शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

स्वच्छता सर्वेक्षणात महापालिका उपायुक्तांनाच जागोजागी आढळला बेकायदा प्लास्टिक पिशव्यांचा वापर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 15:56 IST

स्वच्छता सर्वेक्षण आलं कि महापालिका शहरात विशेष स्वच्छता मोहिमे सह प्रमुख विभाग आणि त्यातील अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देते . 

मीरारोड - स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ३० डिसेम्बर पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण मोहीम - २०२१ ची सुरवात महापालिकेने केली असून आरोग्य विभागाच्या उपायुक्तांना दुकानदार व फेरीवाले यांच्या कडे सर्रास बंदी असलेल्या  प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या आहेत . त्यांच्यावर कार्यवाही करत ६० हजारांचा दंड वसूल  पिशव्या जप्त केल्या गेल्या . 

स्वच्छता सर्वेक्षण आलं कि महापालिका शहरात विशेष स्वच्छता मोहिमे सह प्रमुख विभाग आणि त्यातील अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देते .  यंदा सुद्धा स्वच्छता सर्वेक्षण सुरु जाहीर होऊन ते ३० डिसेम्बर पर्यंत चालणार आहे . त्या अनुषंगाने आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी पालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांना विविध परिसरचे पालकत्व दिले आहे .

आरोग्य विभागाने शहरात स्वच्छता ठेवणे , लोकांनी ओला - सुका करणे , प्लास्टिक पिशव्या कारवाई करायची आहे . अतिक्रमण विभागाने रस्ते व पदपथ वरील अतिक्रमण , बेवारस वाहने हटवायची आहेत . बांधकाम विभागाने रस्त्यावरील डेब्रिज हटवून शौचालये स्वच्छ - दुरुस्त ठेवायची आहेत . पाणी पुरवठा विभागाने खड्डे बुजवणे , मलनिःस्सारण केंद्र सफाई करणे आदी कामे करायची आहेत .  वृक्ष प्राधिकरण , शिक्षण , नगररचना विभागांना सुद्धा त्यांच्या अखत्यारीतील कामांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत . 

स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ . संभाजी पानपट्टे यांनी त्यांच्या स्वच्छता निरीक्षक , कर्मचारी आदींसह मोहिमेस सुरवात केली असता त्यांना दुकानदार आणि फेरीवाले यांच्या कडे सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळून आला . शहरात प्लास्टिक पिशव्या आणि बंदी असलेल्या एकदा वापरातील प्लास्टिक वस्तूंची सर्रास विक्री आणि वापर होत असल्याच्या बातम्या लोकमत ने सातत्याने दिल्या होत्या . दुसरीकडे मात्र पालिका कारवाई करत असल्याचा दावा करत होती . परंतु पालिकेचा दावा हा कांगावा असल्याचे पानपट्टे यांच्या कारवाईने पुन्हा उघड झाले आहे . पानपट्टे यांनी प्लास्टिक पिशव्या ठेवणाऱ्या फेरीवाले आणि दुकानदार यांच्या कडून एकाच दिवसात ६० हजार रुपयांचा दंड वसूल करायला लावला . 

डॉ . संभाजी पानपट्टे ( उपायुक्त, आरोग्य ) - प्लास्टिक पिशव्या आणि अन्य बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंवर पालिका नियमित कारवाई करणार आहे . शहरात अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे . गेल्या वर्षी शहराचा देशात १९ वा तर महाराष्ट्रात चौथा क्रमांक आला होता. कचरा मुक्त शहर म्हणून तीन तारांकित तसेच हागणदारी मुक्त कार्यामुळे ओडीएफ ++ म्हणून गौरवण्यात आले होते. त्यामुळे या वर्षी प्रथम क्रमांक पटकावण्याकरिता महापालिका प्रयत्न करणार आहे . 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार