शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दगडखाणीमुळे वाड्यात रस्त्याची दुरवस्था; उत्खनन बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 23:24 IST

उत्खनन बंद करण्याची मागणी

वाडा : वाडा तालुक्यातील खरिवली येथे असलेल्या दगडखाणीमुळे रस्त्याच्या दुरवस्थेसह अनेक समस्या उद्भवल्या असून, त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो आहे. ही दगडखाण बंद करण्याची मागणी शिवसेना वसई-विरार विक्रमगड विधानसभा सहसमन्वयक गोविंद पाटील यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

खरिवली येथील आदिवासी ग्रामस्थ देवराम कातकरी (सवर) यांच्या नावावर याच गावातील गृहस्थ महेश जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून दगडाचे उत्खनन करत आहेत. दगडाचे लाखो ब्रास उत्खनन झाले असून, राॅयल्टी मात्र नाममात्र काढल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. या दगडखाणीत होणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीमुळे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे उखडला गेला आहे. त्यामुळे स्मशानभूमीत जाताना येथील नागरिकांना वाट काढात जावे  लागते. 

दगडखाणीमध्ये कामामुळे स्फोट केले जातात. याने गावातील घरांना तडे गेले असून, पाण्याचीही पातळी खोल गेली आहे, त्यामुळे प्रदूषणही होत आहे, असे पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे. ही दगडखाण बंद करण्याची मागणी पाटील यांनी निवेदनाद्वारे केली असून, निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार