शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या बदल्या मनमानी, सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:32 IST

जिल्ह्यात साडेसहाशे शिक्षकांची पदे रिक्त असताना २२९ शिक्षकांच्या मनमानी बदल्यांचा प्रस्ताव मुख्यकार्यकारी अधिकाº्यांनी अध्यक्षासह कोणालाही विश्वासात न घेता मंजूर केल्याच्या निषेधार्थ आज झालेल्या स्थायीसमितीच्या सभेत

पालघर : जिल्ह्यात साडेसहाशे शिक्षकांची पदे रिक्त असताना २२९ शिक्षकांच्या मनमानी बदल्यांचा प्रस्ताव मुख्यकार्यकारी अधिकाº्यांनी अध्यक्षासह कोणालाही विश्वासात न घेता मंजूर केल्याच्या निषेधार्थ आज झालेल्या स्थायीसमितीच्या सभेत सर्व सदस्यांनी सभात्याग करून आपला निषेध नोंदवला.पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद शाळा आहेत. त्या मध्ये मुख्याध्यापक, विषय शिक्षक आणि उपशिक्षकांची ७ हजार १०३ पदं मंजूर असून त्यापैकी ६ हजार ४३८ कार्यरत असल्याने ६६५ रिक्तपदं आहेत. विकल्पानुसार २४९ शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या त्यापैकी केवळ २२६ शिक्षक हजर झाल्याने २३ जागा आजही रिक्त आहेत. जिल्हा निर्मितीला तीन वर्षाचा कालावधी पूर्ण होत असतांना या आदिवासी जिल्ह्यात शिक्षकांची सर्व पदं भरलेली नाहीत. या त्रुटी दूर करण्यासाठी जिल्ह्याचे शिक्षण समिती सभापती सचिन पाटील सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र ग्राम विकास विभागाचच्या आदेशानुसार २२९ शिक्षकांच्या जिल्हा बदलीचा प्रस्ताव आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी गुरु वारी त्याची अंमलबाजवणी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही अमलबजावणी झाल्यास केवळ ४९ शिक्षक परजिल्ह्यातून येणारे असतील. त्यामुळे आठ तालुक्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणत्याही शासन निर्णयाच्या अंमलबजावणी आधी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शुक्र वारच्या स्थायी समिती सभेत सदर शासन निर्णयाची अंमलबाजवणी न करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करून जिल्हा शिक्षण सभापती सचिन पाटील यांनी सभात्याग करून निषेध व्यक्त केल्याचे लोकमतला सांगितले. जिल्ह्यात साडेसहाशे शिक्षकांची पदं रिक्त असताना हा निर्णय शैक्षणिक धोरणाला मारक आहे.शिवाय लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता प्रशासनाचे अधिकारी निर्णय घेत असल्याने स्थायी समितीच्या सभेतून अध्यक्षासह सर्व सदस्यांनी सभात्याग करून आपलं निषेध नोंदविला आहे.