शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
2
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा
3
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
4
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
5
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
6
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
7
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
8
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
9
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
10
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
11
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
12
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
13
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
14
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
15
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
16
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
17
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी
18
Mumbai Pali Hill Fire: मुंबईच्या पाली हिलमध्ये अग्नितांडव, थरकाप उडवणारा स्फोट; व्हिडिओ व्हायरल!
19
Beauty Tips: नैसर्गिकरित्या भुवया दाट करणं आता सहज शक्य; फॉलो करा 'या' तीन टिप्स!
20
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती

एकाच अधिकाऱ्याकडे तीन तालुक्यांचा कार्यभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 11:55 PM

प्रशासन उदासीन : काम करताना करावी लागते कसरत, तिन्ही तालुक्यांतील नागरिकांचीही होते गैरसोय

वसंत भोईर।लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन अनेक वर्षे उलटली असली तरी अनेक कार्यालये अद्यापही पालघर येथे सुरू झालेली नाहीत तसेच अनेक खात्यांत अधिकारी व कर्मचारी यांची पदे रिक्त असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील पी.एस. कुलकर्णी या पाणीपुरवठा विभागातील उपअभियंत्याला तीन तालुक्यांचा कार्यभार सांभाळावा लागत असल्याने त्यांना कामासाठी कसरत करावी लागत आहे, मात्र याबाबत प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे.वाडा पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागात उपअभियंता म्हणून पी.एस. कुलकर्णी हे गेल्या तीन वर्षापासून कार्यरत आहेत. हे काम करीत असतानाच त्यांच्याकडे जव्हार व मोखाडा या दोन तालुक्यांच्या पाणीपुरवठा विभागातील उपअभियंतापदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या तीनही तालुक्यांचे काम करताना त्यांना कसरत करावी लागत आहे. वाडा येथे त्यांचे सोमवार व गुरुवार, जव्हार येथे मंगळवार, बुधवार तर मोखाडा येथे शुक्रवार, शनिवार असे वार आहेत. त्यातच जिल्हा व तालुक्यांच्या बैठका, मंत्री महोदयांचे दौरे आदी असल्याने त्यांना कामे करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.वाडा, जव्हार व मोखाडा हे तीनही तालुके आदिवासीबहुल आहेत. येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मार्चपासूनच पाण्याचे दुर्भिक्ष्य या तीनही तालुक्यांत जाणवत असून पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशातच एका अधिकाºयाकडे तीनही तालुक्यांचा पदभार असल्याने धड एका तालुक्यातही म्हणावे तसे लक्ष त्यांना देता येत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. या तीनही तालुक्यांतील अनेक गावांत पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. या कामांवरही त्यांना लक्ष देता येत नसल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.तालुक्यातील कुडूस येथे सन २०१२ पासून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून सहा-सात वर्षातही हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे शासनाचा शुद्ध व घरोघरी पाणी देण्याचा हेतू सफल होताना दिसत नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण होऊन नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता यांचा अन्य तालुक्यांचा पदभार काढून घेऊन त्यांना वाडा येथेच कार्यरत करावे. अन्यथा आमच्या संघटनेला आंदोलन छेडावे लागेल.- अनंता वनगा, अध्यक्ष,आदिवासी मुक्ती मोर्चा संघटनामाझ्याकडे तीन तालुक्यांचा कार्यभार असून त्या-त्या तालुक्यांसाठी मी वार दिलेले आहेत. जिल्हा परिषदेत फक्त दोनच उपअभियंते असून तेच कार्यभार सांभाळत आहेत.- पी.एस.कुलकर्णी, उपअभियंता,पाणी पुरवठा विभाग, पंचायत समिती वाडा