रवि खुरकुटे, अलताफ मेमन यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)असंख्य समस्यांचा पडला पाऊस- रतन बुधर यांनी जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा हे तालुके ९९ % आदिवासी तालुके असुन आजही येथे कुपोषणाची समस्या कायम आहे, १९९२ सालीचा वावर वांगणीचा इतिहासामुळे जव्हारला उप जिल्हा रुग्णालय घोषीत करण्यात आले. मात्र आजही ते झालेले नाही. वावरला डॉक्टर नाही, नर्स नाही, तालुक्यात धरणे आहेत मात्र पिण्यासाठी पाणी नाही गरीब आदिवासी जनतेला पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. सुशिक्षीत मुले बेरोजगार आहेत, अशा मुलांकरीता रोजगार उपलध करून देणे, येथे हाताला काम नसल्यामुळे मोठ्याप्रमाणात स्थलांतर होत आहे. शिक्षणाचा व प्रवेशाचा मोठा प्रश्न येथे आहे, ही समस्या दुर करावी.- राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सुलोचना पालवे यांनी काळशेती सारखी मोठी धरणे असूनही पाणी मिळत नाही, ते मिळावे निराधार महिलांना दरमहा दिले जाणारे अनुदान वेळेवर दिले जावे, बचत गटांना सवलतीच्या दराने कर्ज मिळावे आदी महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले. रियाज मनियार - सन २०१४ च्या झालेल्या मिटींगमध्ये जव्हारचे ग्रामीण रूग्णालय वाडा येथे हलविण्याची खटपट सुरू आहे, परंतु त्याची खरी गरज जव्हार, मोखाडा, खोडाळा या अतिदुर्गम आदिवासी भागाला आहे, त्यामुळे जव्हारचे ग्रामीण रूग्णाल जव्हारच्या नगर परिषद हद्दीतच ठेवावे, तसेच अल्प संख्याकासाठी मोजकाच निधी दिला जातो, त्याची मर्यादा वाढवावी.दिनेश भट- जव्हार हा अनेक समस्यांच्या विळख्यात सापडलेला भाग आहे, पाणी, रोजगार, पर्यटन विकास, शेतकरी, उच्च शिक्षण गरज आहे, जि. प. शाळेत इ. ८ वी पर्यत वर्ग आहेत, त्यामुळे इ. ९ वी मध्ये प्रवेश मिळणे कठीण होते, परीणामी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. जव्हारच्या खडखड धरणाचे पाणी जव्हारमध्ये येणे गरजेचे आहे, तसेच अशा विविध समस्या मार्गी लावण्यासाठी लोकमतने जे पाऊल उचलले आहे, ते खुपच योग्य असून सर्व पक्षांनी एकत्र येऊन येथील समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे.