शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
निवडणुकीत अजितदादांना शह द्यायला पार्थ पवार प्रकरण मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढले?; चर्चांना उधाण
5
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
6
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
7
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
8
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
9
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
10
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
11
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
12
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
13
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
14
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
15
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
16
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
17
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
18
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
20
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."

पावसाच्या पुनरागमनाने भाताला संजीवनी

By admin | Updated: July 27, 2015 22:57 IST

गेल्या २० जुलै पासून सुरु झालेल्या पावसाने भातपिकांना संजीवनी मिळण्याची शक्यता वाढली आहे. या पावसाच्या पुनरागमनाने बोर्डी, घोलवड, अस्वाली, कोसबाड, चिखले

घोलवड : गेल्या २० जुलै पासून सुरु झालेल्या पावसाने भातपिकांना संजीवनी मिळण्याची शक्यता वाढली आहे. या पावसाच्या पुनरागमनाने बोर्डी, घोलवड, अस्वाली, कोसबाड, चिखले, व आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, रखडलेल्या भात लावणीच्या कामाला सुरु वात झाली आहे. जून नंतर जुलै महिन्यात पाऊस होईल अशी अशा शेतकऱ्यांना होती. परंतु पावसाने तब्बल वीस दिवस ओढ दिल्याने भात शेतीवर त्याचा दुष्परिणाम होऊ लागला होता. या भागातील शेतकरी आपली शेती कशीबशी टिकवण्यासाठी प्रयत्न करीत होते. अनेकांनी उसने पाणी घेऊन तर काहींनी डीझेलपंप व बोअरींगच्या पाण्याचा आधार घेत भातशेती राखण्याचा प्रयत्न केला. परंतु बहुतांश ठिकाणी पाणीच नसल्याने या वर्षीची भातशेती वाया जाणार अशी शक्यता होती.एकीकडे पाऊस नाही तर दुसरीकडे कडक उन्हामुळे पिक करपू लागली होती. तर काही ठिकाणची भातरोपे पाण्याअभावी करपलीही. मात्र, पावसाची संततधार सुरु झाल्यास पिकांना दिलासा मिळणार आहे. मशागत करून भातपिकाच्या लावणीसाठी पावसाची वाट पाहत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या पावसाच्या पुनरागमनाने काही प्रमाणात का होईना शेतीला आधार मिळाला. त्यामुळे शेतकरी सावरला असला तरी पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी व त्याच्या कुटुंबाची मेहनत मात्र पणाला लागली असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. एकंदरीत पावसाबद्दल बळीराजा समाधानी आहे.