शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
4
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
5
‘’महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
6
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
7
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
8
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
9
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
10
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
11
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
12
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
13
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
14
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
15
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
17
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
18
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
19
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
20
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य

कारवाईनंतर रहिवासी वाऱ्यावर; धाेकादायक इमारतींतील बेघर हलाखीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 23:59 IST

घरभाडे भरायचे की पाेटाला खायचे?

नालासोपारा : धाेकादायक इमारती काेसळून जीवितहानी हाेऊ नये, यासाठी न्यायालयाने अशा इमारतींवर कारवाइचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, वसई-विरार महापालिकेने अनेक धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्यानंतर शेकडाे रहिवाशांनी अशा इमारतींतील घरे रिकामी केली. ज्यांनी नकार दिला, त्या इमारतींचे नळजाेडणी ताेडून त्यांना घर रिकामे करण्यास लावले. त्यानंतर, या इमारतींवर हाताेडा चालवून त्या जमीनदाेस्त केल्या. पालिकेने आपले कर्तव्य पूर्ण केले असले, तरी या इमारतींत राहणाऱ्या रहिवाशांना मात्र वाऱ्यावर साेडण्यात आले. त्यामुळे आमचा वाली काेण, असा प्रश्न हे रहिवासी विचारत आहेत.बेघर झालेले अनेक जण भाड्याने खाेली घेऊन राहत आहेत. काेराेनाच्या काळात त्यातील अनेकांच्या नाेकरीवर गदा आली आहे. त्यांचे व्यवसाय बुडाले आहेत. त्यामुळे त्यांना राेजच्या जेवणाचा प्रश्न सतावत असताना घराचे भाडे कुठून भरायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ३० ते ३५ वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारती ग्रामपंचायत काळातील आहेत. तेव्हा जमिनींच्या किमती खूप कमी होत्या, पण आता या जमिनींना साेन्याचा भाव आला आहे. आदिवासींच्या जमिनींवर किंवा पगडी पद्धतीने खरेदी केलेल्या इमारतींचा डीसी नियमांनुसार अधिकृत पुनर्विकास करणे शक्य नसल्याने माेठा पेच निर्माण झाला आहे.भाजपचे वसई-विरार उपाध्यक्ष मनोज बारोट म्हणाले की, ३४ वर्षांपूर्वी बांधलेली इमारत जीर्ण व धोकादायक झाल्याने दाेन वर्षांपूर्वी महापालिकेने नोटीस बजावून इमारत रिकामी करून ती पाडली. त्यानंतर, रहिवाशांनी बांधकाम ठेकेदारामार्फत मारत बांधली. हे बांधकाम पालिका कार्यालयापासून केवळ ५०० मीटर अंतरावर सुरू होते, तेव्हा प्रशासनाने काहीच हस्तक्षेप केला नाही. बांधकाम पूर्ण हाेताच रहिवासी राहण्यास आले, तेव्हा मनपाने इमारतीला तोडक कारवाईची नोटीस बजावून माेकळे झाले. ‘बांधकाम सुरू असतानाच कारवाई आवश्यक’ बेकायदा बांधकामांवर कारवाई झालीच पाहिजे, पण बांधकाम सुरू असतानाच ती का केली जात नाही, त्यामुळे खरेदी करणाऱ्या नागरिकांची आर्थिक फसवणूक हाेऊन त्यांचे संसार रस्त्यावर येतात. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार तोडक कारवाई केल्यानंतर बेघर झालेल्या हजारो कुटुंबांच्या पुनर्वसनाची जबाबदारी काेणी घ्यायची, असा सवाल बाराेट यांनी केला आहे.