शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

संजय गांधी योजनेचा फज्जा ?

By admin | Updated: October 7, 2015 23:53 IST

जव्हार तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील पात्र १२०४ आदिवासी लाभार्थ्यांना जून, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर अशा ४ महिन्यांचे अनुदान न मिळाल्यामुळे त्यांच्यावर

जव्हार : जव्हार तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील पात्र १२०४ आदिवासी लाभार्थ्यांना जून, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर अशा ४ महिन्यांचे अनुदान न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने निराधारांना आर्थिक आधार देवून उतार वयात कोणावरही अवलंबून राहता येवू नये, त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे म्हणून ही योजना अमलात आणली. परंतु लालफितीच्या कारभारामुळे जव्हार तालुक्यात या योजनेचा पुरता फज्जा उडाला आहे.शासकीय नियमानुसार महसूल कार्यालयाने दरमहा पात्र लाभार्थ्यांची यादी आणि अनुदानाची एकूण रक्कम याची महिन्याभरापूर्वी मंजुरी घेवून महिन्याच्या १ तारखेला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रकम जमा करायची असते. या योजनेतील लाभार्थ्यांला दरमहा ६०० रूपये अनुदान मिळते. जव्हार सारख्या अतिदुर्गम तालुक्यात आजही, अनेक भागात रस्ते पोहचलेच नाहीत त्यामुळे वयोवृद्ध, निराधार महिला आणि पुरूष पायपीट करून तर अनेकजण पदरमोड करून ६०० रूपयांच्या मानधनासाठी जव्हारला येतात. त्यांना जर महिन्याला ५ ते ६ वेळा यावे लागले तर त्यांचा येण्या जाण्याचा खर्च हा मानधनापेक्षा जात होतो. शासनाने प्रत्येक योजनेसाठी तालुका स्तरावर एक स्वतंत्र कमिटी स्थापन केली आहे. तहसीलदार सचिव असलेल्या या कमिटीवर अशासकीय सदस्य देखील असतात, दरमहा तहसीलदार प्रत्येक तिची मिटिंग घेवून नवीन लाभार्थी निवड, काही आक्षेप आहेत का?, योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांला वेळेवर मिळातो की नाही याबाबत आढावा घेत असतात. परंतु पालघर जिल्हा निर्मितीनंतर सर्व कमीटया बरखास्त झाल्यामुळे जव्हार तालुक्यात अनेक योजनांचा बोजवारा उडाला असल्यामुळे नवीन कमीट्या लवकरात लवकर नियुक्त कराव्यात अशी मागणी संजय गांधी योजना कमेटीचे माजी सदस्य श्याम राऊत यांनी केली आहे. (वार्ताहर)