शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महसूल विभागाचा ‘१८ वा महिना’, भरपाई तुटपुंजी त्यातही सरकारने केली क्रूर थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 03:06 IST

जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरनपाईचे महसूल खात्याने दिलेले चेक त्यावर १८ व्या महिन्याचा उल्लेख असल्याने न वटता परत आले आहेत.

नालासोपारा: जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरनपाईचे महसूल खात्याने दिलेले चेक त्यावर १८ व्या महिन्याचा उल्लेख असल्याने न वटता परत आले आहेत. त्यामुळे आता संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशी तारीख टाकून महसूल विभागाने पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यामुळे पाच हजार रूपयांचे धनादेश धन न देता को-या कागदाच्या रूपात बॅकेकडून परत आले आहेत.जुलै महिन्यातील नऊ ते बारा दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण वसई तालुका जलमय झाला होता. आठवडाभर सखल भागात पाणी साचलं होते.अनेकांच्या घरात गुढघाभर पाणी साचून टीव्ही, फर्नीचरसह अन्नधान्याचेही मोठे नुकसान झाले होते. शासनाच्यावतीने महसूल विभागाने या पूरपिडीतांच्या घराचे पंचनामे करण्यात आले होते. त्यामुळे नुकसान भरपाई मिळेल या आशेवर पूरग्रस्त होते. प्रत्यक्षात नुकसान लाखांच्या घरात पण गेल्या आठवड्यात आलेले चेक फक्त पाच हजाराचे होते. त्यामुळे नागरिकांनी मदत देताय कि भीक? अशा शब्दात जाहिर नाराजी व्यक्त केली होती. त्यात चेकवरील आकडाही अजब गजब टाकण्यात आला होता. बुडत्याला काडीचा आधार मानून पूरग्रस्तांनी चेक बॅकेच्या खात्यात टाकले. त्यापैकी अनेकांचे चेक न वटताच परत आले. शासनाकडून मदत म्हणून देण्यात आलेल्या चेकवर असंख्य चुका असल्यामुळे ते वटले नसल्याचे समोर आले आहे. काहींची नावे चुकीची टाकण्यात आली आहेत. तर काहींच्या चेकवर चक्क २०.१८.२०१८ हि कधीही न उगवणारी तारीख टाकण्यात आली आहे. महसूल खाते हे चुकीचे चेक जमा करीत असून नवीन देणार आहे.>चुका सुधारून महसूल खाते नवे चेक देणारपूरग्रस्तांचा तातडीने मदत कशी मिळेल यासाठी महसूल प्रशासनाने धावपळ केली .मात्र घाईगडबडीत काही चुका झाल्या असतील त्या दुरूस्त करून पुन्हा ते नागरिकांना देण्यात येतील असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.