शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

आदिवासींचे आरक्षण संख्येच्या प्रमाणातच हवे

By admin | Updated: September 14, 2015 23:10 IST

आदिवासी समाजाला नोकऱ्यांत १०० टक्के आरक्षण दिल्याने बिगर आदिवासींत नाराजी निर्माण झाली आणि बिगर आदिवासींनी सर्वांना लोकसंख्येनुसार आरक्षण मिळावे, या मागणीसाठी

वाडा : आदिवासी समाजाला नोकऱ्यांत १०० टक्के आरक्षण दिल्याने बिगर आदिवासींत नाराजी निर्माण झाली आणि बिगर आदिवासींनी सर्वांना लोकसंख्येनुसार आरक्षण मिळावे, या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू केले. या आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळत असतानाच रविवारी संध्याकाळी पालघर जिल्हा पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आदिवासींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे, असे मत व्यक्त करून याबाबत राज्यपालांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याने साखळी उपोषण स्थगित करण्यात आले.पालघर जिल्ह्यातील आदिवासी आरक्षण रद्द करावे आणि तलाठी भरतीला स्थगिती द्यावी, या मागण्यांसाठी वाडा येथे बिगर आदिवासी आरक्षण हक्क समितीचे सात दिवस साखळी उपोषण सुरू होते. या आंदोलनाला आ. शांताराम मोरे, पांडुरंग बरोरा, माजी खा. बळीराम जाधव यांच्यासह जिल्हापरिषद सदस्य पंचायत समिती पदाधिकारी आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. शिवसेना नेते अनंत तरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आरक्षणात बदल करण्यासंदर्भात प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यानंतर, पालकमंत्री विष्णू यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा केली.या वेळी चंद्रकांत पष्टे, विलास आकरे, युवराज ठाकरे, निलेश गंधे, भाजपाचे राजू पाटील, वाडा उपसरपंच रोहन पाटील, कुणाल साळवी, मनीष देहेरकर आदी मान्यवरांसह स्थानिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)