शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
4
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
5
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
6
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
7
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
8
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
9
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
10
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
11
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
12
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
13
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
14
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
15
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
16
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
17
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
18
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
19
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
20
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले

साहेब, तुम्ही आलात म्हणून आज पाणी आले हो...

By admin | Updated: July 30, 2016 04:35 IST

तारापूर अणुऊर्जा केंद्र तीन व चारच्या उभारणीनंतर विस्थापीत झालेल्या अक्करपट्टी व पोफरण या दोन गावातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केलेल्या गावामध्ये पिण्यासाठी ४ कोटी २० लाख

बोईसर : तारापूर अणुऊर्जा केंद्र तीन व चारच्या उभारणीनंतर विस्थापीत झालेल्या अक्करपट्टी व पोफरण या दोन गावातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केलेल्या गावामध्ये पिण्यासाठी ४ कोटी २० लाख रुपये योजनेसाठी खर्चूनही पाण्याची स्थिती अतिशय गंभीर असून प्रकल्पग्रस्तांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी प्रकल्पग्रस्तांच्या पिण्याच्या पाण्याच्या स्थितीची पाहणी सूरू करण्यात आली असून सलग दोन दिवस ही पाहणी करण्यात येणार आहे.पालघरचे उपविभागीय अधिकारी शिवाजी दावभट, महाराष्ट्र जीवनप्राधीकरण पालघरचे उपअभियंता एस.एन. कसबे, कार्यकारी अभियंता एम.जी. गीरगावकर, एम.आय.डी.सी.चे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता नंदकुमार करवा पालघरच्या तहसीलदार स्रेहल कतिचे, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व महसूल विभागाचे कर्मचारी तसेच पोफरणचे सरपंच रविंद्र मोरे, उपसरपंच सचिन ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य शुभांगी कुटे, विरेंद्र पाटील, विजय तामोरे, गणेश कोरे, अजित पाटील, शेखर तामोरे आणि प्रकल्पग्रस्त आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळपासून पाणी योजनेची संयुक्त पाहणीस सुरुवात करण्यात आली आहे. आज संपूर्ण दिवसात पोफरण तर उद्या अक्करपट्टीची तपासणी होणार आहे.आज प्रथम पोफरण गावातील ७५००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी भरण्यात आली आणि त्यानंतर विभागानुसार पोणी सोडण्यात आले. त्या प्रत्येक झोनमध्ये उपविभागीय अधिकारी शिवाजी दावभट यांनी संपूर्ण तपासणी पथकासह व्यक्तीश: त्या भागातील बहुसंख्य घरात जाऊन पाण्याच्या स्थितीची पाहणी केली. त्यावेळी काही भागांमध्ये पाणी येत होते, काही ठिकाणी येत होते. परंतु पुरेसे पाणी येतच नव्हते.दावभट यांच्यासमोर प्रकल्पग्रस्तांनी व्यथा मांडताना आमची सोन्यासारखी घरेदारे, जमीनी देऊन आम्हाला पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. सुषमा संदेश मोरे या महिलेने तर तीन वर्षांत आज प्रथम पाणी आल्याचे सांगितले. काहींनी अनेक दिवस पाण्याची प्रतिक्षा करावी लागते असे सांगितले तर काहींनी साहेब, आज तुम्ही आले आहात म्हणून पाणी आल्याची भावना व्यक्त केली. पाण्याच्या पाइप जराही उंचीवर नेला तर पाण्याचा दाब नसल्याने पाणी येत नसल्याचे प्रत्यक्ष दाखविले. अशा पाण्याबाबतच्या वेगवेगळ्या समस्या व चित्र पहावयास मिळाले. (वार्ताहर)