शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

पालघर जिल्ह्यातील रिक्षा बेमुदत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:50 IST

पालघर, डहाणू तालुक्यातील वाहनांची पालघर येथे होणारी ‘पासिंग’ आता विरार येथे नेऊन नंतर ती सुमारे सव्वाशे किमी लांब असणा-या कल्याण येथे हलवली जाणार आहे.

हितेन नाईक/शशी करपेपालघर/वसई : पालघर, डहाणू तालुक्यातील वाहनांची पालघर येथे होणारी ‘पासिंग’ आता विरार येथे नेऊन नंतर ती सुमारे सव्वाशे किमी लांब असणा-या कल्याण येथे हलवली जाणार आहे. अत्यंत खर्चिक, त्रासदायक ठरणारे कल्याण हे ठिकाण बदलून पुन्हा ती पालघरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सुरू करावे या मागणीसाठी जिल्ह्यातील हजारो रिक्षाधारकांनी शुक्र वार पासून बेमुदत बंद पुकारला आहे.ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्या नंतर सर्व विभागांची कार्यालये सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय पालघर मुख्यालयात सुरू करणे गरजेचे असताना ते विरार येथे सुरू करण्यात आले. परिवहन विभागाने ही आपल्याला पालघर मुख्यालयात कार्यालय व इतर पासिंग चाचणीच्या प्रक्रियेसाठी जागेची मागणीच केली नसल्याने शासन पातळी वरून त्याबाबत विचार करण्यात आलेला नसल्याचे रिक्षा संघटनांचे म्हणणे आहे.पालघर पूर्वेला असलेल्या शासकीय विश्रामगृहामध्ये असलेल्या जागेत मागील २०-२५ वर्षांपासून तीन-सहा आसनी रिक्षा, मोटार -सायकल, टेम्पो, ट्रक आदी गाड्यांची पासिंग प्रक्रिया केली जात होती. ती आता बंद करून डहाणू पासून सुमारे ९२ किमी तर पालघर पासून ५५ ते ६० किमी अंतरावरील विरार येथे नेऊन ठेवण्यात आली होती. रिक्षांना पासिंगसाठी दिलेल्या ठिकाणाहून ३३ किमी प्रवासाची मर्यादा प्रादेशिक परिवहन विभागाने घालून दिलेली असतांना त्यांचा नियम मोडून रिक्षाधारकांना ६० किमी अंतरावरील विरार येथे जाण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. वेळेत पासिंग न केल्यास प्रति दिवस ५०रुपयांचा दंड ही आकारणार असल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे फुकटचा भुर्दंड गरीब रिक्षाधारकाना सहन करावा लागणार आहे. त्यातच नेहमीच अवजड वाहनांची वर्दळ असलेल्या अहमदाबाद-मुंबई महामार्ग वरून विरार गाठणे खर्चिक, मानसिक त्रासदायक व धोकादायक ठरणार असल्याचे रिक्षा युनियनचे म्हणणे आहे.आता तर विरार येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील पासिंगची चाचणी प्रक्रिया कल्याण येथे हलविण्यात येणार आहे असे, छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा चालक-मालक सेनेचे अध्यक्ष मनोज घरत यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. त्यामुळे पालघर-डहाणू येथून १२५ किमी लांब कल्याण येथे गाड्या पासिंगला घेऊन जाणे सर्वच दृष्टीने खूपच त्रासदायक ठरणारे आहे. त्यामुळे बुधवारी पालघर मुख्यालयाच्या भूमीपूजनाला आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आॅटो टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष केतन पाटील, उपाध्यक्ष सुनील जगताप आणि छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मनोज घरत, विजय किणी आदिंनी भेट घेऊन पालघर मध्येच प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय सुरू करावे अशी मागणी केली. शुक्रवार पासून सुरू होणार्या बेमुदत रिक्षा बंद आंदोलनात पालघर, बोईसर, सफाळे, सातपाटी, डहाणू आदी भागातील हजारो रिक्षा बंद राहणार असल्याने रिक्षावर अवलंबून असणारे कामगार, विद्यार्थी, छोटे-मोठे विक्रेते, मत्स्यव्यवसायिक आदी वर मोठा विपरीत परिणाम होणार आहे. प्रवाशांचा मोठा भर एसटी ला उचलावा लागणार आहे.