शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

उधवा-हळदपाडा रस्त्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2015 23:13 IST

अवजड वाहनाच्या वाहतुकीमुळे उधवा-मोडगाव-हळदपाडा रस्त्याची दुर्दशा झाली असून अनेक वेळा निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने आज

तलासरी : अवजड वाहनाच्या वाहतुकीमुळे उधवा-मोडगाव-हळदपाडा रस्त्याची दुर्दशा झाली असून अनेक वेळा निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथे रास्तारोको आंदोलन केले.राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हापरिषद सदस्य काशिनाथ चौधरी, तसेच राजु पारेख इत्यादीसह शेकडो कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. उधवा मोडगाव हळदपाडा हा रस्ता १५ टन वजनाच्या क्षमतेचा परंतु या मार्गावरून ४० टन वजनाच्या गाड्या टोल चुकविण्यासाठी जात असल्याने या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यामुळे वाहने चालविणे वाहन चालकांना अशक्य झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अनेक वेळा येथे रस्ता दुरूस्तीसाठी आंदोलने करण्यात आली परंतु प्रत्येक वेळी निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत दुरूस्तीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करण्यात येते. जनताही भोळीभाबडी अािध्काऱ्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेत वारंवारच्या अधिकाऱ्यांच्या फसवेगीरीला कंटाळलेल्या व रस्त्याच्या दयनीय अवस्थेने हैराण झालेल्या गावकऱ्यांनी आज प्रखर आंदोलन करून वाहतुक बंद पाडली. यावेळी कासा पोलीसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.आंदोलनकर्त्यांचे प्रखर रुप लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता तोटावर घटनास्थळी येऊन तत्काळ रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेतो असे सांगुन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली परंतु आजपर्यंतची अधिकाऱ्यांची फसवेगिरी पाहता आंदोलनकर्ते ऐकण्याच्या तयारीत नव्हते यावेळी कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी रवी मगर यांनी अधिकारी व आंदोलनकर्ते यांच्यात समेट घडवून आंदोलन मागे घेण्यास लावले. उधवा-मोडगाव-हळदपाडा रस्त्याच्या दुर्दशेमुळे या मार्गावर अनेक अपघात होऊन बळीही पडले आहेत. आजारी माणसाला या मार्गावरून नेणे म्हणजे मृत्यूच्या दाढेत ढकलण्यासारखे आहे.दोन वर्षात या मार्गावर पावसाळ्यापुर्वी वा पावसाळ्यानंतरची कोणतीही दुरूस्तीची कामे करण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी गावकऱ्यांनी केला. त्यावेळी वारंवार प्रस्ताव पाठवुन प्रस्ताव मंजुर होत नसल्याने रस्ता दुरूस्ती रखडली आहे. त्यामुळे या दुरूस्तीसाठी केंद्रीय निधीचा प्रस्ताव पाठविला आहे. तो मंजुर होताच रस्ता दुरूस्ती करण्यात येईल असे उपअभियंता तोटावर यांनी सांगितले. (वार्ताहर)या मार्गावर लाखोचा निधी खर्च होऊनही रस्त्याची दुर्दशा कायम आहे. वारंवार निवेदन देऊनही दखल घेत नसल्याने आंदोलन करण्यात आले. ८ दिवसात रस्ता दुरूस्त न झाल्यास वृक्ष लागवड खड्ड्यात करण्यात येणार आहे.- काशिनाथ चौधरी, मोडगाव, जिल्हापरिषद सदस्य - पालघरतात्काळ खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. रस्ता दुरूस्तीसाठी केंद्रीय निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.- तोटावर, उपअभियंता सा. बां. विभाग - डहाणूउद्यापासूनच खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतो.-निलेश सांबरे, ठेकेदाररस्त्यातील खड्ड्यामुळे अपघात नेहमी होतात गस्त घालणे अवघड झाले आहे.- कासा पोलीस स्टेशन कर्मचारी