शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

समाधानकारक पावसामुळे भातशेती बहरली; यंदा पिकावर रोगाचे प्रमाण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:27 IST

चांगले उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना आशा

वाडा : गेल्या दोन महिन्यांपासून समाधानकारक व भातशेतीला उपयुक्त असा पाऊस पडत असल्याने भातशेती बहरली आहेत. या वर्षी पिकेचांगली येऊन उत्पन्न वाढण्याची आशा शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे बळीराजा आनंदला आहे. संततधार पावसामुळे आतापर्र्यंंत रोगांचे प्रमाणही कमी असल्याचे दिसून येत आहे.

वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथील वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. याबरोबरच गुजरात ४, गुजरात ११, सुरती, वायएसआर, जोरदार, कर्जत ३, कर्जत ४, पूनम आदी अनेक भाताच्या वाणांची लागवड शेतकरी करीत असून उत्पादन घेत असतात. तालुक्यात सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड केली जाते. तालुक्यातील भातशेती ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. येथे काही भाग वगळता सिंचनाची व्यवस्था नाही. यामुळे शेतकºयांना पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते.

या वर्षी भात लागवड केल्यापासून ते आतापर्यंत दररोज संततधार पाऊस पडत असल्याने भाताचे पीक चांगलेच बहरले आहे. संततधार पावसामुळे या वर्षी रोगाचे प्रमाणही अत्यंत कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पीक बहरले असून या वर्षी उत्पन्न चांगले येणार असल्याची आशा शेतकºयांना वाटत आहे. सर्वत्र हिरवीगार शेती पाहायला मिळत आहे. पावसाची उघडीप सुरू असल्याने भाताला पोषक वातावरण मिळत आहे. यामुळे शेतकरीही आनंदला आहे. तालुक्यात हळवे, गरवे व निमगरवे भात पीक घेतले जाते. सद्यस्थितीत हळवे भातपीक निसावायला (कणीस यायला) सुरुवात झाली आहे. पावसाने आणखी काही दिवस अशीच उघडीप दिल्यास चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा शेतकºयांमध्ये आहे.१५ हजार हेक्टरवर भाताची लागवडया वर्षी भातपिकाला आवश्यक असणारा पाऊस पडत असल्याने भातशेती चांगली आली आहे. सततच्या पावसामुळे भात बहरले आहे. दिवसांतून एक-दोन सरी आता येत असून त्या भातपिकाला योग्य अशाच आहेत. सततच्या पावसामुळे रोगाचे प्रमाणही कमी आहे. मात्र, यापुढे सर्व निसर्गावर अवलंबून आहे. - माधव हासे, तालुका कृषी अधिकारी, वाडा