शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
3
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
4
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
5
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
6
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
7
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
8
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
9
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
10
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
11
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
12
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
13
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
14
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
15
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
16
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
17
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
18
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
19
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
20
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
Daily Top 2Weekly Top 5

बंदी असूनही तुंगारेश्वर येथे हुल्लडबाजी; पर्यटकांची बेफिकिरी, प्रशासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 00:25 IST

वसईमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ तुंगारेश्वर येथे सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी धबधब्याच्या जवळ जाण्यास बंदी घातली असूनही धबधब्यात पर्यटकांची गर्दी कायम आहे.

विरार : वसईमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ तुंगारेश्वर येथे सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी धबधब्याच्या जवळ जाण्यास बंदी घातली असूनही धबधब्यात पर्यटकांची गर्दी कायम आहे. प्रशासन दावा करत असली तरी सुरक्षेसाठी येथे यंत्रणा तसेच सुरक्षा रक्षक उपलब्ध नाहीत. प्रशासन आता कलम १४४ द्वारे येथे कारवाई करणार आहे.पावसाळा सुरू झाल्यानंतर वसई येथील तुंगारेश्वर या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर अनेक वर्षांपासून लाखोंच्या संख्येने पर्यटक सहलीसाठी येतात. परंतु हे स्थळ आता धोकादायक बनू लागले आहे. गेल्या वर्षी उत्साहाच्या भरात पाच तरुण धबधब्याजवळ गेले आणि अडकले होते. मोठी दुर्घटना होण्याआधीच त्यांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने वाचवण्यात आले. पुन्हा तशी दुर्घटना घडू नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी यंदा धबधब्याच्या १०० मीटर जवळ जाण्यास बंदी घातली होती. परंतु बंदी असूनही पर्यटक मोठ्या संख्येने धबधब्याजवळ जात व नियमांचे उल्लंघन करत आहेत. तसेच सेल्फी काढण्यासाठी तरुणांची जीवघेणी हुल्लडबाजी सुरू आहे.पर्यटकांच्या या गैरवर्तनामुळे गेल्या महिन्यात तीन तरुण तुंगारेश्वरच्या धबधब्यात पोहोण्यासाठी उतरले होते. त्यातील एका तरुणाला धबधब्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. पर्यटकांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी सुरक्षा रक्षक देखील उपलब्ध करून देण्यात येणार होते. मात्र, येथे कुठेच सुरक्षा रक्षक दिसत नाहीत. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राबवण्यात येणाºया उपाय योजना अद्यापही कागदावरच असल्याने पर्यटकांचा जीव अजूनही धोक्यात आहे. याच बरोबर जवळ जाणाºया पर्यटकांना रोखण्यासाठी पोलीस देखील तैनात करण्यात येणार होते. मात्र, ते देखील कुठे दिसले नाहीत. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन कसलीच काळजी घेत असल्याचे दिसत नाही. येथे कोणतीही मोठी घटना घडल्यास महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाची मदत घ्यावी लागते. पर्यटकांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडे कोणतीच साधने उपलब्ध नसल्याने पर्यटकांची सुरक्षा वाºयावर आहे.यावर तोडगा म्हणून प्रशासन कलम १४४ द्वारे कारवाई करणार आहे. प्रशासन पर्यटकांच्या सुरक्षेचा दावा करत असली तरी पर्यटन स्थळी कोणताच बंदोबस्त नाही. बंदीचा नियम जिल्हाधिकाºयांनी काढला परंतु त्यासाठीचे प्रयत्न काही दिसत नाहीत.आम्ही धोकादायक धबधब्यांपासून १०० मीटर अंतर ठेवा असा नियम केला आहे. तसेच जर कोणीही जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना थांबवण्याकारीता पोलीस तैनात केले आहेत. कलम १४४ द्वारे देखील कारवाई केली जाणार. प्रशासनातर्फे सर्व उपाय योजना राबवलेल्या आहेत. पर्यटकांच्या जीवाला धोका होणार नाही याची काळजी घेतली जाईल.- डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार