शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

स्थानिक संस्था कर बंद झाल्याने विकासकामांवर परिणाम

By admin | Updated: August 1, 2015 23:19 IST

राज्य शासनाच्या स्थानिक संस्था कर बंद करण्याच्या निर्णयाचा वसई-विरार महानगरपालिकेच्या विकासकामांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. हा कर बंद करण्याच्या बदल्यात शासनाकडून मिळणारे

वसई : राज्य शासनाच्या स्थानिक संस्था कर बंद करण्याच्या निर्णयाचा वसई-विरार महानगरपालिकेच्या विकासकामांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. हा कर बंद करण्याच्या बदल्यात शासनाकडून मिळणारे अनुदान पुरेसे व वेळेवर मिळेल का, अशी भीती सर्वत्र व्यक्त होत आहे. गेल्या ५ वर्षांत महानगरपालिकेला स्थानिक संस्था कररूपाने सुमारे ८०० कोटींचा महसूल मिळाला. या महसूलातून वसई-विरार उपप्रदेशातील महत्त्वाची विकासकामे मार्गी लागू शकली.वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र मोठे असून या परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यापूर्वी असलेल्या ४ नगरपरिषदांना विकासकामे करताना आर्थिक मर्यादा आल्याने २००९ साली राज्य शासनाने ४ नगरपरिषदा व काही ग्रामपंचायती यांचा समावेश करून वसई-विरार महानगरपालिका स्थापन केली. स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने २००९ साली स्थानिक संस्था कर वसूल करण्याचे अधिकार महानगरपालिकांना प्रदान केले. सुरुवातीस या कराला प्रचंड विरोध झाला. परंतु, कालांतराने उद्योजक, व्यापाऱ्यांचा प्रतिसाद मिळू लागला व महानगरपालिकेच्या तिजोरीत वार्षिक १५० ते १७० कोटी रुपयांचा महसूल जमा होऊ लागला. गेल्या ५ वर्षांत एकूण उद्दिष्टाच्या ८० टक्के वसुली करण्यात महानगरपालिका यशस्वी ठरली. दरम्यानच्या काळात मुंबई व अन्य शहरांमध्ये स्थानिक संस्था कराला व्यापाऱ्यांनी विरोध सुरू केला व राज्य शासनाने हा कर रद्द करण्याचा निर्णय घेतला. या कराच्या बदल्यात शासकीय अनुदान देण्याचा शासनाने निर्णय जाहीर केला आहे. परंतु, महानगरपालिकेने आजवर केलेल्या वसुलीच्या तुलनेत शासकीय अनुदान मिळणार का? तसेच हे अनुदान देताना उपप्रदेशाचा विकासदर लक्षात घेऊन दरवर्षी त्यामध्ये वाढ होणार का, असे दोन महत्त्वाचे प्रश्न महानगरपालिकेसमोर उभे ठाकले आहेत. अनुदान वेळेवर मिळावे!यासंदर्भात अधिक माहिती देताना महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अजीव पाटील म्हणाले, महानगरपालिकेच्या हद्दीतील लोकसंख्यावाढ व विकासदर असे दोन निकष शासनाने अनुदान देताना लावणे गरजेचे आहे. तसेच हे अनुदान वेळेवर देणे व वेळोवेळी त्यामध्ये वाढ व्हायला हवी. तरच, महानगरपालिकेला परिसरामध्ये विकासकामे करणे शक्य होईल.