शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

आंदोलन खटल्याचा ११ वर्षांनी निकाल

By admin | Updated: January 11, 2016 01:46 IST

विरार शिवसेनेने अकरा वर्षांपूर्वी अतिवृष्टीतील पीडितांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी केलेल्या आंदोलनाच्या खटल्याचा शुक्रवारी निकाल लागला

वसई: विरार शिवसेनेने अकरा वर्षांपूर्वी अतिवृष्टीतील पीडितांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी केलेल्या आंदोलनाच्या खटल्याचा शुक्रवारी निकाल लागला. कोर्टाने याप्रकरणी तत्कालीन महिला आघाडीप्रमुखला दोषी ठरवत एक महिन्याची कैद आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर दहा शिवसैनिकांची निर्दोष सुटका केली.२००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या लोकांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती. त्यामुळे आपदग्रस्तांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी शिवसेनेने २३ आॅगस्ट २००५ रोजी सकाळी ११.३० वाजता विरार पूर्वेकडील मंगल कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी तत्कालीन महिला आघाडीप्रमुख अरुणा अरुण पेडणेकर यांनी यांनी तलाठी लक्ष्मण सोनार यांच्या तोंडाला काळे फासले होते. याप्रकरणी तलाठी लक्ष्मण सोनार यांनी विरार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर विरार पोलीसांनी अरुणा पेडणेकर यांच्यासह शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सदानंद पिंपळे व इतर दहा जणांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी वसई न्यायालयात खटला सुरु होता.मागील प्रदिर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेल्या या खटल्याचा निकाल देताना जेएमएडीसी कोर्टाचे (प्रतिनियुक्ती रेल्वे कोर्ट) न्या.एम.वाय.वाघ यांनी अरुणा पेडणेकर यांना दोषी ठरवून त्यांना एक महिन्याची साधी कैद व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. त्यानंतर अरुणा यांनी जामीन अर्ज दाखल केल्याने त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. दरम्यान, सर्वांकडून एक वर्ष त्यांच्याकडून चांगल्या वर्तवणूकीची हमी देखील घेण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य दोषींपैकी दिलीप पिंपळे व इतर दहा जणांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून ज्योत्सना गवळी यांनी काम पाहिले.