शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

महावितरणचा ग्राहकांमागे वीजबिले भरण्यासाठी ससेमिरा; ग्राहक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 23:58 IST

वीजपुरवठा खंडित होण्याची टांगती तलवार :

सुरेश काटे 

तलासरी : तलासरी वीज परिमंडळाच्या अखत्यारीत ग्राहकांकडे साडेसात कोटी रुपयांची थकबाकी झाली असल्याने वीज थकबाकी भरण्यासाठी वीज कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून ससेमिरा सुरू झाला आहे. दरम्यान, राजकारण्यांच्या धरसोड धोरणामुळे वीजग्राहक संभ्रमात पडले असून वीजपुरवठा खंडित होण्याची टांगती तलवार ग्राहकांवर आहे.

कोरोनाच्या काळात वीज मीटरची रीडिंग न घेतल्याने सध्या ग्राहकांना भरमसाट वीजबिल आल्याने ग्राहक हादरून गेले आहेत. आधीच कोरोनाच्या काळात व्यापारधंदे बंद पडले, नोकऱ्या गेल्या, आता कुठे गाडी रुळावर येत असतानाच वीजबिलाचा शॉक ग्राहकांना बसत आहे.

कोरोनामुळे वीजबिल माफ करावे, त्यात सूट देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. राजकारण्यांनीही वीजबिल भरू नका, असे जनतेला सांगितल्याने ग्राहक द्विधा मनस्थितीत अडकले आहेत. बिल न भरल्याने थकबाकी वाढली आणि आता बिल भरण्याचा ससेमिरा मागे लागल्याने ग्राहक चिंताग्रस्त झाले आहेत.

वीजबिल भरू नका, सांगणारे राजकीय पक्षांचे पुढारी आता गप्प बसले आहेत. तलासरी तालुक्यात २७ हजार ९०० वीजग्राहक असून त्यामध्ये १५ हजार ग्राहक हे घरगुती कनेक्शनचे आहेत. या वीजग्राहकांची ५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. शेतीचे वीजग्राहक ५७९ असून त्यांच्याकडे १५ लाखांची वीज थकबाकी आहे. या शेती वीजग्राहकांना ५० टक्के वीजबिलात माफी देण्यात आली असून वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० टक्के वीजबिल माफी देण्यात येत आहे. दरम्यान, २४३ ग्राहक थकबाकीदार आहेत. 

वीजबिल भरून वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे, शेती वीजबिलात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. वीजचोरी करू नका, मागेल त्याला वीज मीटर देऊन वीजपुरवढा करण्यात येईल. - यादव इंगळे, उपअभियंता, वीज वितरण कंपनी, तलासरी

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण