शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

उरलीसुरली भातशेतीही गेली, विक्रमगडमध्ये मुसळधार पाऊस, पिके कुजून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:22 IST

अवकाळी पावसापाठोपाठ पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या महाचक्रीवादळाचा परिणाम विक्रमगड तालुक्यासह पालघर जिल्ह्यात झाला.

विक्रमगड : अवकाळी पावसापाठोपाठ पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या महाचक्रीवादळाचा परिणाम विक्रमगड तालुक्यासह पालघर जिल्ह्यात झाला. वातावरणात झालेल्या बदलामुळे शनिवार पहाटेपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे थोडीफार उरलेली भातशेतीही वाया गेली असून शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.आधीच अवकाळी पावसाने विक्रमगड तालुक्यासह जिल्ह्यातील भातपिकाचे पूर्णपणे नुकसान केले होते. त्यातच शेतात भिजलेले, कोंब आलेले भातपिक शेतकऱ्यांनाही गोळा करून खळ्यात किंवा घरात आणून ठेवले होते. मात्र पुन्हा पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशाही पाण्यात गेल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे.दिवाळीआधी पूर्ण पिकलेली भातशेती पावसामुळे कापता आली नव्हती. मात्र सतत पडत असलेल्या पावसाने ही पीके जमिनीवर लोळली. तसेच सतत पडणाºया पावसानेही भातशेती भिजल्याने त्याला कोंब फुटले तर काही दाणे कुजून गेले. त्यातच भाताचा पेंढा पूर्ण वाया गेला आहे. काही दिवस पडलेल्या उन्हामुळे शेतकºयांनी शेतातील जसे होते तसे पीक खळ्यात किंवा घरात आणून ठेवले. मात्र खळ्यात आणलेले भातपिक पुन्हा एकदा भिजले तर काही शेतकºयांनी ताडपत्री, प्लास्टिकच्या मदतीने ते झाकले होते. सतत कोसळणाºया पावसामुळे भातशेती पाण्यात गेली आहे. शेतकºयांचा सगळा खर्च वाया गेल्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. पिके कापली तर रोजच पाऊस. त्यामुळे ही पीके सुकवायची कशी असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. जव्हार, मोखाड्यात नागली, वरई या पिकांवर कुटुंबे सर्वाधिक अवलंबून असतात. त्यातच ही पीके हंगामी घेतली जातात. या वर्षी शेती गेली, रोजगार मिळत नाही, त्यामुळे करायचे काय? असा शेतकºयांना प्रश्न पडला आहे.