शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

उधवा-हळदपाडा रस्त्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2015 23:13 IST

अवजड वाहनाच्या वाहतुकीमुळे उधवा-मोडगाव-हळदपाडा रस्त्याची दुर्दशा झाली असून अनेक वेळा निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने आज

तलासरी : अवजड वाहनाच्या वाहतुकीमुळे उधवा-मोडगाव-हळदपाडा रस्त्याची दुर्दशा झाली असून अनेक वेळा निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथे रास्तारोको आंदोलन केले.राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हापरिषद सदस्य काशिनाथ चौधरी, तसेच राजु पारेख इत्यादीसह शेकडो कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. उधवा मोडगाव हळदपाडा हा रस्ता १५ टन वजनाच्या क्षमतेचा परंतु या मार्गावरून ४० टन वजनाच्या गाड्या टोल चुकविण्यासाठी जात असल्याने या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यामुळे वाहने चालविणे वाहन चालकांना अशक्य झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अनेक वेळा येथे रस्ता दुरूस्तीसाठी आंदोलने करण्यात आली परंतु प्रत्येक वेळी निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत दुरूस्तीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करण्यात येते. जनताही भोळीभाबडी अािध्काऱ्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेत वारंवारच्या अधिकाऱ्यांच्या फसवेगीरीला कंटाळलेल्या व रस्त्याच्या दयनीय अवस्थेने हैराण झालेल्या गावकऱ्यांनी आज प्रखर आंदोलन करून वाहतुक बंद पाडली. यावेळी कासा पोलीसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.आंदोलनकर्त्यांचे प्रखर रुप लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता तोटावर घटनास्थळी येऊन तत्काळ रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेतो असे सांगुन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली परंतु आजपर्यंतची अधिकाऱ्यांची फसवेगिरी पाहता आंदोलनकर्ते ऐकण्याच्या तयारीत नव्हते यावेळी कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी रवी मगर यांनी अधिकारी व आंदोलनकर्ते यांच्यात समेट घडवून आंदोलन मागे घेण्यास लावले. उधवा-मोडगाव-हळदपाडा रस्त्याच्या दुर्दशेमुळे या मार्गावर अनेक अपघात होऊन बळीही पडले आहेत. आजारी माणसाला या मार्गावरून नेणे म्हणजे मृत्यूच्या दाढेत ढकलण्यासारखे आहे.दोन वर्षात या मार्गावर पावसाळ्यापुर्वी वा पावसाळ्यानंतरची कोणतीही दुरूस्तीची कामे करण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी गावकऱ्यांनी केला. त्यावेळी वारंवार प्रस्ताव पाठवुन प्रस्ताव मंजुर होत नसल्याने रस्ता दुरूस्ती रखडली आहे. त्यामुळे या दुरूस्तीसाठी केंद्रीय निधीचा प्रस्ताव पाठविला आहे. तो मंजुर होताच रस्ता दुरूस्ती करण्यात येईल असे उपअभियंता तोटावर यांनी सांगितले. (वार्ताहर)या मार्गावर लाखोचा निधी खर्च होऊनही रस्त्याची दुर्दशा कायम आहे. वारंवार निवेदन देऊनही दखल घेत नसल्याने आंदोलन करण्यात आले. ८ दिवसात रस्ता दुरूस्त न झाल्यास वृक्ष लागवड खड्ड्यात करण्यात येणार आहे.- काशिनाथ चौधरी, मोडगाव, जिल्हापरिषद सदस्य - पालघरतात्काळ खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. रस्ता दुरूस्तीसाठी केंद्रीय निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.- तोटावर, उपअभियंता सा. बां. विभाग - डहाणूउद्यापासूनच खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतो.-निलेश सांबरे, ठेकेदाररस्त्यातील खड्ड्यामुळे अपघात नेहमी होतात गस्त घालणे अवघड झाले आहे.- कासा पोलीस स्टेशन कर्मचारी