शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

सफाई कामगारांची संपाची धमकी, परिवहनच्या संपाचा आठवा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 03:57 IST

वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागातील दहा कामगारांना पुन्हा कामावर घेण्यास ठेकेदाराने ठाम नकार दिला असून ते आजारी पडले आहेत.

वसई : वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागातील दहा कामगारांना पुन्हा कामावर घेण्यास ठेकेदाराने ठाम नकार दिला असून ते आजारी पडले आहेत. आयुक्त निर्णय घ्यायला तयार नसल्याने आठव्या दिवशी कोणताही तोडगा न निघाल्याने बेमुदत संप सुरु ठेवण्यात आला आहे. आता संपकºयांना पाठिंबा देण्यासाठी महापालिकेतील सफाई कामगार संपावर जातील असा इशारा श्रमजीवी संघटनेने दिला आहे. त्यामुळे आता संप चिघळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.गेल्या सोमवारपासून महापालिकेच्या परिवहन सेवेतील कामगार संपावर गेले आहेत. बुधवारी संप मिटला होता. पण, दहा बडतर्फ कामगारांना पुन्हा कामावर घेण्यास ठेकेदार मनोहर सकपाळ यांनी नकार दिल्याने बुधवार रात्रीपासून पुन्हा संप सुरु करण्यात आला होता. संपकरी श्रमजीवीचे पदाधिकारी आणि पत्रकारांना बुधवारी बडतर्फ कामगारांना कामावर घेतले आहे, असे स्पष्ट सांगणाºया आयुक्त सतीश लोखंडे यांनीही आता घुमजाव करीत हात वर केले आहेत. हा वाद कामगार आणि ठेकेदाराने मिटवावा असे सांगत आयुक्तांनी तडजोड करण्याच्या भूमिकेतून अंग काढले आहे.दुसरीकडे, संप सुरु झाल्याचे टेन्शन आल्यामुळे ठेकेदार मनोहर सकपाळ आजारी पडले असल्याचे परिवहन खात्यातील अधिकारी सांगत आहेत. संप सुुरुच राहिला तर ठेका सोडून देईन पण बडतर्फ कामगारांना कामावर घेणार नाही, असे ठेकेदार सांगत असल्याचही ते सांगतात. संपकºयांचे नेते विवेक पंडित यांनी आ़युक्त आणि ठेकेदाराशी सोमवारी संपर्क साधला होता. मात्र, दोघांकडूनही प्रतिसाद मिळाला नाही, असे संघटनेचे गणेश उंबरसडा यांनी सांगितले.दरम्यान, दहा बडतर्फ कामगारांना कामावर पुन्हा घेतल्याशिवाय माघार नाही. प्रशासन आणि ठेकेदार ऐकत नसतील तर सफाई कामगारांसह महापालिकेतील श्रमजीवी संघटनेचे कामगारही संपकºयांना पाठिंबा देण्यासाठी संपावर उतरतील, असा इशारा विवेक पंडित यांनी दिला आहे. त्यामुळे परिवहनचा संप चिघण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, संपामुळे प्रवाशी आणि विद्यार्थ्यांचे हाल सुरु झाले आहेत.ठेकेदार जर सेवा सोडणार असेल तर महापालिकेने बस सेवा एसटी महामंडळाला द्यावी. महापालिकेने सर्व रुट दिले तर बस सेवा सुरु करू असे एसटीने हायकोर्टात सांगितलेले आहे. त्यामुळे एसटीची वसईकरांना चांगली प्रवाशी सेवा मिळेल, अशी मागणी जनआंदोलनाचे प्रा. विन्सेंट परेरा यांनी केली आहे. सणासुदीत जनतेचे मात्र प्रचंड हाल होत आहेत.