शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025 : मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
7
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
8
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
9
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
10
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
11
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
12
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
13
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
14
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
15
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
16
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
17
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
18
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
19
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
20
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?

रुपालीची प्रकृती बिघडली, पैसेही संपलेहितेन नाईक।

By admin | Updated: May 22, 2017 01:45 IST

जिवंत वीजवाहिनीचा झटका लागल्यावर उपचारासाठी फरफट होऊनही मृत्युशी नायर रुग्णालयात झुंज देणाऱ्या चहाडे (सज्जनपाडा) येथील ९ वर्षीय रु पाली वरठाची प्रकृती पुन्हा खालावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिवंत वीजवाहिनीचा झटका लागल्यावर उपचारासाठी फरफट होऊनही मृत्युशी नायर रुग्णालयात झुंज देणाऱ्या चहाडे (सज्जनपाडा) येथील ९ वर्षीय रु पाली वरठाची प्रकृती पुन्हा खालावली आहे.गेल्या महिनाभरापासून रुपालीवर नायर रूग्णालयात उपचार सुरु आहेत अलीकडेच तिच्यावर शस्त्रक्रि याही करण्यात आली होती. ती बरी होण्याची चिन्हे दिसत होती मात्र तिच्या हाताच्या भाजलेल्या जखमातून गेल्या तीन दिवसांपासून रक्तस्त्राव होत आहे तो थांबून या जखमा बऱ्या होईपर्यंत तिच्यावर नसा जोडणींची शस्त्रक्रिया होणे शक्य नाही. रक्तस्रावामुळे तिच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण बरेचसे कमी झाले असून तिला दोन-तीन वेळा रक्त देण्यात आले व पुढेही देण्यात येणार आहे. या रक्तस्रावामुळे तिच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण घटल्याने तिची प्रकृती बिघडली आहे असे तिच्या नातेवाइकांनी सांगितले आहे.या परिस्थितीत रु पालीच्या हृदयक्रियेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने तिला नायरमधील हृदयरोगतज्ञ यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.या नऊ वर्षाच्या आदिवासी रुपालीला असह्य यातना सोसाव्या लागत आहेत. मात्र तिची विचारपूस करण्यास वा काही मदत देण्यास पालकमंत्री विष्णू सवरा, या भागाचे आमदार विलास तरे यांना वेळ मिळालेला नाही. महिना झाला तरी रुपालीला कोणतीच शासकीय मदतही मिळालेली नाही किंवा महावितरणच्या प्रशासनानेही तिच्या प्रकृतीविषयी चौकशी केली नाही. जिल्ह्यातील रहिवासी म्हणून व त्यातही अनुसूचित असलेल्या रुपालीची चौकशी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे कर्तव्य आहे कि नाही असा सवाल उभा राहिला आहे.गेल्या महिन्याभरापासून रुपालीसोबत तिचा भाऊ व नातेवाईक राहत आहेत. रुपालीला प्रसंगी रुग्णालयात औषधे उपलब्ध नसली तर ती बाहेरून आणावी लागतात व किमान दोन माणसांचा रोजच्या दोन वेळच्या जेवणाचा खर्च व तिला बाहेरून लागणारा पोषक आहार याचा दिवसाचा खर्च खूपच मोठा आहे. रोजंदारीवर २५० ते ३०० रुपये रोज कमविणाऱ्या तिच्या वडीलांना हा खर्च कसा झेपेल असा सवाल आहे. आपल्या भूकेपेक्षा बहिणीची औषधे महत्वाची म्हणून तिचा भाऊ अनेकदा एक वेळ उपाशी राहून दिवस काढतो आहे. व वाचलेल्या पैशातून तिची औषधे आणतो आहे. पालघरचे आमदार अमित घोडा यांनाही तिच्यासाठी काही करावेसे वाटत नाही. माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित तिचे समाजबांधव असूनही तेही तिच्याकडे फिरकलेले नाहीत. त्यांच्याकडे पैसे नसले तरीही त्यांनी रुपालीच्या उपचारासाठी कोणत्याही संकटाशी सामना करायला तयार असल्याची कबुली रुपालीच्या भावाने दिली. काही दानशूरांनी दिलेल्या आर्थिक मदतीवर आजपर्यंत त्यांचा खर्च भागला आहे. मात्र पुढे ही तिला या उपचारांसाठी मोठा खर्च करावा लागणार आहे. त्यासाठी दानशूर पुढे येतील काय? उजामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नवे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे हे याबाबत काही पुढाकार घेतील की तिची मृत्युशी सुरू असलेली झुंज नुसतीच पहात राहतील?