शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

संजय गांधी योजनेचा फज्जा ?

By admin | Updated: October 7, 2015 23:53 IST

जव्हार तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील पात्र १२०४ आदिवासी लाभार्थ्यांना जून, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर अशा ४ महिन्यांचे अनुदान न मिळाल्यामुळे त्यांच्यावर

जव्हार : जव्हार तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील पात्र १२०४ आदिवासी लाभार्थ्यांना जून, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर अशा ४ महिन्यांचे अनुदान न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने निराधारांना आर्थिक आधार देवून उतार वयात कोणावरही अवलंबून राहता येवू नये, त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे म्हणून ही योजना अमलात आणली. परंतु लालफितीच्या कारभारामुळे जव्हार तालुक्यात या योजनेचा पुरता फज्जा उडाला आहे.शासकीय नियमानुसार महसूल कार्यालयाने दरमहा पात्र लाभार्थ्यांची यादी आणि अनुदानाची एकूण रक्कम याची महिन्याभरापूर्वी मंजुरी घेवून महिन्याच्या १ तारखेला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रकम जमा करायची असते. या योजनेतील लाभार्थ्यांला दरमहा ६०० रूपये अनुदान मिळते. जव्हार सारख्या अतिदुर्गम तालुक्यात आजही, अनेक भागात रस्ते पोहचलेच नाहीत त्यामुळे वयोवृद्ध, निराधार महिला आणि पुरूष पायपीट करून तर अनेकजण पदरमोड करून ६०० रूपयांच्या मानधनासाठी जव्हारला येतात. त्यांना जर महिन्याला ५ ते ६ वेळा यावे लागले तर त्यांचा येण्या जाण्याचा खर्च हा मानधनापेक्षा जात होतो. शासनाने प्रत्येक योजनेसाठी तालुका स्तरावर एक स्वतंत्र कमिटी स्थापन केली आहे. तहसीलदार सचिव असलेल्या या कमिटीवर अशासकीय सदस्य देखील असतात, दरमहा तहसीलदार प्रत्येक तिची मिटिंग घेवून नवीन लाभार्थी निवड, काही आक्षेप आहेत का?, योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांला वेळेवर मिळातो की नाही याबाबत आढावा घेत असतात. परंतु पालघर जिल्हा निर्मितीनंतर सर्व कमीटया बरखास्त झाल्यामुळे जव्हार तालुक्यात अनेक योजनांचा बोजवारा उडाला असल्यामुळे नवीन कमीट्या लवकरात लवकर नियुक्त कराव्यात अशी मागणी संजय गांधी योजना कमेटीचे माजी सदस्य श्याम राऊत यांनी केली आहे. (वार्ताहर)