शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

एकाच अधिकाऱ्याकडे तीन तालुक्यांचा कार्यभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 23:56 IST

प्रशासन उदासीन : काम करताना करावी लागते कसरत, तिन्ही तालुक्यांतील नागरिकांचीही होते गैरसोय

वसंत भोईर।लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन अनेक वर्षे उलटली असली तरी अनेक कार्यालये अद्यापही पालघर येथे सुरू झालेली नाहीत तसेच अनेक खात्यांत अधिकारी व कर्मचारी यांची पदे रिक्त असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील पी.एस. कुलकर्णी या पाणीपुरवठा विभागातील उपअभियंत्याला तीन तालुक्यांचा कार्यभार सांभाळावा लागत असल्याने त्यांना कामासाठी कसरत करावी लागत आहे, मात्र याबाबत प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे.वाडा पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागात उपअभियंता म्हणून पी.एस. कुलकर्णी हे गेल्या तीन वर्षापासून कार्यरत आहेत. हे काम करीत असतानाच त्यांच्याकडे जव्हार व मोखाडा या दोन तालुक्यांच्या पाणीपुरवठा विभागातील उपअभियंतापदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या तीनही तालुक्यांचे काम करताना त्यांना कसरत करावी लागत आहे. वाडा येथे त्यांचे सोमवार व गुरुवार, जव्हार येथे मंगळवार, बुधवार तर मोखाडा येथे शुक्रवार, शनिवार असे वार आहेत. त्यातच जिल्हा व तालुक्यांच्या बैठका, मंत्री महोदयांचे दौरे आदी असल्याने त्यांना कामे करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.वाडा, जव्हार व मोखाडा हे तीनही तालुके आदिवासीबहुल आहेत. येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मार्चपासूनच पाण्याचे दुर्भिक्ष्य या तीनही तालुक्यांत जाणवत असून पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशातच एका अधिकाºयाकडे तीनही तालुक्यांचा पदभार असल्याने धड एका तालुक्यातही म्हणावे तसे लक्ष त्यांना देता येत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. या तीनही तालुक्यांतील अनेक गावांत पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. या कामांवरही त्यांना लक्ष देता येत नसल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.तालुक्यातील कुडूस येथे सन २०१२ पासून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून सहा-सात वर्षातही हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे शासनाचा शुद्ध व घरोघरी पाणी देण्याचा हेतू सफल होताना दिसत नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण होऊन नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता यांचा अन्य तालुक्यांचा पदभार काढून घेऊन त्यांना वाडा येथेच कार्यरत करावे. अन्यथा आमच्या संघटनेला आंदोलन छेडावे लागेल.- अनंता वनगा, अध्यक्ष,आदिवासी मुक्ती मोर्चा संघटनामाझ्याकडे तीन तालुक्यांचा कार्यभार असून त्या-त्या तालुक्यांसाठी मी वार दिलेले आहेत. जिल्हा परिषदेत फक्त दोनच उपअभियंते असून तेच कार्यभार सांभाळत आहेत.- पी.एस.कुलकर्णी, उपअभियंता,पाणी पुरवठा विभाग, पंचायत समिती वाडा