शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

स्वच्छता सर्वेक्षणात महापालिका उपायुक्तांनाच जागोजागी आढळला बेकायदा प्लास्टिक पिशव्यांचा वापर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 15:56 IST

स्वच्छता सर्वेक्षण आलं कि महापालिका शहरात विशेष स्वच्छता मोहिमे सह प्रमुख विभाग आणि त्यातील अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देते . 

मीरारोड - स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ३० डिसेम्बर पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण मोहीम - २०२१ ची सुरवात महापालिकेने केली असून आरोग्य विभागाच्या उपायुक्तांना दुकानदार व फेरीवाले यांच्या कडे सर्रास बंदी असलेल्या  प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या आहेत . त्यांच्यावर कार्यवाही करत ६० हजारांचा दंड वसूल  पिशव्या जप्त केल्या गेल्या . 

स्वच्छता सर्वेक्षण आलं कि महापालिका शहरात विशेष स्वच्छता मोहिमे सह प्रमुख विभाग आणि त्यातील अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देते .  यंदा सुद्धा स्वच्छता सर्वेक्षण सुरु जाहीर होऊन ते ३० डिसेम्बर पर्यंत चालणार आहे . त्या अनुषंगाने आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी पालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांना विविध परिसरचे पालकत्व दिले आहे .

आरोग्य विभागाने शहरात स्वच्छता ठेवणे , लोकांनी ओला - सुका करणे , प्लास्टिक पिशव्या कारवाई करायची आहे . अतिक्रमण विभागाने रस्ते व पदपथ वरील अतिक्रमण , बेवारस वाहने हटवायची आहेत . बांधकाम विभागाने रस्त्यावरील डेब्रिज हटवून शौचालये स्वच्छ - दुरुस्त ठेवायची आहेत . पाणी पुरवठा विभागाने खड्डे बुजवणे , मलनिःस्सारण केंद्र सफाई करणे आदी कामे करायची आहेत .  वृक्ष प्राधिकरण , शिक्षण , नगररचना विभागांना सुद्धा त्यांच्या अखत्यारीतील कामांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत . 

स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ . संभाजी पानपट्टे यांनी त्यांच्या स्वच्छता निरीक्षक , कर्मचारी आदींसह मोहिमेस सुरवात केली असता त्यांना दुकानदार आणि फेरीवाले यांच्या कडे सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळून आला . शहरात प्लास्टिक पिशव्या आणि बंदी असलेल्या एकदा वापरातील प्लास्टिक वस्तूंची सर्रास विक्री आणि वापर होत असल्याच्या बातम्या लोकमत ने सातत्याने दिल्या होत्या . दुसरीकडे मात्र पालिका कारवाई करत असल्याचा दावा करत होती . परंतु पालिकेचा दावा हा कांगावा असल्याचे पानपट्टे यांच्या कारवाईने पुन्हा उघड झाले आहे . पानपट्टे यांनी प्लास्टिक पिशव्या ठेवणाऱ्या फेरीवाले आणि दुकानदार यांच्या कडून एकाच दिवसात ६० हजार रुपयांचा दंड वसूल करायला लावला . 

डॉ . संभाजी पानपट्टे ( उपायुक्त, आरोग्य ) - प्लास्टिक पिशव्या आणि अन्य बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंवर पालिका नियमित कारवाई करणार आहे . शहरात अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे . गेल्या वर्षी शहराचा देशात १९ वा तर महाराष्ट्रात चौथा क्रमांक आला होता. कचरा मुक्त शहर म्हणून तीन तारांकित तसेच हागणदारी मुक्त कार्यामुळे ओडीएफ ++ म्हणून गौरवण्यात आले होते. त्यामुळे या वर्षी प्रथम क्रमांक पटकावण्याकरिता महापालिका प्रयत्न करणार आहे . 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार