शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

रेतीमाफियांच्या बोटी पेटवल्या

By admin | Updated: June 14, 2016 00:41 IST

पश्चिम रेल्वेच्या सफाळे-वैतरणा दरम्यानच्या पुलालगत प्रतिबंधित भागात जाऊन बेकायदेशीर रित्या रेती उत्खनन करण्याऱ्याना सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ४५ रेतीच्या बोटी

पालघर : पश्चिम रेल्वेच्या सफाळे-वैतरणा दरम्यानच्या पुलालगत प्रतिबंधित भागात जाऊन बेकायदेशीर रित्या रेती उत्खनन करण्याऱ्याना सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ४५ रेतीच्या बोटी जप्त करून त्या महसूल विभागाच्या कारवाईत आज जाळून टाकण्यात आल्या. यावेळी प्र्रांताधिकारी शिवाजी दावभट यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवाईमध्ये रेतीसाठेही जप्त करण्यात आले.पालघर जिल्हयाच्या निर्मितीनंतर मोठी मोठी रहिवासी संकुले उभी राहत असून अनेक ठिकाणी रेती उत्खनन व वाहतुकीला बंदी असल्याने रेतीची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चोरट्या व धोकादायक पध्दतीने रेती उत्खनन सुरू आहे.सफाळे-वैतरणा दरम्यानच्या वैतरणा खाडीवर उभारलेल्या पुलावरून मुंबई, गुजरात व दिल्ली इ. ठिकाणी प.रे. मध्ये रेल्वे, व उत्तर रेल्वेच्या सुमारे २५० रेल्वे ये जा करीत असतात. हा पूल ४० ते ५० वर्षापूर्वी बांधण्यात आले असून खारट पाणी व हवा तसेच रेल्वे ट्रेन्सच्या मोठ्या वर्दळीमुळे या पुलाचा काही भाग कमकुवत बनला होता. त्यामुळे नुकताच पश्चिम रेल्वेने या पुलाच्या दुरूस्तीसाठी मोठा जम्बो मेगाब्लॉक घेतला होता. दोन वर्षापूर्वीही वैतरणा पूल क्रमांक ९२ हा खचल्याने या पुलावरून २० ते ३० किमी प्रतितास इतक्या हळू वेगाने रेल्वे ट्रेन्स सोडल्या जात होत्या. या पुलाची दुरूस्ती करण्यात आल्यानंतर रेल्वेसेवा सुरळीत पणे सुरू झाली असती तरी रेतीचा भाव गगनाला भिडल्याने पुन्हा रेल्वेपुलाचा प्रतिबंधित भागात मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन सुरू केले होते. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला होता तसेच वाढीव वैतीपाड या बेटाच्या संरक्षण बंधाऱ्यालगत जबरदस्तीने रेती उत्खनन होऊन वाढीव बेटावर असणाऱ्या घराना धोका निर्माण झाला होता. वाढीव सरावली वैतीपाडा ग्रामपंचायती व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे तक्रार केली होती. (वार्ताहर) मनाई हुकूम बजावला होतासफाळे वैतरणा पुलाच्या सहाशे मीटरच्या प्रतिबंधित भागात कुणीही उत्खनन करू नये तरी खानिवडे, हेदवडे, चिमणे, काशिद, कोपर,खांदीप, उसगाव, नारिंगी, चिखले डोंगर, वुसराली, वैतरणा, खार्डी, डोलीव, शिरगावसह इतर भागातही रेती उत्खनन करणाऱ्यावर सक्त मनाई करण्यात येऊन त्यांच्या रेती उत्खननामुळे वैतरणा सफाळे पुलाला धोका निर्माण झाल्याची मनाई हुकूम बजावण्यात आला होता. या मनाई आदेशाबरहुकूम रेती उत्खनन करताना आठवून आल्यास राष्ट्रीय सुरक्षा कायदा १९०८ मोका १९९ अन्वये कारवाईचे आदेशही बजावण्यात आले होते.महिलांचा जमाव; वातावरण तंगमहसूल विभागाच्या या आदेशाकडे दुर्लक्ष करून वैतरणा सफाळे पुलाच्या अगदी जवळ दिवसाढवळया रेती उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सोमवारी उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शिवाजी दावभट, तहसीलदार तथा परिविक्षाधीन अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांच्यासह पोलीस बंदोबस्तात कांदळवनच्या रेतीबंदरामध्ये रेतीउत्खनन करून उभ्या असलेल्या होड्यांना आग लावून त्या उध्वस्त करण्यात आल्या. इतर होड्यांवर तसेच रेतीसाठ्यावर कारवाई करण्यात येईल, असे डॉ. कनिचे यांनी सांगितले. या महसुलाच्या कारवाईदरम्यान महिलांचा मोठा सहभाग असलेला जमाव घटनास्थळी जमला होता व वातावरण तंग बनले होते.