शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

साखरे धरणाची सुरक्षा रामभरोसे; महाराष्ट्र जीवन प्रधिकरण उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:19 IST

संरक्षक भिंत, सुरक्षारक्षक नाहीत

डहाणू : डहाणू तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील अणुशक्ती केंद्र्र, एमआयडीसी तारापूर, तसेच बी.ए.आर.सी., डहाणू थर्मल पॉवर स्टेशन या मोठ्या प्रकल्पांना दररोज लाखो लीटर्स पाणीपुरवठा करणाऱ्या वाणगांवच्या साखरे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. साखरे धरणाची सुरक्षा तसेच देखभाल दुरूस्तीची जबाबदारी असलेले महाराष्टÑ जीवन प्रधिकरण याबाबत कोणतीच खबरदारी घेत नसल्याने धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे.तारापूर येथील वीजनिर्मिती करणाºया तारापूर अणूशक्ती केंद्राला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने शासनाने वाणगाव जवळील साखरे गावात मोठे धरण बांधले आहे. एकूण पाचशे मीटर लांबी असलेले हे धरण वाणगाव - वधना या राज्यमार्गाला लागून आहे. या धरणाच्या आजुबाजुला मोठमोठे डोंगर आहेत. धरण परिसर खूप मोठा असला तरी कुठेही संरक्षक भिंत नाही. धरणाचे एक प्रवेशद्वार रात्रंदिवस उघडेच असते. तेथे रखवालदार किंवा सुरक्षारक्षक नसल्याने कोणतेही वाहन किंवा अज्ञात व्यक्ती थेट धरण क्षेत्रात प्रवेश करतात. मार्च, एप्रिल, मे, जून महिन्यात तर धरण परिसर पर्यटकांनी गजबजलेला असतो. तरुणाई येथे पार्ट्या करते. तर मद्यधुंद अवस्थेत धरणात उतरून मजा करीत असतात. गेल्या वर्षी एका तरूणाचा बुडून मृत्यू झाला. याशिवाय, या धरणात वीस - पंचवीस वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाण्यापेक्षा गाळ, केरकचरा मोठ्या प्रमाणात असून त्याच्या देखभाल दुरूस्तीकडे महाराष्टÑ जीवन प्रधिकरण दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.नुकतेच या धरणापासून २५० मीटर अंतरावर तारापूर येथील एका कंपनीच्या टँकरमधून घातक रसायन टाकल्याचे व्हीडिओ व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. आठ, दहा दिवस तर ग्रामस्थांनी पाणीही भरले नव्हते. याबाबत वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे.चार - पाच वर्षांपासून साखरे धरणाजवळ मोठ्या प्रमाणात पार्ट्या होतात. पावसाळ्याच्या दिवसांत तर आसपासच्या परिसरातील शेकडो तरूण धरणात उतरून मौजमजा करतात. तसेच बिअरच्या रिकाम्या बाटल्याही पडलेल्या दिसतात. सुरक्षेच्या दृष्टीने जीवन प्रधिकरण उपाययोजना करीत नसल्याने भविष्यात येथे घातपाताची भीती ग्रामस्थ व्यक्त करतात.

टॅग्स :Damधरण