शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

पालघर जिल्ह्यातील रिक्षा बेमुदत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:50 IST

पालघर, डहाणू तालुक्यातील वाहनांची पालघर येथे होणारी ‘पासिंग’ आता विरार येथे नेऊन नंतर ती सुमारे सव्वाशे किमी लांब असणा-या कल्याण येथे हलवली जाणार आहे.

हितेन नाईक/शशी करपेपालघर/वसई : पालघर, डहाणू तालुक्यातील वाहनांची पालघर येथे होणारी ‘पासिंग’ आता विरार येथे नेऊन नंतर ती सुमारे सव्वाशे किमी लांब असणा-या कल्याण येथे हलवली जाणार आहे. अत्यंत खर्चिक, त्रासदायक ठरणारे कल्याण हे ठिकाण बदलून पुन्हा ती पालघरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सुरू करावे या मागणीसाठी जिल्ह्यातील हजारो रिक्षाधारकांनी शुक्र वार पासून बेमुदत बंद पुकारला आहे.ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्या नंतर सर्व विभागांची कार्यालये सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय पालघर मुख्यालयात सुरू करणे गरजेचे असताना ते विरार येथे सुरू करण्यात आले. परिवहन विभागाने ही आपल्याला पालघर मुख्यालयात कार्यालय व इतर पासिंग चाचणीच्या प्रक्रियेसाठी जागेची मागणीच केली नसल्याने शासन पातळी वरून त्याबाबत विचार करण्यात आलेला नसल्याचे रिक्षा संघटनांचे म्हणणे आहे.पालघर पूर्वेला असलेल्या शासकीय विश्रामगृहामध्ये असलेल्या जागेत मागील २०-२५ वर्षांपासून तीन-सहा आसनी रिक्षा, मोटार -सायकल, टेम्पो, ट्रक आदी गाड्यांची पासिंग प्रक्रिया केली जात होती. ती आता बंद करून डहाणू पासून सुमारे ९२ किमी तर पालघर पासून ५५ ते ६० किमी अंतरावरील विरार येथे नेऊन ठेवण्यात आली होती. रिक्षांना पासिंगसाठी दिलेल्या ठिकाणाहून ३३ किमी प्रवासाची मर्यादा प्रादेशिक परिवहन विभागाने घालून दिलेली असतांना त्यांचा नियम मोडून रिक्षाधारकांना ६० किमी अंतरावरील विरार येथे जाण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. वेळेत पासिंग न केल्यास प्रति दिवस ५०रुपयांचा दंड ही आकारणार असल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे फुकटचा भुर्दंड गरीब रिक्षाधारकाना सहन करावा लागणार आहे. त्यातच नेहमीच अवजड वाहनांची वर्दळ असलेल्या अहमदाबाद-मुंबई महामार्ग वरून विरार गाठणे खर्चिक, मानसिक त्रासदायक व धोकादायक ठरणार असल्याचे रिक्षा युनियनचे म्हणणे आहे.आता तर विरार येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील पासिंगची चाचणी प्रक्रिया कल्याण येथे हलविण्यात येणार आहे असे, छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा चालक-मालक सेनेचे अध्यक्ष मनोज घरत यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. त्यामुळे पालघर-डहाणू येथून १२५ किमी लांब कल्याण येथे गाड्या पासिंगला घेऊन जाणे सर्वच दृष्टीने खूपच त्रासदायक ठरणारे आहे. त्यामुळे बुधवारी पालघर मुख्यालयाच्या भूमीपूजनाला आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आॅटो टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष केतन पाटील, उपाध्यक्ष सुनील जगताप आणि छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मनोज घरत, विजय किणी आदिंनी भेट घेऊन पालघर मध्येच प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय सुरू करावे अशी मागणी केली. शुक्रवार पासून सुरू होणार्या बेमुदत रिक्षा बंद आंदोलनात पालघर, बोईसर, सफाळे, सातपाटी, डहाणू आदी भागातील हजारो रिक्षा बंद राहणार असल्याने रिक्षावर अवलंबून असणारे कामगार, विद्यार्थी, छोटे-मोठे विक्रेते, मत्स्यव्यवसायिक आदी वर मोठा विपरीत परिणाम होणार आहे. प्रवाशांचा मोठा भर एसटी ला उचलावा लागणार आहे.