शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

महावितरणचा ग्राहकांमागे वीजबिले भरण्यासाठी ससेमिरा; ग्राहक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 23:58 IST

वीजपुरवठा खंडित होण्याची टांगती तलवार :

सुरेश काटे 

तलासरी : तलासरी वीज परिमंडळाच्या अखत्यारीत ग्राहकांकडे साडेसात कोटी रुपयांची थकबाकी झाली असल्याने वीज थकबाकी भरण्यासाठी वीज कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून ससेमिरा सुरू झाला आहे. दरम्यान, राजकारण्यांच्या धरसोड धोरणामुळे वीजग्राहक संभ्रमात पडले असून वीजपुरवठा खंडित होण्याची टांगती तलवार ग्राहकांवर आहे.

कोरोनाच्या काळात वीज मीटरची रीडिंग न घेतल्याने सध्या ग्राहकांना भरमसाट वीजबिल आल्याने ग्राहक हादरून गेले आहेत. आधीच कोरोनाच्या काळात व्यापारधंदे बंद पडले, नोकऱ्या गेल्या, आता कुठे गाडी रुळावर येत असतानाच वीजबिलाचा शॉक ग्राहकांना बसत आहे.

कोरोनामुळे वीजबिल माफ करावे, त्यात सूट देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. राजकारण्यांनीही वीजबिल भरू नका, असे जनतेला सांगितल्याने ग्राहक द्विधा मनस्थितीत अडकले आहेत. बिल न भरल्याने थकबाकी वाढली आणि आता बिल भरण्याचा ससेमिरा मागे लागल्याने ग्राहक चिंताग्रस्त झाले आहेत.

वीजबिल भरू नका, सांगणारे राजकीय पक्षांचे पुढारी आता गप्प बसले आहेत. तलासरी तालुक्यात २७ हजार ९०० वीजग्राहक असून त्यामध्ये १५ हजार ग्राहक हे घरगुती कनेक्शनचे आहेत. या वीजग्राहकांची ५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. शेतीचे वीजग्राहक ५७९ असून त्यांच्याकडे १५ लाखांची वीज थकबाकी आहे. या शेती वीजग्राहकांना ५० टक्के वीजबिलात माफी देण्यात आली असून वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० टक्के वीजबिल माफी देण्यात येत आहे. दरम्यान, २४३ ग्राहक थकबाकीदार आहेत. 

वीजबिल भरून वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे, शेती वीजबिलात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. वीजचोरी करू नका, मागेल त्याला वीज मीटर देऊन वीजपुरवढा करण्यात येईल. - यादव इंगळे, उपअभियंता, वीज वितरण कंपनी, तलासरी

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण