शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाविरोधातील तक्रारींचे पडसाद

By admin | Updated: May 14, 2017 22:42 IST

सातपाटी गावातील रस्त्यावरील अडथळ्यासह बंधाऱ्या लगत करण्यात आलेल्या अतिक्र मणामुळे वाहनांसह नागरिकांना सुरिक्षत चालणे सुद्धा दुरापास्त झाले आहे

लोकमत न्युज नेटवर्कपालघर : सातपाटी गावातील रस्त्यावरील अडथळ्यासह बंधाऱ्या लगत करण्यात आलेल्या अतिक्र मणामुळे वाहनांसह नागरिकांना सुरिक्षत चालणे सुद्धा दुरापास्त झाले आहे. हे अडथळे दूर करण्यास अपयशी ठरलेल्या सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्या विरोधात सागरी पोलीस स्टेशनमध्ये तक्र ार दाखल करण्याचे पडसाद ग्रामसभेत उमटले.सातपाटी ग्रामपंचायतीची तहकूब झालेली ग्रामसभा शुक्र वारी श्रीराम मंदिरात पार पडली. ह्यावेळी सोयीसुविधांचा वानवा, रद्द करण्यात आलेला धूप प्रतिबंधक बंधारा, वाढत चाललेली अतिक्र मणे, अडथळे, कचरा, अस्वच्छता असे अनेक प्रश्न उपस्थित करून ग्रामसभेत आपला राग व्यक्त केला. सातपाटी गावात या सीएसआर फंडाद्वारे अथवा आपल्या नातेवाईकांच्या स्मरणार्थ अनेक लोकांनी सिमेंटची बाकडे दिले असून ते रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आल्याने अडथळे निर्माण होत आहे. त्यावर रात्री दारूच्या पार्ट्या रंगत असल्याच्या अनेकांच्या तक्र ारी आहेत.सातपाटीचा धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्याने घरे उध्वस्त होण्याच्या भीतीने ग्रासलेल्या अनेक महिलांनी ग्रामसभा डोक्यावर घेत तात्काळ उपाय योजना आखण्याची मागणी केली आहे. परंतु समुद्रा लगतच्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या जवळ वाढणारी बेकायदेशीर झोपडपट्टी बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती राजन मेहेर ह्यांनी सभेत दिली. खाडीत उभारण्यात आलेल्या बंधाऱ्याला लागूनच अनेक लोकांनी घरे, गोदामे बांधली असून अश्या लोकांना ग्रामपंचायतीनी ना हरकत दाखला देऊ नये अशी मागणी होत असताना नव्याने उभ्या राहणाऱ्या मार्केट मध्ये अतिक्र मण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी जगदीश नाईक ह्यांनी केली. दांड्यावर उभारण्यात आलेली शौचालये सुरु केल्यास आत्मदहनाची धमकी देणाऱ्याविरोधात पोलिसात तक्र ार दाखल करण्याची मागणीही ह्यावेळी करण्यात आली.