शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक संस्था कर बंद झाल्याने विकासकामांवर परिणाम

By admin | Updated: August 1, 2015 23:19 IST

राज्य शासनाच्या स्थानिक संस्था कर बंद करण्याच्या निर्णयाचा वसई-विरार महानगरपालिकेच्या विकासकामांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. हा कर बंद करण्याच्या बदल्यात शासनाकडून मिळणारे

वसई : राज्य शासनाच्या स्थानिक संस्था कर बंद करण्याच्या निर्णयाचा वसई-विरार महानगरपालिकेच्या विकासकामांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. हा कर बंद करण्याच्या बदल्यात शासनाकडून मिळणारे अनुदान पुरेसे व वेळेवर मिळेल का, अशी भीती सर्वत्र व्यक्त होत आहे. गेल्या ५ वर्षांत महानगरपालिकेला स्थानिक संस्था कररूपाने सुमारे ८०० कोटींचा महसूल मिळाला. या महसूलातून वसई-विरार उपप्रदेशातील महत्त्वाची विकासकामे मार्गी लागू शकली.वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र मोठे असून या परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यापूर्वी असलेल्या ४ नगरपरिषदांना विकासकामे करताना आर्थिक मर्यादा आल्याने २००९ साली राज्य शासनाने ४ नगरपरिषदा व काही ग्रामपंचायती यांचा समावेश करून वसई-विरार महानगरपालिका स्थापन केली. स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने २००९ साली स्थानिक संस्था कर वसूल करण्याचे अधिकार महानगरपालिकांना प्रदान केले. सुरुवातीस या कराला प्रचंड विरोध झाला. परंतु, कालांतराने उद्योजक, व्यापाऱ्यांचा प्रतिसाद मिळू लागला व महानगरपालिकेच्या तिजोरीत वार्षिक १५० ते १७० कोटी रुपयांचा महसूल जमा होऊ लागला. गेल्या ५ वर्षांत एकूण उद्दिष्टाच्या ८० टक्के वसुली करण्यात महानगरपालिका यशस्वी ठरली. दरम्यानच्या काळात मुंबई व अन्य शहरांमध्ये स्थानिक संस्था कराला व्यापाऱ्यांनी विरोध सुरू केला व राज्य शासनाने हा कर रद्द करण्याचा निर्णय घेतला. या कराच्या बदल्यात शासकीय अनुदान देण्याचा शासनाने निर्णय जाहीर केला आहे. परंतु, महानगरपालिकेने आजवर केलेल्या वसुलीच्या तुलनेत शासकीय अनुदान मिळणार का? तसेच हे अनुदान देताना उपप्रदेशाचा विकासदर लक्षात घेऊन दरवर्षी त्यामध्ये वाढ होणार का, असे दोन महत्त्वाचे प्रश्न महानगरपालिकेसमोर उभे ठाकले आहेत. अनुदान वेळेवर मिळावे!यासंदर्भात अधिक माहिती देताना महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अजीव पाटील म्हणाले, महानगरपालिकेच्या हद्दीतील लोकसंख्यावाढ व विकासदर असे दोन निकष शासनाने अनुदान देताना लावणे गरजेचे आहे. तसेच हे अनुदान वेळेवर देणे व वेळोवेळी त्यामध्ये वाढ व्हायला हवी. तरच, महानगरपालिकेला परिसरामध्ये विकासकामे करणे शक्य होईल.