शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

ग्रा.पं.च्या निवडणुका २३ ऐवजी २६ सप्टेंबरला , २७ ला निकाल : आॅनलाइनचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 02:56 IST

आॅनलाईन उमेदवारी अर्ज आणि सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात तांत्रिक अडचणींमुळे पालघर जिल्हयातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता २३ सप्टेंबरऐवजी २६ सप्टेंबरला होणार आहे.

वसई : आॅनलाईन उमेदवारी अर्ज आणि सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात तांत्रिक अडचणींमुळे पालघर जिल्हयातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता २३ सप्टेंबरऐवजी २६ सप्टेंबरला होणार आहे.आॅक्टोबर २०१७ मध्ये ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे त्यांच्या निवडणुका २३ सप्टेंबरला जाहीर करण्यात आल्या होत्या. यामध्ये पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने ७ सप्टेंबरला तातडीने निर्णय घेऊन या निवडणुका २६ सप्टेंबरला घेण्याचे जाहीर केले आहे.निवडणूक आयोगाने अर्ज आॅनलाईन भरण्याचे निर्देश दिले आहेत. तब्बल बारा पानी माहिती आॅनलाईन भरतांना ग्रामीण भागातील उमेदवारांना अनेक अडचणी येत आहेत. दुसरीकडे, यंदापासून सरपंच थेट मतदारांमधून निवडण्यात येणार आहे. त्यासाठीही आॅनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. पण, आयोगाच्या साईटवर सरपंचपदाच्या उमेदवारीसाठी अर्जच उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यावर मार्ग काढण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या निवडणुका २६ सप्टेंबरला घेण्याचे जाहीर करून नवा कार्यक्रम जाहिर केला आहे. ४ सप्टेंबर ते ११ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. १२ सप्टेंबरला छाननी केली जाणार आहे. १४ सप्टेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेता येणार आहे. त्याचदिवशी दुपारी तीन नंतर चिन्ह वाटप केले जाणार आहे. तसेच अंतिम यादी जाहिर केली जाणार आहे.२६ सप्टेंबरला सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल. २७ सप्टेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहिर केले जाणार आहेत.