शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

परतीच्या पावसामुळे वीट व्यवसायाचाही खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 00:13 IST

परतीच्या पावसाने यंदा भातपिकाचे प्रचंड नुकसान झाले असून उशीरापर्यंत पाऊस पडत राहिल्याने जमिनीत ओलावा आहे.

वाडा/कासा : परतीच्या पावसाने यंदा भातपिकाचे प्रचंड नुकसान झाले असून उशीरापर्यंत पाऊस पडत राहिल्याने जमिनीत ओलावा आहे. या ओलाव्यामुळे अद्यापही वीट व्यावसायिकांना आपला व्यवसाय सुरू करता आलेला नाही. वास्तविक, दसरा झाल्यानंतर लगेचच वीट व्यावसायिक व्यवसायाला सुरवात करतात. मात्र यावर्षी जमिनीत ओलावा असल्याने व्यवसाय सुरू करता न आल्याने वीट व्यावसायिक चिंतेत सापडले आहेत.पालघर तसेच ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भातशेती हा मुख्य व्यवसाय काही वर्षांपासून तोट्यात चालला आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ असे चक्र अनेक वर्षे सुरू आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक दिवाळखोरीत सापडला आहे. या व्यवसायाला पूरक व्यवसाय (जोडधंदा) म्हणून काही शेतकरी आणि बेरोजगार तरूण वीट उत्पादन व्यवसाय करतात. मात्र निसर्ग तसेच सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे हा व्यवसायही दिवाळखोरीत जाण्याची चिन्हे आहेत. यावर्षी उशीरापर्यंत परतीचा पाऊस पडल्याने जमिनीत अद्यापही ओलावा आहे आणि या एकमेव कारणामुळे वीट उत्पादन सुरू केलेले नाही.अनेक वीट उत्पादक वीट तयार करण्यासाठी लागणारे मजूर हे मे महिन्यातच त्यांना आगाऊ रक्कम देऊन फिक्स करतात. त्यानंतर गौरी- गणपती, दसरा दिवाळी या सणाबरोबरच कधी वेळ प्रसंगी गरज लागलीच तर पैसे आगाऊ देतात. मात्र एक महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही वीट उत्पादन सुरू न केल्याने व्यावसायिकांना अद्यापही मजुरांना पैसे द्यावे लागत असून ते अडचणीत आले आहेत. दसरा - दिवाळीला धंदा सुरू केल्यानंतर आतापर्यंत लाखो नवीन विटा तयार झाल्या असत्या. मात्र पावसामुळे धंद्यासाठी उशीर होत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील भिवंडीचे खारबाव, पाये, पायगाव, अनगाव, टेंबवली, अंबाडी, दाभाड, दिघाशी हा परिसर तर वाडा तालुक्यातील वसुरी, खानिवली, आंबिस्ते, केळठण, निंबवली, घोणसई, डोंगस्ते, देवघर, जाळे, कुयलू, कांबारा, खैरे येथे वीट उत्पादनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. हा व्यवसाय करणारे साधारण एक ते दोन हजार वीटउत्पादक व्यावसायिक असून ते वीस ते पंचवीस हजार कुटुंबे वीट तयार करण्यात गुंतलेली आहेत. विटांना ठाणे, मुंबई, कल्याण या शहरातून तसेच ग्रामीण भागातही औद्योगिककरणामुळे बांधकामे सुरू असल्याने चांगली मागणी आहे.पावसामुळे साधारणपणे एक महिना उशिराने हा व्यवसाय सुरू होत आहे. या एका महिन्यात एक ते दीड लाख विटा तयार झाल्या असत्या. या उशीराचा फटका आम्हा सर्वच वीट व्यावसायिकांना बसला आहे.- हेमंत पाटील, वीट उत्पादक व्यावसायिकसिमेंट विटांमुळे मागणी कमीसध्याच्या परिस्थितीत सिमेंटच्या विटांना बिल्डरकडून जास्त मागणी आहे. सिमेंटच्या विटांची लांबी रूंदी आणि उंची जास्त असते. तसेच त्यासाठी बांधकाम करताना सिमेंट रेती मजुरीचा खर्च कमी येतो. त्यामुळे सिमेंट विटांना जास्त मागणी आहे. मोठे बिल्डर सिमेंट काँक्रीटीकरणाच्या इमारती बांधत असल्याने विटांची त्यांना गरजच लागत नसल्याने मातीच्या विटांना कमी मागणी आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार