शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

मोदींच्या धोरणाला प्रशासनाकडून हरताळ; ताडी शेतकऱ्यांची व्यथा, २०२२ पर्यंत उत्पन्न दुप्पट कसे करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 01:19 IST

जिल्ह्यातील उत्पादित केलेल्या ताडीच्या विक्रीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्या-त्या वर्षासाठी ताडी विक्रीची दुकाने लिलाव पद्धतीद्वारे उपलब्ध करून दिली जातात.

- हितेन नाईकपालघर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण अवलंबिताना त्यांनी शेतीसह इतर पूरक व्यवसाय उभारावा या त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणाºया संस्थांच्या प्रयत्नांना प्रशासन छेद देत आहे. जिल्ह्यातील शेतीपूरक व्यवसाय करणाºया ताडी व्यावसायिक शेतकºयांच्या संस्था कडून कोट्यवधी रु पयांची लायसन्स फी वसूल केली जात असल्याने त्यांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचे मोडले आहे.जिल्ह्यातील उत्पादित केलेल्या ताडीच्या विक्रीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्या-त्या वर्षासाठी ताडी विक्रीची दुकाने लिलाव पद्धतीद्वारे उपलब्ध करून दिली जातात. सर्वात जास्त बोली लावणाºया व्यक्तीस अथवा सहकारी संस्थेस या ताडी विक्रीचा परवाना दिला जात असल्याची पद्धत सन १९६८ पासून आजपर्यंत सुरू आहे. या लिलावातील १० टक्के लिलाव (दुकाने) सहकारी संस्थांना द्यावीत, असे परिपत्रक शासनाने काढल्याने अनेक वर्षापर्यंत या सवलतींचा फायदा संस्थांना मिळत होता. तसेच संस्थांना अंतिम बोलीच्या रक्कमेमधून २५ टक्के रक्कम ही दिली जात होती. परंतु ही सवलत जिल्हाधिकाºयांनी बंद करीत सहकारी संस्थांच्या कारभारावर पहिला प्रहार करीत त्यांना खाजगी व्यावसायिकांच्या रांगेत उभे केले. त्यामुळे सहकारी संस्था आणि खाजगी व्यावसायिकामधला फरक ओळखून शासनाने पुन्हा सहकारी संस्थांना सूट व सवलत सुरू करावी, अशी त्यांची मागणी मागील १५ ते २० वर्षांपासून आहे.खासदार राजेंद्र गावित यांनी प्रधानमंत्र्यांच्या कानी या रास्त मागण्या घालून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी ताडी उत्पादक शेतकºयाकडून होत आहे.या शेतकºयांच्या पूरक व्यवसायाबाबत शासनाचे बदलते धोरण व धनदांडग्या खाजगी व्यक्तींचा या व्यवसायात झालेला शिरकाव त्यामुळे फक्त तीन संस्था सद्यस्थितीत तग धरून उभ्या आहेत. स्वच्छ, निरोगी व स्वास्थ्यवर्धक पेय म्हणून ओळखली जाणाºया ताडी व माडीत कुठलीही मिलावट न करता या संस्था आजही त्याची विक्र ी करीत असून या पेयामुळे कुठलीही जीवितहानी झाल्याच्या घटना पालघर तालुक्यात आजपर्यंत घडलेल्या नसल्याचे सांगण्यात येते. या व्यवसायावर २ हजार ५०० ते ३ हजार शेतकरी, कामगार यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे या शेतकरी व्यावसायिकांच्या रास्त मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी चिटणीस हेमंत मोरे, विकास मोरे, सदानंद किणी, विलास मोरे आदींनी केली आहे.वसूल लायसन्सची फी परत मिळावी- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ४२ (क) व ४२ (२) मधील तरतुदी अन्वये सहकारी संस्थांकडून लायसन्स फी वसूल करू नये, असे स्पष्टपणे नमूद केले आहे.- तरीही सातपाटी भंडारी ताडी-माडी उत्पादक सहकारी औद्योगिक संस्था मर्यादित या संस्थेकडून आजपर्यंत ९७ लाख १३ हजार ०६८ रुपये, माहीम-वडराई भंडारी ताडी उत्पादक सहकारी औद्योगिक संस्था यांच्याकडून १९ लाख ६८ हजार ०३३ रुपये तर के.माहीम भंडारवाडा (बंदर) सहकारी ताड पदार्थ उत्पादक औद्योगिक संस्था यांच्याकडून १९ लाख ६४ हजार ०२६ रुपये असे एकूण १ कोटी ३६ लाख ४५ हजार १२७ रु पयांची वसुली झालीआहे.- १९६८ सालापासून शासनाने आदिवासी बहुल भागातील सहकारी संस्थांकडून वसूल केलेली लायसन्स फी आम्हाला परत करावी किंवा तिचे भागभांडवलात समायोजन करावे अशी मागणी विजय भास्कर राऊत यांनी केलेली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार