शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र...
2
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे
3
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
4
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
5
Stock Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; Sensex १७० अंकांची घसरण, FMCG Stocks मध्ये मोठी खरेदी
6
ऑनलाईन गेममध्ये पैसे जिंकले, पार्टीसाठी बाहेर पडले अन्...; ५ तरुणांसोबत घडलं आक्रित
7
"तिने आमचं घर तोडलं असं लोक म्हणाले, पण...", RJ महावशसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला युजवेंद्र चहल
8
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
9
धुळ्याची लेक मृणाल ठाकूरचा पहिलाच मराठी सिनेमा, 'या' अभिनेत्यासोबत केलेला रोमान्स
10
पती पत्नीसाठी बेस्ट आहे Post Office ची 'ही' स्कीम; ५ वर्षांत जमवू शकता १३ लाख रुपये, जाणून घ्या
11
नवऱ्याला सोडून पुतण्यासोबत लग्न, आता पुन्हा गावात येऊन पहिल्या पतीला दिलं थेट आव्हान! म्हणाली...
12
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
13
खुर्चीवरुन कोसळला अन्...; ३० वर्षीय डिलिव्हरी बॉयचा हार्ट अटॅकने मृत्यू, २ मुली झाल्या पोरक्या
14
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
15
मृत मुलाला जिवंत करण्यासाठी आईची धडपड; कधी CPR तर कधी ऑक्सिजन दिला, हृदयद्रावक Video व्हायरल
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
17
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
18
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
19
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
20
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका

रिक्षा सापडली आचारसंहितेच्या पेचात; भाजपाकडून तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 01:00 IST

मतदान केंद्रापासून २०० मीटरचा भाग हा प्रतिबंधित, रिक्षावाल्यांना फटका

- हितेन नाईक पालघर: बहुजन विकास आघाडीला रिक्षा चिन्ह मिळाल्याने मतदानाच्या दिवशी सर्व रिक्षाची वाहतूक बंद ठेवण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी एकी कडे केल्याने रिक्षा चालकामधून तीव्र संताप व्यक्त केला जात असताना दुसरी कडे दिव्यांग, जेष्ठ नागरिक आणि रु ग्णांना मतदान केंद्रा पर्यंत नेण्यात येणाºया रिक्षावर निवडणूक निर्णय अधिकाºया कडून ही मज्जाव करण्यात येणार असल्याने जेष्ठांना मतदान केंद्रा पर्यंत पोचायला अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे.बहुजन विकास आघाडीकडून शिट्टी हे चिन्ह भाजप-सेनेच्या प्रयत्नाने हिसकावून घेतल्या नंतर बविआ उमेदवार बळीराम जाधव यांना रिक्षा चिन्ह मिळाल्याने मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व रिक्षा बंद ठेवण्याची मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार शुक्ला यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या कडे केली आहे. बहुजन विकास आघाडीच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक बिथरले असून उद्या आम्हाला रेल्वे इंजिन चिन्ह मिळाले असते तर सर्व रेल्वे सेवा बंद ठेवली असती का? असा प्रश्न आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित करून कमळ, घड्याळ, हाताचा पंजा, या चिन्हा बाबत काय? असा उपप्रश्न ही त्यांनी उपस्थित केला आहे.आरटीओकडून जिल्ह्यात सुमारे ३३ हजार रिक्षाचीं नोंद करण्यात आली असून गरीब रिक्षाधारकांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह रिक्षावर चालत असतो. आज हजारो रिक्षाचा वापर प्रचारासाठी केला जात असून या व्यवसायातून चांगले उत्पन्न रिक्षा धारकांना मिळत आहे. तर अनेक दिव्यांग, जेष्ठ नागरिक, रु ग्णांना मतदान केंद्रापर्यंत पोचिवण्यासाठी रिक्षाची व्यवस्था करण्यात येते. मतदान केंद्रा पासून २०० मीटर चा भाग हा प्रतिबंधित भाग म्हणून रेखांकित केला जातो. या प्रतिबंधित भागा मध्ये प्रचार करण्यास, उमेदवारी चिन्ह नेण्यास, मतदारांना प्रभावीत करण्यास निवडणूक निर्णय विभागाने बंदी घातली आहे.वसई, विरार तसेच अन्य भागात मोठ्या प्रमाणात रिक्षा ची वाहतूक सुरू असत. त्यात बविआ चे कार्यकर्ते या दरम्यान मतदारांना आॅटो रिक्षा दाखवून त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील अशी तक्रार शुक्ला यांनी केली आहे. दरम्यान, आ. ठाकूर यांनीही सर्वसामान्यांची ओळख असा रिक्षाचा प्रचार केला आहे. त्यामुळे २९ एप्रिल रोजी होणाºया मतदानाच्या दिवशी सर्व रिक्षा प्रतिबंधित भागाच्या बाहेर ठेवाव्यात अथवा त्यादिवशी सर्व रिक्षा बंद ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नारनवरे यांची भेट घेत विचारले असता प्रतिबंधित भागापर्यंत वाहने नेण्यास यापूर्वीही बंदी होती आणि ती आताही राहणार आहे.भाजपच्या पदाधिकाºया कडून आमच्या व्यवसायावर गदा आणण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्ह्यातील सर्व रिक्षाधारक रस्त्यावर उतरून आंदोलन उभारू अश्या प्रतिक्रि या रिक्षाधारका कडून व्यक्त केल्या जात आहेत.तीन हजार २०० जणांची नोंद सर्वच पक्षांसमोर ठरणार आव्हाननिवडणूक आयोगाच्या सूचनानुसार ज्या मतदारांना मतदान केंद्रा पर्यंत पोचण्यास त्रास होत असेल अशा ३ हजार २०० मतदारांची नोंद मतदान यादी वरून करण्यात आली असून व्हीलचेअर वरून त्यांना मतदान केंद्रा पर्यंत नेण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.सातपाटी सह किनारपट्टीवरील अनेक गावातील मतदान केंद्रा समोर मोठया वाळूचे ढीग असल्याने व्हील चेअर चा उपयोग होणार नसल्याने आणि रिक्षांना परवानगी नसल्याने मतदानासाठी आलेल्या अनेक जेष्ठ नागरिक, दिव्यांग,आजारी रु ग्णांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर