शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

उरलीसुरली भातशेतीही गेली, विक्रमगडमध्ये मुसळधार पाऊस, पिके कुजून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:22 IST

अवकाळी पावसापाठोपाठ पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या महाचक्रीवादळाचा परिणाम विक्रमगड तालुक्यासह पालघर जिल्ह्यात झाला.

विक्रमगड : अवकाळी पावसापाठोपाठ पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या महाचक्रीवादळाचा परिणाम विक्रमगड तालुक्यासह पालघर जिल्ह्यात झाला. वातावरणात झालेल्या बदलामुळे शनिवार पहाटेपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे थोडीफार उरलेली भातशेतीही वाया गेली असून शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.आधीच अवकाळी पावसाने विक्रमगड तालुक्यासह जिल्ह्यातील भातपिकाचे पूर्णपणे नुकसान केले होते. त्यातच शेतात भिजलेले, कोंब आलेले भातपिक शेतकऱ्यांनाही गोळा करून खळ्यात किंवा घरात आणून ठेवले होते. मात्र पुन्हा पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशाही पाण्यात गेल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे.दिवाळीआधी पूर्ण पिकलेली भातशेती पावसामुळे कापता आली नव्हती. मात्र सतत पडत असलेल्या पावसाने ही पीके जमिनीवर लोळली. तसेच सतत पडणाºया पावसानेही भातशेती भिजल्याने त्याला कोंब फुटले तर काही दाणे कुजून गेले. त्यातच भाताचा पेंढा पूर्ण वाया गेला आहे. काही दिवस पडलेल्या उन्हामुळे शेतकºयांनी शेतातील जसे होते तसे पीक खळ्यात किंवा घरात आणून ठेवले. मात्र खळ्यात आणलेले भातपिक पुन्हा एकदा भिजले तर काही शेतकºयांनी ताडपत्री, प्लास्टिकच्या मदतीने ते झाकले होते. सतत कोसळणाºया पावसामुळे भातशेती पाण्यात गेली आहे. शेतकºयांचा सगळा खर्च वाया गेल्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. पिके कापली तर रोजच पाऊस. त्यामुळे ही पीके सुकवायची कशी असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. जव्हार, मोखाड्यात नागली, वरई या पिकांवर कुटुंबे सर्वाधिक अवलंबून असतात. त्यातच ही पीके हंगामी घेतली जातात. या वर्षी शेती गेली, रोजगार मिळत नाही, त्यामुळे करायचे काय? असा शेतकºयांना प्रश्न पडला आहे.