शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

आंदोलन खटल्याचा ११ वर्षांनी निकाल

By admin | Updated: January 11, 2016 01:46 IST

विरार शिवसेनेने अकरा वर्षांपूर्वी अतिवृष्टीतील पीडितांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी केलेल्या आंदोलनाच्या खटल्याचा शुक्रवारी निकाल लागला

वसई: विरार शिवसेनेने अकरा वर्षांपूर्वी अतिवृष्टीतील पीडितांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी केलेल्या आंदोलनाच्या खटल्याचा शुक्रवारी निकाल लागला. कोर्टाने याप्रकरणी तत्कालीन महिला आघाडीप्रमुखला दोषी ठरवत एक महिन्याची कैद आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर दहा शिवसैनिकांची निर्दोष सुटका केली.२००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या लोकांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती. त्यामुळे आपदग्रस्तांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी शिवसेनेने २३ आॅगस्ट २००५ रोजी सकाळी ११.३० वाजता विरार पूर्वेकडील मंगल कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी तत्कालीन महिला आघाडीप्रमुख अरुणा अरुण पेडणेकर यांनी यांनी तलाठी लक्ष्मण सोनार यांच्या तोंडाला काळे फासले होते. याप्रकरणी तलाठी लक्ष्मण सोनार यांनी विरार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर विरार पोलीसांनी अरुणा पेडणेकर यांच्यासह शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सदानंद पिंपळे व इतर दहा जणांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी वसई न्यायालयात खटला सुरु होता.मागील प्रदिर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेल्या या खटल्याचा निकाल देताना जेएमएडीसी कोर्टाचे (प्रतिनियुक्ती रेल्वे कोर्ट) न्या.एम.वाय.वाघ यांनी अरुणा पेडणेकर यांना दोषी ठरवून त्यांना एक महिन्याची साधी कैद व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. त्यानंतर अरुणा यांनी जामीन अर्ज दाखल केल्याने त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. दरम्यान, सर्वांकडून एक वर्ष त्यांच्याकडून चांगल्या वर्तवणूकीची हमी देखील घेण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य दोषींपैकी दिलीप पिंपळे व इतर दहा जणांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून ज्योत्सना गवळी यांनी काम पाहिले.