शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

कारवाईनंतर रहिवासी वाऱ्यावर; धाेकादायक इमारतींतील बेघर हलाखीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 23:59 IST

घरभाडे भरायचे की पाेटाला खायचे?

नालासोपारा : धाेकादायक इमारती काेसळून जीवितहानी हाेऊ नये, यासाठी न्यायालयाने अशा इमारतींवर कारवाइचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, वसई-विरार महापालिकेने अनेक धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्यानंतर शेकडाे रहिवाशांनी अशा इमारतींतील घरे रिकामी केली. ज्यांनी नकार दिला, त्या इमारतींचे नळजाेडणी ताेडून त्यांना घर रिकामे करण्यास लावले. त्यानंतर, या इमारतींवर हाताेडा चालवून त्या जमीनदाेस्त केल्या. पालिकेने आपले कर्तव्य पूर्ण केले असले, तरी या इमारतींत राहणाऱ्या रहिवाशांना मात्र वाऱ्यावर साेडण्यात आले. त्यामुळे आमचा वाली काेण, असा प्रश्न हे रहिवासी विचारत आहेत.बेघर झालेले अनेक जण भाड्याने खाेली घेऊन राहत आहेत. काेराेनाच्या काळात त्यातील अनेकांच्या नाेकरीवर गदा आली आहे. त्यांचे व्यवसाय बुडाले आहेत. त्यामुळे त्यांना राेजच्या जेवणाचा प्रश्न सतावत असताना घराचे भाडे कुठून भरायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ३० ते ३५ वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारती ग्रामपंचायत काळातील आहेत. तेव्हा जमिनींच्या किमती खूप कमी होत्या, पण आता या जमिनींना साेन्याचा भाव आला आहे. आदिवासींच्या जमिनींवर किंवा पगडी पद्धतीने खरेदी केलेल्या इमारतींचा डीसी नियमांनुसार अधिकृत पुनर्विकास करणे शक्य नसल्याने माेठा पेच निर्माण झाला आहे.भाजपचे वसई-विरार उपाध्यक्ष मनोज बारोट म्हणाले की, ३४ वर्षांपूर्वी बांधलेली इमारत जीर्ण व धोकादायक झाल्याने दाेन वर्षांपूर्वी महापालिकेने नोटीस बजावून इमारत रिकामी करून ती पाडली. त्यानंतर, रहिवाशांनी बांधकाम ठेकेदारामार्फत मारत बांधली. हे बांधकाम पालिका कार्यालयापासून केवळ ५०० मीटर अंतरावर सुरू होते, तेव्हा प्रशासनाने काहीच हस्तक्षेप केला नाही. बांधकाम पूर्ण हाेताच रहिवासी राहण्यास आले, तेव्हा मनपाने इमारतीला तोडक कारवाईची नोटीस बजावून माेकळे झाले. ‘बांधकाम सुरू असतानाच कारवाई आवश्यक’ बेकायदा बांधकामांवर कारवाई झालीच पाहिजे, पण बांधकाम सुरू असतानाच ती का केली जात नाही, त्यामुळे खरेदी करणाऱ्या नागरिकांची आर्थिक फसवणूक हाेऊन त्यांचे संसार रस्त्यावर येतात. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार तोडक कारवाई केल्यानंतर बेघर झालेल्या हजारो कुटुंबांच्या पुनर्वसनाची जबाबदारी काेणी घ्यायची, असा सवाल बाराेट यांनी केला आहे.