शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

सफाई कामगारांची संपाची धमकी, परिवहनच्या संपाचा आठवा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 03:57 IST

वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागातील दहा कामगारांना पुन्हा कामावर घेण्यास ठेकेदाराने ठाम नकार दिला असून ते आजारी पडले आहेत.

वसई : वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागातील दहा कामगारांना पुन्हा कामावर घेण्यास ठेकेदाराने ठाम नकार दिला असून ते आजारी पडले आहेत. आयुक्त निर्णय घ्यायला तयार नसल्याने आठव्या दिवशी कोणताही तोडगा न निघाल्याने बेमुदत संप सुरु ठेवण्यात आला आहे. आता संपकºयांना पाठिंबा देण्यासाठी महापालिकेतील सफाई कामगार संपावर जातील असा इशारा श्रमजीवी संघटनेने दिला आहे. त्यामुळे आता संप चिघळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.गेल्या सोमवारपासून महापालिकेच्या परिवहन सेवेतील कामगार संपावर गेले आहेत. बुधवारी संप मिटला होता. पण, दहा बडतर्फ कामगारांना पुन्हा कामावर घेण्यास ठेकेदार मनोहर सकपाळ यांनी नकार दिल्याने बुधवार रात्रीपासून पुन्हा संप सुरु करण्यात आला होता. संपकरी श्रमजीवीचे पदाधिकारी आणि पत्रकारांना बुधवारी बडतर्फ कामगारांना कामावर घेतले आहे, असे स्पष्ट सांगणाºया आयुक्त सतीश लोखंडे यांनीही आता घुमजाव करीत हात वर केले आहेत. हा वाद कामगार आणि ठेकेदाराने मिटवावा असे सांगत आयुक्तांनी तडजोड करण्याच्या भूमिकेतून अंग काढले आहे.दुसरीकडे, संप सुरु झाल्याचे टेन्शन आल्यामुळे ठेकेदार मनोहर सकपाळ आजारी पडले असल्याचे परिवहन खात्यातील अधिकारी सांगत आहेत. संप सुुरुच राहिला तर ठेका सोडून देईन पण बडतर्फ कामगारांना कामावर घेणार नाही, असे ठेकेदार सांगत असल्याचही ते सांगतात. संपकºयांचे नेते विवेक पंडित यांनी आ़युक्त आणि ठेकेदाराशी सोमवारी संपर्क साधला होता. मात्र, दोघांकडूनही प्रतिसाद मिळाला नाही, असे संघटनेचे गणेश उंबरसडा यांनी सांगितले.दरम्यान, दहा बडतर्फ कामगारांना कामावर पुन्हा घेतल्याशिवाय माघार नाही. प्रशासन आणि ठेकेदार ऐकत नसतील तर सफाई कामगारांसह महापालिकेतील श्रमजीवी संघटनेचे कामगारही संपकºयांना पाठिंबा देण्यासाठी संपावर उतरतील, असा इशारा विवेक पंडित यांनी दिला आहे. त्यामुळे परिवहनचा संप चिघण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, संपामुळे प्रवाशी आणि विद्यार्थ्यांचे हाल सुरु झाले आहेत.ठेकेदार जर सेवा सोडणार असेल तर महापालिकेने बस सेवा एसटी महामंडळाला द्यावी. महापालिकेने सर्व रुट दिले तर बस सेवा सुरु करू असे एसटीने हायकोर्टात सांगितलेले आहे. त्यामुळे एसटीची वसईकरांना चांगली प्रवाशी सेवा मिळेल, अशी मागणी जनआंदोलनाचे प्रा. विन्सेंट परेरा यांनी केली आहे. सणासुदीत जनतेचे मात्र प्रचंड हाल होत आहेत.