शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

पालघर आराखड्याचा फेरविचार -रवींद्र चव्हाण

By admin | Updated: April 9, 2017 00:52 IST

पालघर नगर परिषदेच्या विकास आराखड्याबाबत स्थानिकांच्या हरकतीवर विचार न करताच मुख्यमंत्र्यांनी आराखड्याला मंजुरी दिल्याने संतप्त शेतकर्यांनी मुंबईचे

पालघर : पालघर नगर परिषदेच्या विकास आराखड्याबाबत स्थानिकांच्या हरकतीवर विचार न करताच मुख्यमंत्र्यांनी आराखड्याला मंजुरी दिल्याने संतप्त शेतकर्यांनी मुंबईचे आझाद मैदानावर आंदोलन केले.नगरविकास राज्यमंत्र्यांच्या भेटी दरम्यान स्थानिकांनी ह्यातील अनेक त्रुटी दाखवून दिल्यावर अधिनियम 37 ्न अन्वये दुरु स्ती करण्याचे आश्वासन त्यांनी संघर्ष समतिीला दिले.नगरविकास विभागाने प्रसिद्ध केलेला प्रारूप विकास आराखडा हा बिल्डरधार्जिणा आणि स्थानिक शेतकरी-ग्रामस्थ यांना उद्ध्वस्त करणारा असल्याने त्या विरोधात विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन उभारण्यात आले होते. हा आराखडा वस्तुस्थितीदर्शक नसून प्रत्यक्ष जागेवर या संबंधी सर्वेक्षण न करता तो शेतकरी, गरीबावर लादण्यात आला होता.ह्या आराखड्या बाबत अनेक हरकती नोंदविण्यात आल्या नंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,आमदार आनंद ठाकूर, पास्कल धनारे,अमित घोडा ह्यांनी अधिवेशनात उपस्थित केला होता.अशा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या सोबत 24 जून रोजीच्या बैठकीनंतर सरकार शेतकर्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही देऊन त्यांना हरकती पुन्हा सादर करण्यास सांगितले होते. अशावेळी सर्वाना अनिभज्ञ ठेऊन हा विकास आराखडा जाहीर करण्यात आला.मात्र आजही याबाबत अनेक त्रुटी असून अपुरी प्रक्रिया राबविण्यात आल्याचे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. आमदार आनंद ठाकूर, निरंजन डावखरे यांच्या सह संघर्ष समितीने राज्यमंत्री पाटील यांची भेट घेतली.त्यावेळी जमीन वापर नकाशा मध्ये शेती खालील क्षेत्र ७४३ हेक्टर क्षेत्र दाखविण्यात आले आहे, मात्र हा आराखडा लागू झाल्यानंतर जो जमीन वापर दिसतोय त्यात शेती खालील क्षेत्र शून्य दिसत असल्याने नगरपालिका क्षेत्रात ज्या शेतकऱ्यांच्या ज्या शेतजमिनी आहेत त्या संपवून टाकण्याचा घाट घातला जात असल्याचे राज्यमंत्र्यांना सप्रमाण दाखवून देण्यात आले. (वार्ताहर)मंत्र्यांना दिले पुरावेगोठणपूर मधील आदिवासी वस्ती, बाळशी पाडा जवळ नव्याने सुचविलेल्या रस्त्यामुळे पाड्यातील अनेक घरे तोडली जाणार आहेत. त्यामुळे राज्यमंत्र्यांनी गंभीरतेने ह्या प्रकारणा बाबत अहवाल मागवून काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दुरु स्त करण्यात येतील, असे आश्वासन संघर्ष समितीला दिले.